Sunday, 23 October 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

भाजपच्या कर्माचे फळ..!

मुंबई-ठाण्यावर भगवाच फडकेल..!

आगामी वर्षात मुंबई,ठाणे,पुणे,नागपूर,नाशिक,पिंपरी-चिंचवड,सोलापूर अशा महाराष्ट्रातील तब्बल १० महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.त्याचसोबत अनेक नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही याच काळात होणार आहेत.महाराष्ट्रात इतकी वर्षे या निवडणुका प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशाच लढल्या गेल्या.मनसे हा पक्ष सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नसला तरीही २०१२ साली मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक या महानगरपालिकांच्या निवडणुकांत मनसेच अस्तित्व उदयाला आलं होत.यापैकी पुण्यात मनसे विरोधीपक्ष तर नाशिकात चक्क सत्ताधारी पक्ष ठरलेला होता.त्यामुळे किमान या महापालिकांत मनसेच नावं विजयी पक्ष म्हणून समोर आल नाही तरी पराभूत म्हणून मात्र चर्चिलं जाईल.बाकी बहुतांश ठिकाणी आघाडी विरुद्ध युती किंवा काँग्रेस,राष्ट्रवादी विरुद्ध युती असाच सामना इतकी वर्षे रंगला.अगदी २०१२ पर्यंत हेच चित्र कायम होते.२०१४ ला लोकसभा निवणूक झाली.त्यावेळी मोदी लाटेमुळे भाजपला प्रचंड यश मिळाले.त्या विजयाची मस्ती भाजप नेत्यांना चढली आणि शिवसेना-भाजप ही तब्बल २५ वर्षे अभेद्य राहिलेली युती तुटली.

२०१४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १२३ तर महाराष्ट्रात एकाकी टक्कर देणाऱ्या शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या.मोदींचा चौफेर उधलेला विजयरथ महाराष्ट्रात शिवसेनेने अडवला.भाजपला मिळालेल्या १२३ जागा हे यश प्रचंड असलं तरी ते बहुमताच्या आकड्यापासून २१ पावलं दूरचं होत.त्यामुळे साहजिकच शिवसेनेला सोबत घेण भाजपसाठी बंधनकारक ठरलं.त्यातही मोदी लाटेमुळे आणि आयात उमेदवारांमुळे मिळालेल्या यशामुळे हवेत गेलेल्या भाजपने शिवसेनेला कमी महत्वाची खाती देत दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला.विधासभा निवडणुकीनंतर शिवसेनेला कमी लेखण हा भाजप नेत्यांचा एककलमी कार्यक्रम ठरलेला आहे.त्याउलट शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपने दिलेला वाटा स्वीकारला.त्यावेळी भाजप नेत्यांनाच काय तर महाराष्ट्रालाही शिवसेना पक्षप्रमुखांच्या मनात काय चालू आहे हे ओळखता आलं नाही.काळ जसा पुढे जायला लागला तसं शिवसेनेने सरकारच्या चुकीच्या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारण सुरु केलं.महाराष्ट्रात विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनाच सरकारला चुकीच्या धोरणांचा जाब विचारू लागली.

शिवसेनेचं सत्तेत असताना सरकारला घेरण सर्वांनाच अनपेक्षित होत.त्यावरून शिवसेनेवर टीकाही झाली, मात्र शिवसेना सत्तेत असली तरी ती जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहील अस ठणकावत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपली भूमिका मांडली.शिवसेना नुसती सरकारवर टीकाच करत बसली नाही तर दुष्काळग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी शिवसेनेने अनेक योजना राबवल्या.शिवसेनेच्या आमदार,खासदार, मंत्र्यांनीच नव्हे तर खुद्द युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंनी मराठवाडा व इतर दुष्काळी भाग पिंजून काढत मदतीचा महायज्ञ केला.यावेळी नुसतीच भाषणबाजी न करता आणि आश्वासनांची खैरात न करता प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादान करण्यासाठीही शिवसेनेने विशेष योजना राबवली.तब्बल ५०० हून जास्त विवाह या योजनेअंतर्गत झाले.यामुळे शेतकऱ्यांच्या तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल आपुलकी निर्माण झाली.तसेच शिवसेना नुसती टीका करत नाही तर ती मदतकार्यातही अग्रेसर आहे ही गोष्टही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पक्की झाली.या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.

