Saturday, 31 December 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

स्वधर्माभिमान हवाच..!

परिस्थिती बदलेल काय?

आज २०१६ या “कॅलेंडर इयर” चा अखेरचा दिवस.उद्यापासून २०१७ हे नवीन वर्ष सुरु होईल.अर्थात हे नूतन वर्ष इंग्रजी कॅलेंडरनुसार असून हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला सुरु होत असल्याने १ जानेवारी हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जावा किंवा नको यावर अनेक मत-मतांतरे आहेत.उद्या पाश्चात्य संस्कृती आणि दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरु होत आहे.हिंदू सणांवर टीका करायची, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या आणि विज्ञानाला धरून असलेल्या परंपरा मोडीत काढायच्या,हिंदू सण-उत्सवांवर टीका करायची आणि पाश्चात्य संस्कृती जोपासायची हा प्रकार आजकाल जोरात चालू आहे.हिंदूंच्या प्रथा अंधश्रद्धा ठरवायच्या,हिंदू सणांना प्रदूषण,पैशांची नासाडी अशी कारणे देऊन निर्बंध घालायचे.ख्रिसमसच्या रात्री मात्र सांताक्लॉज येणार म्हणून आकाशाकडे डोळे लावून वाट पहायची.ही अंधश्रद्धा नव्हे काय? या असल्या किरकोळ गोष्टींमुळे हिंदू धर्माला काडीमात्र फरक पडणार नाही.हिंदू धर्म महान होता,महान आहे आणि राहील,पण सगळे निर्बंध,कायदे,नियम,अटी फक्त हिंदूंच्या सणांनाच आहेत काय?

उद्या हिंदू नववर्षारंभ नसला तरी जागतिक कॅलेंडर मात्र बदलणार आहे.त्यामुळे हा जागतिक नववर्षारंभ साजरा करण किंवा त्याच्या शुभेच्छा देणं चुकीचं निश्चितच नाही.असं असलं तरी नववर्षारंभ साजरा करण्याच्या नावाखाली मनमानी करणे,दारू पिऊन धिंगाणा घालणे,रात्रभर हिडीस नृत्य करणे,ड्रग्जच्या नशेत बेधुंद होणे हे निश्चितच बंद व्हायला हव.१ जानेवारीला नववर्षारंभ साजरा करण्यास विरोध कोणाचाच नाही.विरोध हिंदू संस्कृती विसरून,हिंदू संस्कृती मोडीत काढून किंवा तिच्यावर टीका करून आणि तिला अंधश्रद्धा ठरवून पाश्चात्य संस्कृती स्वीकारण्यास आहे.जो हिंदू आपल्या धर्माच्या सर्व प्रथा परंपरांचा यथोचित सन्मान करतो,आपले सण-उत्सव जल्लोषात साजरे करतो,आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि हिंदू धर्म जोपासतो त्याने उद्या जागतिक नववर्षारंभ म्हणून जल्लोष करायला आणि आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायला हरकत नाही.अर्थात हा जल्लोष हिंदू संस्कृतीला शोभेल असाच आणि मर्यादित असावा.

हिंदू धर्म कधीच इतर धर्मांचा अपमान करण्याची शिकवण देत नाही.हा धर्म विश्वव्यापी आहे.हिंदू धर्मग्रंथातसुद्धा इतर धर्मांच्या बाबतीत अपमानास्पद मजकूर नाही.इतर धर्मांचा अपमान करून हिंदू धर्म मोठा झालेला नाही.इतर धर्माच्या योग्य आणि विज्ञानाला धरून असलेल्या प्रथांचा आदर केला पाहिजे हे खरं,पण जो आपल्या धर्माचा मान राखू शकत नाही तो दुसऱ्या धर्माचा मान कसा राखणार? आम्ही आधी हिंदू आहोत.हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे.“गर्वसे कहो हम हिंदू है” ही भूमिका मान्य असेल तर तुम्ही खुशाल दुसऱ्या प्रथा-परंपरांचा सन्मान करा.त्यास कोणाचाही आक्षेप नाही.हिंदू धर्माला तुच्छ लेखून जर कोणी इतरांच्या धर्माचा कौतुक सोहळा करत असेल तर तर मात्र आम्ही कदापि सहन करणार नाही.अशा बाटग्या लोकांना धडा शिकवायलाच हवा.

