युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांनी केलेली सहा महत्वाची कामे ज्यामुळे आदित्य ठाकरे कायमन चर्चेत राहिले.
युवती आत्मसंरक्षण: महिला आणि युवतींवर
होणारे अन्याय व अत्याचार
हा जगभरातील ज्वलंत
सामाजिक प्रश्न आहे. ज्या
वयात मुलींमागे शिट्ट्या
मारत फिरणं अनेक
तरुणांना महत्वाचं वाटत त्याच
वयाच्या आदित्य ठाकरेंनी युवासेनेच्या
माध्यमातून शाळा-महाविद्यालयांत
जाऊन महाराष्ट्रातील लाखो
युवतींना आत्मसंरक्षणाचे धडे देत
त्यांना भयमुक्त केले आहे.
प्लास्टिक
बंदी: मुंबईसारख्या शहरात प्लास्टिक कचऱ्यामुळे
पावसाळ्यात पूर येऊन
हाहाकार उडतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील
अनेक नद्यांना पूर
येऊन गावंच्या गावं
पाण्याखाली जातात. प्लास्टिकमुळे मुक्या
प्राण्यांना आणि एकूणच
निसर्गाला हानी पोहोचते.
या सर्व प्रश्नांवर
तोडगा म्हणून युवासेनाप्रमुख
आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात प्लास्टिक
बंदीचा प्रस्ताव आणून तो
कायदा मंजूर करून
घेतला. सध्या सरसकट प्लास्टिक
बंदी झालेली नसली
तरी मोठ्या प्रमाणावर
प्लास्टिकचा वापर घटला
आहे. भविष्यातील गंभीर
समस्या टाळण्यासाठी हे पाऊल
महत्त्वाचं ठरेल.
बारावी बोर्ड परीक्षा व
निकाल: २०१३ साली
बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या निर्णयाचा बसणारा
फटका लक्षात घेऊन
आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट
घेतली आणि प्रॅक्टिकल
व थेअरी या
दोन्ही परीक्षांचे गुण एकत्रित
करून निकाल लावण्याची
मागणी केली.त्यामुळे
फक्त थेअरी परीक्षेचे
गुण ग्राह्य धरल्यास
नापास होणारे अनेक
विद्यार्थी पास झाले.
तसेच २०१३ साली
फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका हि
प्रमाणाबाहेर कठीण होती
त्यावरही युवासेना प्रमुखांनी विद्यार्थ्यांची
बाजू मांडली होती.
बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी
MH CET परीक्षेपूर्वी
युवासेना मोफत YS CET या
सराव परीक्षेचे आयोजित
करते. शिवाय या
परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची
तज्ज्ञांच्या व्हिडीओ मार्गदर्शनासहित विद्यार्थ्यांना
मोफत उपलब्ध करून
दिली जातात.
महापालिका
शाळांचे डिजिटल रूप: विद्यार्थ्यांना
दप्तराचे ओझे वाहायला
लागू नये यासाठी
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये
डिजिटल क्लासरूम सुरु करण्यात
तसेच विद्यार्थ्यांना महापालिकेद्वारे
मोफत टॅब देण्यात
आदित्य ठाकरेंचा पुढाकार आहे.
असं करणारी मुंबई
महापालिका ही देशातील
पहिली महानगरपालिका असून
याद्वारे शिवसेनेने इतर पालिकांसमोर
आदर्श ठेवला आहे.
तरुणांसाठी
मैदाने आणि ओपन
जिम: तरुण वर्गाला
शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी शहरांत
खेळाची मैदाने आणि ठिकठिकाणी
ओपन जिम उभ्या
करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे
यांचीच. आज अंधेरी
क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय
दर्जाचे फुटबॉल मैदान उभे
असून त्यावर आंतरराष्ट्रीय
आणि नावाजलेल्या क्लबचे
सामने भरवण्यात आदित्य
ठाकरेंची मोलाची भूमिका आहे.
याशिवाय युवासेनेतर्फे महाविद्यालयीन खेळाडूंसाठी "युवा खेळ
समिट" आयोजित केली जाते.
दुष्काळग्रस्तांना
मदत: दुष्काळ हा
महाराष्ट्रासमोरील ऐक अत्यंत
भीषण सामाजिक प्रश्न
आहे.युवासेनाप्रमुख आदित्य
ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना
अन्नधान्य तसेच रोख
रक्कम देत शेतकऱ्यांचे
अश्रू पुसण्याचं कार्य
केलं आहे. दुष्काळ
प्रश्नावर स्वखर्चाने मदत पुरवणारा
शिवसेना एकमेव पक्ष आहे
तर थेट बांधावर
जाऊन पाहणी करणारे
आणि मदत पुरवून
दुष्काळाची तीव्रता कमी करणारे
आदित्य ठाकरे हे एकमेव
युवा नेते आहेत.
No comments:
Post a Comment