मागील दोन वर्षात घडलेल्या या घडामोडींचा आढावा आज घेण्यामागील कारण म्हणजे आगामी निवडणुकांत शिवसेना-भाजप युती होणार कि नाही हा प्रश्न.शिवसेनेकडून युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे घेतील व त्यांनी दिलेला आदेश तमाम शिवसैनिकांना शिरसावंद्य असेल.२०१४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ज्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात शिवसेनाच भाजपला वरचढ ठरलेली दिसली.युती असूनही नवी मुंबई,संभाजीनगरमध्ये भाजपला समाधानकारक यश मिळवता आलं नाही.लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपला स्वबळावर मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे वेध लागलेले आहेत.असं असलं तरी भाजप खरचं मुंबई-ठाण्यात स्वबळावर विजय मिळवण सोडा निदान लढू तरी शकते का? हा संशोधनाचा विषय ठरेल.

मागील आठवड्यात शिवसेनेची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना पक्षप्रमुखांच्या “मातोश्री” निवास्थानी पार पडली.त्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती करावी किंवा नको यावर चर्चा झाली.मराठी वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असे वृत्त प्रकाशित केले.भाजपला जर खरच स्वबळावर लढायचं असतं किंवा स्वबळावर किमान लढता तरी येईल इतका आत्मविश्वास असता तर या बातमीमुळे भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटायला हव्या होत्या.शिवसेना स्वबळावर लढणार असेल तर खुशाल लढू देत,आम्हीही स्वबळावर लढू आणि मुंबई,ठाणे महानगरपालिका जिंकून अशा आशयाचं एखाद वक्तव्य भाजपच्या बाजूने व्हायला हवं होत.शिवसेना-भाजप युतीत सतत बिबा घालण्यात अग्रेसर असणाऱ्या किरीट सोमय्या,आशिष शेलार,माधव भंडारी यांनी दिवाळीच्या १५ दिवस आधीच आपली इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात फटके फोडून मिठाई वाटायला आणि मुंबई-ठाण्यातील भाजप कार्यालयांवर तोरण लाऊन विद्युत रोषणाईचा झगमगाट करायलाही हरकत नव्हती.प्रत्यक्षात मात्र अस काहीच घडलं नाही.

शिवसेना स्वबळावर लढणार असे वृत्त वृतावाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केलेलं आहे.शिवसेनेची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासमोर मांडतील असे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.हे माहिती असूनही शिवसेना स्वबळावर लढणार ही बातमी ऐकून भाजपचे अवसान गळाल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.शिवसेना स्वबळावर लढणार हे वृत्त प्रकाशित होताच भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया देताना युतीच्या बाजूनेच प्रतिक्रिया दिली.यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.भाजप स्वबळावर लढण्यासाठी खरचं सज्ज असेल तर त्यांनी युतीच्या बाजूने का विधाने केली? याचं नेमक कारण शोधलं असता भाजपकडे स्वबळावर जिंकण्याचा सोडा लढण्याचाही आत्मविश्वास नाही हे उत्तर मिळेल.भाजपचा स्वबळावर लढण्याचा नारा फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून जास्त जागा मिळवण्यासाठी होता.स्वबळावर लढण्याची हवा निर्माण करून शिवसेनेकडून जास्त जागा पदरात पडून घ्यायच्या,मात्र हे करत असताना युती तुटेल इतक ताणायचं नाही.परिणामी युतीत राहून जास्त जागा लढवायच्या,युतीचा फायदा घेऊन त्या निवडणूक आणायच्या आणि शिवसेनेच्या मात्र शक्य तितक्या जागा पाडायच्या असा यामागे विचार असू शकतो.

सध्या महाराष्ट्रात असलेल्या शिवसेना-भाजप सरकारला २ वर्षे पूर्ण आहेत.हा काळ महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांनी शिवसेनेला कमी लेखण्यात आणि खिजावण्यात घालवला.मुंबईत तळागाळातील मोर्चेबांधणीस प्राधान्य न देता नुसतचं युती तोडून स्वबळावर मुंबई जिंकण्याची विधाने करण्यास आणि शिवसेनेवर खोटेनाटे आरोप करण्यास भाजप नेत्यांनी प्राधान्य दिले.त्याउलट शिवसेनेने भाजपच्या आरोपांना आणि टीकेला फारशी भिक घातली नाही.त्यामुळे भाजप नेत्यांना सध्या शिवसेना पक्षप्रमुख नेमका काय निर्णय घेतील आणि भाजपला कोणत्या परिस्थितीला सामोर जावं लागेल याचा अंदाज बांधण कठीण झाल आहे.भाजपने स्वतःहून युती तोडली तरी मुंबई-ठाण्यात शिवसेनेला अजिबात अडचण होणार नाही.शिवसेनेच्या शाखांच जाळ,शिवसैनिकांची फौज आणि केलेली विकासकाम या त्रिसूत्रीच्या बळावर शिवसेना मुंबई-ठाण्यात स्वबळावरही सहज विजय मिळवू शकते.त्यामुळे भाजपचा कल शिवसेनेसमोर आपल्या ताकदीचा भ्रम निर्माण करून युती टिकवत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण आणि त्या जिंकण याकडेच आहे.