उद्या इंग्रजी नववर्षारंभ असला तरी कॅलेंडर सोडून काय बदलणार आहे? हिंदू नववर्षारंभ गुढीपाडव्याला होतो.त्यादिवशीपासून ऋतुमान बदलत.त्याला शास्त्रीय आधार आहे.तो निसर्गचक्राचा आरंभ असतो.इंग्रजी नववर्षारंभ हा १ जानेवारीला असतो आणि त्याला शास्त्रीय आधार नाही.फक्त कॅलेंडर बदलून परिस्थिती बदलेल काय? तरीही जागतिक कॅलेंडर बदलणार म्हणून हा नववर्षारंभ स्वीकारताना स्वधर्माचा अनादर होता कामा नये.स्वधार्माभिमान हवाच..!हे जर मान्य असेल तर उद्या खुशाल नववर्षारंभ साजरा करा.नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!



जय महाराष्ट्र..!

Sunday, 25 December 2016


“वाघगर्जना”

(कृतज्ञता दिन विशेष लेख:)

यावेळी सगळचं बदललय..!

लाख-लाख धन्यवाद..!

माझ्या फेसबुकवरील शिवसैनिक बांधवांनो..आज २५ डिसेंबर.आज “कृतज्ञता दिन”.आजपासून तीन वर्षांपूर्वी आम्ही लेखणी हातात घेतली.तेंव्हापासून ते आजपर्यंतचा हा तीन वर्षांचा अविरत प्रवास तुमच्या साथीने आणि सोबतीने यशस्वी झाला आहे आणि आपल्या कृपा-आशीर्वादाने तो यापुढेही अखंड सुरु राहील हीच आई तुळजाभवानी मातेचरणी प्रार्थना..!

आज लेखाच्याच माध्यमातून आपल्याशी संवाद साधावा,आपले आभार मानावेत म्हटलं.खरतर आजचा दिवस माझा नसून तुमचा आणि तुमचाच आहे.प्रत्येक लेख लिहिल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद हा आमच्यासाठी शक्तिवर्धक म्हणून काम करतो.त्यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.प्रत्येक लेखांवर लाईक,कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पाडणाऱ्या माझ्या शिवसैनिक बंधू-भगिनींशी प्रत्येकवेळी संवाद साधून आभार मानण शक्य होत नाही.त्यासाठीच आज “कृतज्ञता दिन” हा आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आणि आपणास लाख लाख धन्यवाद देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणेच आयोजित केला आहे.२५ डिसेंबर २०१३ रोजी सुरु झालेल्या माझ्या लेखांचं प्रकाशन आठवड्यात एक दिवस फेसबुक अकाऊंट आणि पेजेसवरून व्हायचं.सुरुवातीपासूनच लेखांना उदंड प्रतिसाद मिळाल्याने त्यातून प्रेरणा घेऊन २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या प्रचारातील खारीचा वाटा उचलायचा म्हणून लेखणीच्या माध्यमातून तोफा डागण्याच शिवधनुष्य आम्ही यशस्वीपणे पेलवल.

२०१४ साली आपले आभार मानण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच कृतज्ञता दिन साजरा झाला.ज्या दिवशी लेखणी हातात घेतली तो दिवसच या प्रवासात साथ देणाऱ्या शिवसैनिक बांधवांना अर्पण करण्याचा निर्णय घेत पहिला कृतज्ञता दिन आयोजित केला गेला.त्याच दिवशी या लेखमालेच नामकरण “वाघगर्जना” अस करण्यात आलं.त्यानंतर २०१५ साली कृतज्ञता दिनाच औचित्य साधून “वाघगर्जना” च्या ब्लॉगसाईट,ट्विटर,युट्युब आणि जीमेल अकाऊंटसचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला.या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या चारही अकाऊंटसचा उद्घाटन सोहळा आम्हाला साथीदार म्हणून लाभलेल्या शिवसैनिकांच्या हस्ते पार पडला.ऑनलाईन पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याचे आपण साक्षीदार आहातच.