मुळात सध्या शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे.भाजप हा या दोन्ही सरकारमधील मोठा पक्ष आहे.शिवसेना सत्तेत सहभागी आहे,मात्र सरकारच्या चुकांवर “आपलं सरकार” म्हणून पांघरूण न घालता विरोधीपक्षांच्याही आधी शिवसेनाच त्या चुका दाखवून देते आणि त्या सुधारूनही घेते.त्यामुळे अनेकदा सत्तेबाहेर पडण्याचा सल्लाही विरोधकांनी तसेच भाजप नेत्यांनी दिलेला आहे.शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडाव,आधी सत्ता सोडून मग सरकारच्या निर्णयांना विरोध करावा असं आजवर म्हणत आलेल्या भाजप नेत्यांच्या मनात आज वेगळीच भीती आहे.ती भीती म्हणजे जर युती तुटली आणि शिवसेनेने मुंबई-ठाण्यासह इतर महानगरपालिका निवडणुकांत स्वबळावर मिळाल्या तर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम पुढे जाईल.२०१९ साली होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या प्रमुख महानगरपालिका स्वबळावर जिंकताच शिवसेनेचा आत्मविश्वास,शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेना पुन्हा भाजपला मागे टाकेल.याचा दुसरा भाग असा की जर शिवसेना दुर्दैवाने मुंबई आणि ठाणे महानगरपालिका जिंकण्यात अपयशी ठरलीच आणि भाजपला यश मिळाले तरीही भाजपला आनंदून जाण्याचे कारण नाही.शिवसेना या निवडणुकात अपयशी ठरली तर शिवसेना अजून प्रखरतेने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांना विरोध करेल.प्रसंगी सत्तेतून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही.याच भीतीपोटी भाजप सध्या अस्वस्थ आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय-पराजय काहीही झालं तरी त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार आहे.त्यामुळे युती व्हावी हीच भाजपची इच्छा आहे.आगामी निवडणुकीत शिवसेनेला भाजपशी युती करण्याची गरज नाही तर भाजपलाच शिवसेनेशी युती करण्याची गरज भासत आहे.ही गोष्ट कठीण वाटत असल्याने भाजप एकदा स्वबळावर लढू असा नारा देताना तर दुसऱ्या वेळी युती व्हावी अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.भाजपची ही अवस्था होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा घेतलेला निर्णय.इतकी वर्ष शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी “हिंदुस्थान तुमचा-महाराष्ट्र आमचा” हा भाजपवर दाखवलेला विश्वास भाजपला सार्थ तर ठरवता आला नाहीच,त्याउलट भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत असलेली युती सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तोडून शिवसेनेला डिवचण्याचे काम केले.त्यामुळे पेटून उठलेली शिवसेना यापुढे नेहमीच भाजपला वरचढ ठरेल.भाजपची ही अवस्था हे भाजपच्या कर्माचे फळ आहे.त्याची चव कडू असली तरी ती त्यांना चाखावीच लागेल.आगामी काळ फक्त शिवसेनेचाच असेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.शिवसेना संपवण्याच स्वप्न पाहणे स्वतः संपलेत,शिवसेना अजून जिवंत आहे,ज्वलंत आहे.हे सत्य भाजपन स्वीकारलं पाहिजे.तरच महाराष्ट्रात यापुढेही भाजप टिकेल अन्यथा महाराष्ट्र भाजप इतिहासजमा होईल.महाराष्ट्रात फक्त शिवसेनेच्या वाघाची डरकाळीच घुमेल आणि शिवरायांचा आणि शिवसेनेचा भगवाच फडकेल.बाकी कोणतही फडक इथे फडफडू शकणार नाही.मुंबई आमच्या साहेबांची होती,आहे आणि राहील.हे समीकरण कोणालाही तोडता येणार नाही.त्याचबरोबर शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना हेही शिवसेनेच्या जन्मापासून असलेल नात कदापि तुटणार नाही.मुंबई-ठाण्यावर भगवाच फडकेल..!



जय महाराष्ट्र..

Saturday, 22 October 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

गोव्यात नवचैतन्य..!

जय महाराष्ट्र..! जय गोमंतक..!!

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.शिवसेना पक्षप्रमुखांच्या या दोन दिवसीय गोवा दौऱ्यामुळे केवळ गोव्यातील शिवसैनिकांतच नव्हे तर संपूर्ण गोव्यात नवचैतन्य संचारलं आहे.पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेलं गोवा राज्य आज शिवसेनेच्या भगव्या वादळाच्या आगमनामुळे भगव झालं आहे.आगामी वर्षात गोवा विधानसभेची निवडणूक आहे.ही निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीने लढवणार असून स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत.गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारच देशातील सर्वात छोट राज्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल राज्य आहे.गोव्यात विधानसभा निवडणुकीचे ४० मतदारसंघ आहेत.मराठी आणि कोकणी भाषेचं वर्चस्व असणाऱ्या गोव्यात आता शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमणार असल्यानं पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण हिंदुस्थानच लक्ष लागल आहे.

गोव्यात संध्या भाजपची सत्ता आहे.असं असूनही तेथे मातृभाषेवर गदा येत आहे.शिवसेना नेहमीच मातृभाषेच्या सन्मानार्थ लढा देत आलेली आहे व आता गोव्यातही शिवसेना तसाच लढा देईल.गोव्यात संध्या रा.स्व. संघातून बाहेर पडून भाषा सुरक्षा मंचची स्थापना करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांचा मातृभाषेसाठी लढा सुरु आहे.भाजपने आपली घोर निराशा केली अस म्हणत भाजपला धडा शिकवण्यासाठी वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.वेलिंगकरांच्या या नव्या पक्षासोबत शिवसेनेची युती होण्याची चिन्ह आहेत.तसेच गोव्यात एकेकाळी प्रमुख आणि सत्ताधारी पक्ष असलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही शिवसेनेसोबत येऊ शकतो.अर्थात या शक्यता कितपत खऱ्या ठरतात आणि या पक्षांशी युती करायची किंवा नाही याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखच घेतील.गोव्यात शिवसेना,मगोप आणि वेलिंगकरांच्या पक्षाची युती झाल्यास सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्याशिवाय एक भक्कम आणि मजबूत पर्याय गोव्याच्या जनतेला मिळेल.

शिवसेना पक्षप्रमुखांनी आज आपल्या गोवा दौऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना “हिंदुत्वात फूट नको म्हणून कायम भाजपला साथ देत आलो.निवडणुकीच्या रिंगणात उतरलो नाही,नाहीतर आतापर्यंत शिवसेनेनं गोव्याचा मुख्यमंत्री दिला असता” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्याचबरोबर “आमचं धोरण फक्त निवडणुकी पुरता नाही.मातीसाठी लढणाऱ्यांना आम्ही नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्यासाठी शिवसेना लढत आली आहे.गोव्याच्या विकासासाठी म्हणूनच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत.निवडून आल्यानंतर गोव्यातील सर्वसामान्य व्यक्ती इथला मंत्री होईल, असं वचन देखील त्यांनी यावेळी दिलं.” गोव्यातील शिवसैनिकांना “गोव्याच्या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा हवी आहे. तुम्ही शाखा उघडा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जे मुंबईत करतोय तेच इथे करेन. ज्या गावात शाखा उघडेल, तिथे मी स्वतः शाखेला भेट द्यायला येईन” असं सांगत शिवसेना पक्षप्रमुखांनी विश्वास दिला.

गोव्यातल्या या मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी वेलिंगकर यांची भेट घेतली.त्याबद्दल बोलताना मातृभाषा आणि संस्कृती रक्षणसाठी शिवसेना जो लढा देत आली आहे त्याच विचारांनी गोवा सुरक्षा मंचचे संस्थापक सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यात लढा दिला आहे. तेव्हा विचार आणि तत्त्वासांठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. मात्र अधिकृत युती ‘लवकरच’ जाहीर करू”अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुखांच्या या गोवा दौऱ्याच्या उद्या समारोप होणार आहे.त्यांच्या या गोवा दौर्यामुळे गोव्याचे आणि हिंदुस्थानचे राजकारण ढवळून निघत आहे.