आज आम्ही हा प्रवास सुरु करून तब्बल तीन वर्षे लोटली आहेत.असं असलं तरी आपल्याला अजूनही हा प्रवास असाच सुरु ठेवायचा आहे.आता झालंय काय की मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या आणि इतर ८ महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत.मुंबई आणि ठाण्यावर भगवा,भगवा आणि भगवाच फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.त्याचबरोबर इतरही आठ महानगरपालिका जिंकण्यासाठी आपल्याला जिवाच रान करायचं आहे.आपण सगळे आपापल्यापरीने प्रचाराचा धडाका उडवत आहातच.लवकरच त्यात आम्हीही सामील होऊ.यावेळी सगळचं बदललय..! सकाळपासून ते पार संध्याकाळपर्यंत आमच वेळापत्रक व्यस्त होऊन गेलंय.त्यामुळे आमच्या पोस्टचं प्रमाण कमी झाल असलं तरी “वाघगर्जना” मात्र अविरत घुमत आहे.वेळात वेळ काढून लेख लिहिण आम्ही सांभाळल आहे,मात्र ते पूर्वीइतके पसरवण्यासाठी वेळ देता येत नाही.काय करणार? असो.दिवसभर व्यस्त असलो तरी मन शांत नसतच.शिवसेनेवर टीका करणारी माकड पाहिली की व्यंगचित्र काढायला हात आतुर असतो.व्यंगचित्रकार नसलो तरी मागे आम्ही जी व्यंगचित्र काढलेली होती ती गाजली होती.ठीक आहे.नाहीतरी या किरीट सोमय्या,आशिष शेलार आणि अमित शहांची व्यंगचित्र काढायची गरजचं काय आहे? त्यांच्याकडे बघितलं तरी कार्टूनच दिसेल.     

तो टकला गेंडा अमित शहा मुंबई स्वबळावर जिंकण्यासाठी डावपेच आखतोय.पंतप्रधान मोदीही मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रचारात उतरणार असल्याच वृत्त आहे.अहो,तुमच्या सगळ्या फौजा घेऊन या,पण एक लक्षात ठेवा गाठ शिवसैनिकांशी आहे.तुम्हाला धूळ चारल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.येत्या वर्षातील या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा स्वबळावर फडकवायचा असल्यास त्याच्या तयारीला आत्तापासूनच लागायची गरज आहे.त्यासाठी आपण सगळे अहोरात्र झटत आहातच.आम्हीही लवकरात लवकर या रणमैदानात उडी घेत विरोधकांना पळता भुई थोडी करू असं आपणा सर्वांना वचन देतो.नेहमीप्रमाणे “वाघगर्जना” बुलंद करण्यासाठी आपली साथ लाभेल अशी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करतो.आपणा सर्वांना लाख-लाख धन्यवाद देतो.आपणा सर्वांना कृतज्ञता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन तूर्तास आपली रजा घेतो.लाख-लाख धन्यवाद..!



जय महाराष्ट्र..!             

Sunday, 18 December 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

जातीयवादी सर्प ठेचायलाच हवा..!

अटलजी आओ,बीजेपी बचाओ..!

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या अमित शहाचे आदिलशाही मनसुबे काल प्रसारमाध्यमांतून झळकल्याने भाजपतील अंतर्गत घडामोडी जगासमोर आल्या.गुजरात राज्यातून तडीपार करण्यात आलेल्या अमित शहाला महाराष्ट्रातील निष्कलंक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय अडचण होत असल्याच वृत्त आहे.अर्थात हा सगळा प्रकार भाजपचा अंतर्गत मामला असला तरी जातीयवादी अमित शहाच्या टकलावर तबला वाजवण्याची वेळ आता जवळ आलेली आहे.केवळ ब्राह्मण आहेत म्हणून फडणविसांना मुख्यमंत्री पदावरून हटवले जाणार असेल आणि मुख्यमंत्री पदावर मराठा व्यक्तीस बसवण्याचे गाजर दाखवून मराठा समाजाचा रोष शमवणे असा डाव अमित शहा रचत असल्याचे भाजपच्याच सूत्रांनी सांगितले आहे.हा प्रकार महाराष्ट्रात जातीयवाद भडकवणारा असून याची सर्वांनीच दखल घ्यायला हवी.तरच महाराष्ट्रात जातीयवादी विष पसरणार नाही.महाराष्ट्रहितासाठी हा जातीयवादी सर्प ठेचायलाच हवा..!

महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे.कित्येक वर्षांनी एकत्र आलेला मराठा समाज लाखोंच्या संख्येने क्रांती मोर्चाचा रुपात न्याय आणि हक्कासाठी पेटून उठलेला आहे.मराठा समाजाच्या या मोर्चात फक्त मराठा म्हणून एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन आयोजकांनी केलेलं असून या मोर्चांमध्ये सर्वच स्तरावरील लोक केवळ समाजाच्या हितासाठी एकत्र आलेले आहेत.मराठा क्रांती मोर्चा हा कोणत्याही जातीविरोधात नसून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी उठवला जाणारा आवाज आहे.यात ब्राह्मण मुख्यमंत्री बदलून मराठा मुख्यमंत्री करण्याची मागणी कुठे आहे? मराठा मुख्यमंत्री करण्याचे गाजर दाखवून मराठ्यांचे आपल्या मागण्यांवरून लक्ष विचलित करायचे आणि मराठा मोर्चाचे लोण कमी करायचे असा अमित शहाचा डाव असावा.मराठा मुख्यमंत्री बसवण्याच्या गाजराला भुलून पेटून उठलेला मराठा शांत होणार नाही हे गुजरातच्या टकल्याने लक्षात घ्याव.