शिवसेनेने आजवर हिंदुस्थान भाजपकडे सोपवला होता.त्यामुळे शिवसेना महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवत नव्हती.जर एखाद्या राज्याची विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढवलीच तर ती संपूर्ण ताकदीनिशी लढवली जात नव्हती.आता काळ बदलला आहे.गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेने संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.गोव्यात मराठी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे.मराठी आणि कोकणी या सख्या बहिणी आहेत.त्यामुळे गोव्यात स्थानिक भाषेची अस्मिता आणि हिंदुत्व या दोन प्रमुख मुद्द्यांवर शिवसेना निवडणूक लढवेल.गोवा हे राज्य लहान असल्याने गोव्यात विधानसभेच्या केवळ ४० जागा आहेत.शिवसेनेने संपूर्ण ताकदीने लढा दिल्यास गोव्यातील आणि पर्यायाने हिंदुस्थानातील राजकारणात मोठे बदल होतील.

गोवा राज्यात शिवसेनेला यंदा मोठे यश मिळावे यासाठी युवासेना प्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख मैदानात उतरलेले आहेत.गोव्याबरोबरच इतर राज्यांतही शिवसेनेने ताकदीने लढा दिल्यास शिवसेना राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दृष्टीने वेगाने पुढे सरकेल.आज महाराष्ट्र आणि गोव्यातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात शिवसेनेची गरज आहे.इतके दिवस जे केलं नाही ते आता करून दाखवत शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेला आणखी एक पाउल पुढे घेऊन जातील हे नक्की.त्याची सुरुवात गोव्यातून होईल अस म्हणायला हरकत नाही.यापुढे गोव्यात “जय महाराष्ट्र..! जय गोमंतक..!!” असाच नारा घुमेल.शिवसेना प्रत्येकवेळी स्थानिक भाषेच्या रक्षणासाठी आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत राहील.



जय महाराष्ट्र..!

Saturday, 15 October 2016



“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

ठाकरी तोफ धडाडली..!

देशद्रोह्यांचे सडके मेंदू..!

मागील आठवड्यात शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा मोठ्या दिमाखात,जल्लोषात आणि तुफान जनसागराच्या साक्षीने पार पडला.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर जमले होते.शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मार्गदर्शनात हिंदुस्थान आणि महाराष्ट्रातील सध्याच्या सर्वच मुद्यांना स्पर्श केला आणि प्रश्नांना वाचा फोडली.दहशतवादाच्या गंभीर प्रश्नावर बोलताना शिवसेनेची ही ठाकरी तोफ धडाडली.दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुखांनी पाकड्यांची आणि हिंदुस्थानात राहून पाकड्यांचे गुणगान गाणाऱ्या देशद्रोह्यांची सालटी काढली.त्याचबरोबर हिंदुस्थानी सैन्याच्या “सर्जिकल स्ट्राईक”चे पुरावे मागणाऱ्या महामुर्खांचाही त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेत पिसं काढली.

शिवसेना पक्षप्रमुखांनी दसरा मेळाव्यातील भाषणात “पिओके” मध्ये घुसून पाकड्यांना धडा शिकवणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचे जाहीर कौतुक केले.आत्तापर्यंत आपण नुसते निषेधाचे खलिते पाठवत होतो पण यावेळी पाकला हिंदुस्थानी जवानांनी मर्दासारखे उत्तर दिले.आम्हाला असेच नरेंद्रभाई पाहिजे आहेत,पण केवळ एका “सर्जिकल स्ट्राईक” वर थांबू नका,पिओकेच नव्हे तर पाकिस्तान पण हिंदुस्थान म्हणूनच ओळखला गेला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.त्याचबरोबर “खेळ,कला आणि राजकारण एक करू नका” असा सल्ला शिवसेनेला देणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुखांनी ठाकरी भाषेत आसूड ओढले.पाकमध्ये आपल्या कलाकारांना बंदी घातली जाते आणि इकडे गुलाम अली,कसुरीचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळला की राज्य सरकार त्यांना कडेकोट बंदोबस्त पुरवते हा विरोधाभास दाखवून देत शिवसेनेला मानवतावाद शिकवण्यापेक्षा पाकड्यांना मानवतावाद शिकवा असे ते म्हणाले.