महाराष्ट्र शिवछत्रपतींचा मुलुख आहे.मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या संस्कारात घडलेला आहे.शिवरायांनी कधीच जातीयवाद केला नाही.त्यांच्यासोबत स्वराज्याच्या लढाईत सर्वच जातीधर्माचे मावळे होते.“गोब्राह्मण प्रतिपालक” अशी कीर्ती असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला मराठा समाज कधीच कोणत्याही जातीविरोधात नव्हता.त्यांच्या सध्या जो लढा सुरु आहे तो कोणत्याही जातीविरोधात नाही.मराठ्यांची माथी भडकावून आणि त्यांच्या मनात जातीयवादी विष कालवून महाराष्ट्र काबीज करण्याचा अमित शहाचा डाव असून मराठे त्याला भिक घालणार नाहीत.

शिवरायांच्या कार्यकाळापूर्वी मोगलांनी जो प्रकार करून महाराष्ट्र काबीज करण्याचा डाव यशस्वी केला होता तोच प्रकार आजही सुरु आहे.महाराष्ट्रातील लोकांना एकमेकांच्या विरोधात भडकावून त्यांना आपले सामर्थ्य परस्परांत भांडण्यात खर्च करायला लावून स्वतः महाराष्ट्रावर सत्ता गाजवायची असे मनसुबे अमित शहाचे आहेत.हे मनसुबे उधळून लावायला महाराष्ट्रातील मराठी माणूस समर्थ आहे.या मातीने अनेक विडे उचलणाऱ्यांना मूठमाती दिलेली आहे.शिवरायांच्या महानिर्वाणानंतर महाराष्ट्र काबीज करायला स्वतः औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात उतरला होता.औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाहीच,मात्र त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रातच बांधली गेली हा इतिहास अमित शहाने वाचला आहे काय?

महाराष्ट्रावर एकहाती सत्ता गाजवण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या अमित दीडशहाण्याने म्हणे शिवसेनेच्या २० आमदारांना लालच दाखवून फोडायचा प्रयत्न केला होता.अरे गेंड्या,हा महाराष्ट्र आहे,ही शिवसेना आहे.इथे निष्ठेला किंमत आहे.शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत आणि फुटले तरी टिकणार नाहीत.मुळात शिवसेनेची ताकद ही आमदारांच्या संख्येवर अवलंबून नसून शिवसैनिकांच्या निष्ठेवर अवलंबून आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही सेना शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन आणि रक्ताचं पाणी करून उभी केली आहे.तुमच्यासारखी फोडाफोडी करून शिवसेना उभी राहिलेली नाही.शिवसेना संपवायला निघालेले संपले,पण शिवसेना अजून जिवंत आहे आणि ज्वलंत आहे.

अमित शहा नामक टकल्या गेंड्याची कार्यपद्धती ही मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या निष्ठावंतांना मान्य नाही.फक्त प्रश्न एवढाच आहे की मोदी-शहा जोडीच्या विरोधात जाण्याच धाडस कोण दाखवणार? हे धाडस दाखवणारा पुढे येई तेंव्हा येईल,मात्र तो येईपर्यंत हा दीडशहाणा भारतीय जनता पक्षाची वाट लावणार हे निश्चित.आम्ही शिवसैनिक असलो तरी एकेकाळी मित्रपक्ष म्हणून भाजपच्या सोबत काम केलेलं आहे.आज भाजपमध्ये जे घडतय ते आम्हाला बघवत नाही.सत्तेचा माज,सत्तेची नशा चढण वाईट असत अस म्हणतात तेच खरं.अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणींच्या काळात अस कधी घडल नाही.आज खरचं अटलबिहारी वाजपेयींची भाजपला गरज आहे.अन्यथा बीजेपीचा विनाश अटळ आहे.अटलजी आओ,बीजेपी बचाओ..!



जय महाराष्ट्र..!

Saturday, 17 December 2016

"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

नोटाबंदीची झळ जनसामान्यांनाच..!

भाबड्या जनतेची अपेक्षा..!

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार ५०० आणि १००० च्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यास आता केवळ १३ दिवस उपलब्ध आहेत.नोटाबंदीस जवळपास ४० दिवस उलटले असले तरी देशातील जनता अजून बँका आणि एटीएमच्या रांगेतच उभी आहे.मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोटाबंदीची झळ सोसत पैसे बदलण्यासाठी अथवा आपला पगार घेण्यासाठी हालअपेष्टा सोसत रांगेत उभी असलेली सामन्य जनता नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल या आशेने मोदींच्या पाठीशी आहे.प्रत्यक्षात मात्र भोळ्या प्रजेची ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये.यामागील महत्वाचं कारण म्हणजे आजही देशभरात कित्येक हजार कोटी रक्कम काळ्या पैशाच्या स्वरूपात पकडली जात आहे.महत्वाचं म्हणजे ही रक्कम जुन्या नोटांच्या नव्हे तर नवीन नोटांच्या स्वरूपात असल्याचं चित्र दिसतंय.याचा नेमका अर्थ काय आहे?

"अच्छे दिन" येतील या भाबड्या आशेने जनता मोदींच्या ५० दिवस त्रास करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देताना दिसली खरी मात्र आता जनतेचा धीर सुटत चाललेला आहे.नोटबंदीचा फास आवळूनही सापडत असलेला पाण्यासारखा काळा पैसा,काळा पैसा पांढरा करताना जाळ्यात अडकलेले कर्मचारी पाहून जनता हताश झाली आहे.काळ्या पैशाच्या स्वरूपातील जुन्या नोटा बदलून नव्या नोटा मिळवणारे आणि त्यांना नोटा बदलून देणारे अधिकारी पाहून जनता साफ निराश झालेली आहे.अवैध मार्गाने नोटा बदलून देण्यात चक्क आरबीआयपासून ते मोठमोठ्या बँकापर्यंत रॅकेट सुरु असून त्यात अधिकारी वर्गाचाही समावेश आहे.हे सर्व सामान्य जनतेच्या कल्पनेपलीकडील आहे.त्यामुळे हे सगळं पाहताना जनतेच्या मनात प्रश्नांचं वादळ घोंघावतंय.सामान्य जनतेला गरजेपुरती रक्कमही उपलब्ध होणं अवघड झालेलं असताना ज्या रकमांचे आकडे लिहिणं सोडाच,पण वाचणं किंवा लक्षात ठेवणंही सामान्य जनतेला कठीण वाटत एवढ्या रकमेच्या नोटा भ्रष्ट लोकांनी कशा बदलून घेतल्या? त्यात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या नेमकी किती? "सापडला तो चोर" या न्यायाने पकडलेल्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेलच,पण जे सापडणार नाहीत त्यांचं काय? ते सहीसलामत सुटले.याचा अर्थ नोटबंदीचा निर्णय फसला का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत.याची उत्तरे कोण देणार?

मोदींच्या आवाहनानुसार अजून जवळपास १२ दिवसांनी जनता त्रासमुक्त होण आणि "अच्छे दिन" सुरु होण अपेक्षित आहे.सध्या या निर्णयाला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला असून काळ्या पैशाला आळा बसण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.मग आगामी दहा-बारा दिवसात अशी काय जादू होणार आहे? भ्रष्ट लोकांनी दिलेल्या मुदतीच्या आधीच कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करून घेतला किंवा नवीन नोटांच्या स्वरुपात रुपांतरीत केला.मग नोटाबंदीचा काय उपयोग? उलट नव्या २००० च्या नोटांमुळे हे पैशांचे ढीग साठवण सोपं झालं असल्याच दिसत.म्हणजे नोटाबंदीची झळ फक्त जनसामान्यांनाच..! हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे.त्यामुळे या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी नोटाबंदीचे नेमके फलित काय? हा यक्षप्रश्न आहे.

नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाला तर सर्वांनाच आनंद आहे.आगामी काळात या निर्णयाचा निकाल लागेल आणि त्याचे परिणाम समोर येतील.हे परिणाम चांगलेच असावेत आणि जनसामन्यांची भाबडी आशा सार्थ ठरवणारे असावेत अशीच आमची इच्छा आहे.नोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी घेण्यास आपली ५६ इंचाची तथाकथित छाती घेऊन पुढे येण्याची तयारी पंतप्रधान मोदींनी दाखवली आहे,मात्र हा निर्णय फसल्यास नुसती जबादारी घेऊन काय फायदा? देशाची झालेली आर्थिक हानी आणि सामान्य जनतेने सोसलेल्या त्रासाची,तसेच गमावलेल्या प्राणाची भरपाई कशी होणार? या सगळ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मोदींनी जनतेच्या मनातील गोष्ट समजून घ्यावी आणि हा गुंता सोडवावा हीच भाबड्या जनतेची अपेक्षा..!


जय महाराष्ट्र..!






Saturday, 10 December 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

स्वबळाची व्याख्या काय?

मोदीजी याच..!

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानुसार भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला.भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले.नेहमीप्रमाणे या वेळीही यशामुळे भाजप नेत्यांचा अतिउत्साह ओसंडून वाहिला.भाजपच्या अनेक नेत्यांनी आगामी वर्षात होणार महाराष्ट्रातील प्रमुख दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांत स्वबळावर लढण्याचा मानस व्यक्त केला.त्यासाठी त्यांना शुभेच्छा,पण आमच्या मनात काही प्रश्न आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे भाजप नेत्यांना देता आली तर आमचं शंकानिरसन होईल.त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे भाजपची स्वबळाची व्याख्या काय? एखाद्या पक्षाने स्वतंत्र राहून निवडणूक लढवल्यास त्या पक्षाने ती निवडणूक स्वबळावर लढवली अस म्हटलं जातं. उदाहरणार्थ, शिवसेनेने २०१४ साली झालेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली.भाजप नेते नेहमीच स्वबळाचा शंख फुंकत असतात.प्रत्यक्षात मात्र भाजप स्वबळावर लढताना दिसत नाही.

२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढत प्रचंड यश मिळवलं,मोदींच्या लाटेत भाजपचे तब्ब्ल १२३ ओंडके तरंगले असं नेहमीच बोललं जात.प्रत्यक्षात मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढवलीच नाही.त्यांच्यासोबत रिपाई(आ), स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष,शिवसंग्राम असे तब्बल चार मित्रपक्ष होते.शिवाय एवढं करूनही जिथं उमेदवार देता येत नव्हता तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांना भाजपचं लेबल चिकटवून निवडणुकीत उतरवलं होत.आता महायुतीत जनसुराज्य पक्षाचीही भर पडली आहे.असं असताना भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असं कसं म्हणता रावं? स्वबळाच्या नावाखाली तब्बल सहा पक्ष एकत्र येऊन शिवसेना संपवण्याचा डाव रचणे आणि महाराष्ट्र काबीज करणे आणि नंतर त्याची शकले करून वेगळा विदर्भ,वेगळी मुंबई करणे हा भाजपचा मनसुबा आहे.

या प्रश्नासोबतच आमच्या मनात सध्या अजून काही प्रश्न आहेत.मुंबई-ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढण्याइतपत उमेदवार आणि कार्यकर्ते भाजपकडे आहेत काय? बाकीच्या पक्षातील उमेदवार फोडूनही भाजपाला सगळ्या जागांवर उमेदवार देता येतील काय? मित्रपक्षांना गाजर दाखवून सोबत घेण्याचा प्रकार यावेळीही पाहायला मिळणार आहे काय? जवळपास संपलेल्या मनसेला सोबत घेऊन राज ठाकरेंच्या भाषणबाजीचा वापर शिवसेनेविरोधात करून मराठी मतात फूट पाडण्याचं आणि मुंबई बळकावण्याचं स्वप्नं भाजप नेत्यांना सतावतंय काय? या प्रश्नांची उत्तरं जर "हो" अशी असतील तर भाजपकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याइतपत सामर्थ्य नाही असच म्हणावं लागेल.असो.तुमच्या "त्वबलाला" शुभेच्छा.भाजपने मुंबई आणि ठाणे महानगरपालिका संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर (म्हणजे भाजप,रासप,रिपाई(आ.),स्वा.शे.संघटना,शिवसंग्राम,मनसे,जनसुराज्य (अजून कोणी राहिलं काय?) मिळून) लढवावी.इतक्या पक्षांची मोट बांधल्यावर प्रचारकार्य सोपे व्हावे म्हणून या महायुतीचा झेंडा पांढरा ठेवावा.त्याचे दोन फायदे होतील.एक तर सर्व पक्षांना त्यांच्या झेंड्यातील रंग महायुतीच्या झेंड्यात असल्याचे समाधान लाभेल,कारण सगळे रंग मिसळल्यास पांढरा रंग तयार होतो.दुसरं म्हणजे शिवसेनेच्या वाघाचे "फटकारे" बसल्यानंतर आणि शिवसेना विजयी झाल्यानंतर हाच पांढरा झेंडा फडकवून पराभव मान्य (भाजपकडे तेवढं मोठ मन आहे काय?) करता येईल.

या प्रश्नासोबतच आमच्या मनात सध्या अजून काही प्रश्न आहेत.मुंबई-ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढण्याइतपत उमेदवार आणि कार्यकर्ते भाजपकडे आहेत काय? बाकीच्या पक्षातील उमेदवार फोडूनही भाजपाला सगळ्या जागांवर उमेदवार देता येतील काय? मित्रपक्षांना गाजर दाखवून सोबत घेण्याचा प्रकार यावेळीही पाहायला मिळणार आहे काय? जवळपास संपलेल्या मनसेला सोबत घेऊन राज ठाकरेंच्या भाषणबाजीचा वापर शिवसेनेविरोधात करून मराठी मतात फूट पाडण्याचं आणि मुंबई बळकावण्याचं स्वप्नं भाजप नेत्यांना सतावतंय काय? या प्रश्नांची उत्तरं जर "हो" अशी असतील तर भाजपकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याइतपत सामर्थ्य नाही असच म्हणावं लागेल.असो.तुमच्या "त्वबलाला" शुभेच्छा.भाजपने मुंबई आणि ठाणे महानगरपालिका संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर (म्हणजेभाजप,रासप,रिपाई(आ.),स्वा.शे.संघटना,शिवसंग्राम,मनसे,जनसुराज्य (अजून कोणी राहिलं काय?) मिळून) लढवावी.इतक्या पक्षांची मोट बांधल्यावर प्रचारकार्य सोपे व्हावे म्हणून या महायुतीचा झेंडा पांढरा ठेवावा.त्याचे दोन फायदे होतील.एक तर सर्व पक्षांना त्यांच्या झेंड्यातील रंग महायुतीच्या झेंड्यात असल्याचे समाधान लाभेल,कारण सगळे रंग मिसळल्यास पांढरा रंग तयार होतो.दुसरं म्हणजे शिवसेनेच्या वाघाचे "फटकारे" बसल्यानंतर आणि शिवसेना विजयी झाल्यानंतर हाच पांढरा झेंडा फडकवून पराभव मान्य (भाजपकडे तेवढं मोठ मन आहे काय?) करता येईल.

आणखी एक अतिमहत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा.मुंबई,ठाण्यात आणि पुण्यात साक्षात पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची बातमी आहे.मुंबईवर भाजपचाच झेंडा फडकावा यासाठी भाजपचे देशभरातील राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री,आमदार,खासदार रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.पंतप्रधान मोदी या लढाईचे नेतृत्व करण्यासाठी आणि भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येऊन सभा घेण्याचीही शक्यता आहे.मोदीजी याच..! गाठ शिवसेनेशी आहे.विधानसभेला वाघाच्या तावडीतून सुटला असाल,पण आता नाही.महाराष्ट्रात तुमचे जेवढे आमदार आहेत त्याच्या दुप्पट मुंबईत शिवसेनेच्या शाखा आहेत.प्रत्येक शाखेत शेकडो-हजारो शिवसैनिक आहेत.महत्वाचं म्हणजे शिवसेनेची पक्षबांधणी अगदी मजबूत आहे.मराठी,महाराष्ट्र आणि मुंबई यासाठी शिवसेनेने कायम जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे.मुंबईतील मराठी आणि हिंदू शिवसेनेच्या पाठीशी आहे.आम्ही पॅकेजचे गाजर दाखवून नव्हे तर आम्ही केलेल्या विकासकामांच्या बळावर जनतेचा विश्वास जिंकणार आहोत.तेंव्हा मोदीजी,तुम्ही याच.एकटं नको,फौजफाटा घेऊन या.तुम्हाला शिवरायांच्या गनिमी काव्याची पुनरावृती करून धूळ चारायला आणि मुंबई जिंकायला शिवसैनिक समर्थ आहे.

जय महाराष्ट्र..!

Thursday, 1 December 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

पडदा फाटला

सत्य झाकता येत नाही हेच खरे...!

नुकत्याच हाती आलेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानुसार महाराष्ट्रात शिवसेनेने प्रचंड यश मिळवत आहे.मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.शिवसेनेची ही वाटचाल नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.विशेष बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांनी या निवडणुकीची जबाबदारी शिवसैनिकांच्या खांद्यावर सोपवलेली होती.त्यामुळे या निवडणुकांच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुख उतरलेले नव्हते.प्रचाराची धुरा ही स्थानिक पदाधिकारी,संपर्कप्रमुख आणि शिवसैनिकांनीच सांभाळली होती.या निवडणुकीत मिळालेले यश हे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचे शिवसैनिकांच्या निष्ठेचे प्रतीक आहे.शिवसेनेच्या या विजयाची तुलना इतर कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या विजयाशी करता येणार नाही.

या निवडणुकांत सरकारची तसेच विरोधी पक्षांची जनमत चाचणी होणार होती.शिवसेना सत्तेत सहभागी आहे.सत्तेत असूनही सरकारच्या चुकीच्या निर्णयांना ठाम विरोध करण्यात शिवसेना अग्रेसर असते.शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे.शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा झालेली नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी घेतलेली ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका आहे.याच भूमिकेवरून शिवसेनेवर सातत्याने टीका होत असते.शिवसेनेची ही भूमिका दुटप्पीपणाची असून महाराष्ट्रातील जनता ती स्वीकारणार नाही आणि याचा शिवसेनेला निवडणुकीत फटका बसेल असे चित्र सर्वांनीच निर्माण केले होते.महाराष्ट्रातील जनतेने मात्र शिवसेनेच्या बाजूने कौल देत शिवसेनेच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.या निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले आहे.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नोटबंदी निर्णयानंतर ही पहिलीच जनमत चाचणी ठरली.भाजपच्या म्हणण्यानुसार ९३% जनता मोदींच्या पाठीशी असल्याने मोदींच्या निर्णयात त्रुटींमुळे गैरसोयींबद्दल शिवसेनेने बोलणं चुकीचं आहे.ही भूमिका राज्यातील जनतेला मान्य नाही.त्यामुळे जनता भाजपला कौल देईल.निवडणुकांचे निकाल पाहता भाजपला या निवडणुकीत प्रचंड यश मिळालेले आहे.भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक विजयी झालेले आहेत.हे चित्र जितकं स्पष्ट आहे तितकाच मिळालेल्या यशाचं चित्र स्पष्ट आहे.त्यामुळे जनतेला शिवसेनेची भूमिका मान्य आहे हेच दिसून येते.जनतेचा केवळ पाठिंबा असता आणि शिवसेनेला विरोध असता तर या निवडणुकीत भाजपला यापेक्षाही दुप्पट यश मिळाले असते आणि शिवसेनेला निम्मे यश मिळाले असते.प्रत्यक्षात असं घडलं नाही.

या निवडणुकांच्या निकालातून एक निष्कर्ष येईल.तो असा की मोदींची लाट आहे,मोदींना जनतेचा पाठिंबा आहे,जनता भाजपच्याच पाठीशी आहे आणि मोदी जे करतील ते जनतेला मान्य असून जनता भाजपलाच देईल असे एकंदरीत जे चित्र निर्माण केलं ते साफ खोटं आहे.मोदींची लाट ही प्रामुख्याने प्रसारमाध्यमे आणि सोशल नेटवर्किंग साईट्स पूर्ती मर्यादित आहे.मतदानावर मात्र त्या लाटेचा प्रभाव नाहीये.असा निष्कर्ष काढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं भरघोस यश.शिवसेना सरकारमध्ये असून सरकारच्या भूमिकांना विरोध कसा करते? शिवसेना सरकारमधून बाहेर पडून सरकारला का विरोध करत नाही? शिवसेनेची सरकारच्या निर्णयाला विरोध भूमिका केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या निकालाने शिवसेनेची ताकद आणि लोकमान्यता दिसली असेलच.मोदींना विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्र निर्माण करणाऱ्यांना या निकालाने चांगलाच धडा शिकवलेला आहे.तेंव्हा आंधळ्या मोदीसमर्थकांनी "कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही" हे लक्षात घ्यावं.

राज्यातील प्रसारमाध्यमांनी मोदिनामाचा जप करण्याऐवजी शिवसेनेच्या भूमिकेचा अभ्यास करून त्यातले तथ्य शोधले असते आणि शिवसेनेच्या भूमिकेला न्याय दिला असता तर आज शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपच्या दुप्पट असते.ही आजची पत्रकारिता निःपक्षपाती मुळीच राहिलेली नाही. शिवसेनेने काहीही केलं तरी त्यावर टीकेचा भडीमार करायचा आणि इतरांनी काहीही केलं तरी त्यांचा उदोउदो करायचा हा दुजाभाव कशासाठी? असो.सत्य शोधण्यापेक्षा जनतेच्या डोळ्यासमोर मोदीलाटेचा पडदा निर्माण करण्यातच आजकालचे पत्रकार धन्यता मानत आहेत.नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालामुळे हा पडदा फाटला आहे.महाराष्ट्रातील सुज्ञ आणि सुजाण जनतेने तो फाडला आहे.सत्य झाकता येत नाही हेच खरे...!


जय महाराष्ट्र..!