हिंदुस्थानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईवर शंका घेत त्याचे पुरावे मागणाऱ्या संजय निरुपम,अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांवर तसेच अभिनेत्यांवर शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणात सडकून टीका केली.सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांच्या धमन्यात भारतमातेच रक्त नव्हे तर लाहोर आणि इस्लामाबादच्या गटारांच पाणी वाहत आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांनी मोदीविरोध करण्याच्या नादात देशद्रोही फुत्कार काढणाऱ्यांना सोलून काढले.राहुल गांधींच्या “रक्ताची दलाली” या वक्तव्याचाही शिवसेना पक्षप्रमुखांनी समाचार घेतला.राहुल गांधींनी हा शब्द बोफोर्समधून शिकला असावा असं म्हणत अशा सडक्या मेंदूंची माणंस आपल्याकडे आहेत त्याचाच हा पुरावा आहे असे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेबांनी आपल्या भाषणात बोलताना रेसकोर्सवर उद्यान उभं करण्याच्या आपल्या मागणीची आठवण करून दिली,पण आता त्यावर “वॉर म्युझियम” उभं केल जावं असे ते म्हणाले.या वॉर म्युझियममध्ये आपले सैनिक नेमक्या कोणत्या परिस्थितीत लढतात,तिथे वातावरण कस असतं,उपाशीपोटी दिवस कसे काढावे लागतात,युद्धात वापरले जाणारे रणगाडे,शस्त्रास्त्रे यांच भव्य प्रदर्शन भरवाव अशी कल्पना सुचवली.त्याचबरोबर या वॉर म्युझियममध्ये एका खोलीत सीमेवरील परिस्थिती आणि वातावरण निर्माण करावे आणि ज्यांना पाकचा पुळका येईल त्यांना त्या खोलीत पाठवून ते अनुभवायला लावावे जेणेकरून आपल्या सैन्यावर शंका घेण काय असतं ते त्यांना कळेल अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुखांनी सुचवलेला हा जालीम उपाय आणि त्यांच्या भाषणाद्वारे मांडलेले मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत.आजकाल आपल्या देशात अशा सडक्या विचारांच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे.ज्यांनी दिवाळीतील टिकल्यांची बंदूकही हातात धरून उडवलेली नसेल,सुतळीबॉम्बसुद्धा उडवले नसतील असे लोक आज आपल्या सैन्यावर शंका घेतात.त्यांच्या कामगिरीचे कौतुक सोडा,त्याचे पुरावे मागतात? हे देशद्रोह्यांचे सडके मेंदू चेचून ठेचून टाकायला हवेत.अशा विषारी विचारांचा प्रचार-प्रसार थांबवायला हवा.खरच रेसकोर्सवर सरकारने “वॉर म्युझियम” बनवावं आणि अशा कुजक्या मनोवृत्तीच्या लोकांना तिथे सैन्य ज्या स्थितीत आहे त्या स्थितीचा अनुभव घ्यायला पाठवावं.सैन्यावर आरोप करणारे जिवंत परत येणारच नाहीत.

देशाच्या सैन्यावर,त्यांच्या सामर्थ्यावर शंका घेण हा देशद्रोहच मानायला हवा.अशा सडक्या मेंदूच्या लोकांना फाशीचीच शिक्षा हवी.मागे एकदा वर्तमानपत्रात बातमी वाचली की कोणत्यातरी एका देशात संरक्षण खात्याची बैठक सुरु असताना सैन्याप्रमुखाला झोप अनावर झाली म्हणून तिथल्या राज्यकर्त्याने त्याला थेट तोफेच्या तोंडी दिल.का तर संरक्षणासारख्या गंभीर विषयात अशी चूक किंवा बेजबाबदार वर्तन खपवून घेण त्यांना मान्य नव्हत.हे करण योग्य की अयोग्य तो भाग वेगळा,पण देशद्रोह करणाऱ्यांना तरी अशी कठोर शिक्षा केली जायलाच हवी तरच हे माजलेले गेंडे भानावर येतील.

जय महाराष्ट्र..!


Tuesday, 11 October 2016



"वाघगर्जना"

(विजयादशमी विशेष लेख:)

शिवसेनेचं सीमोल्लंघन..!

चला उठा,अटकेपार भगवा फडकवूया..!

आज विजयादशमी.आज सीमोल्लंघन करण्याचा आणि सोने वाटण्याचा दिवस.त्याचबरोबर शिवसेनेच्या वैभवशाली,गौरवशाली,सांस्कृतिक अन पारंपारिक दसरा मेळाव्याचा हा दिवस.आज शिवसेनेचा ५१ वा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा होतोय.विक्रमी गर्दीच्या या विराट दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे मार्गदर्शन करतील.दसरा मेळाव्यात फोडल्या जाणाऱ्या डरकाळीचा आवाज केवळ  महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर घुमेल.आज शिवसेना पक्षप्रमुख काय बोलतात? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.तमाम हिंदू-मराठी जनता आणि शिवसैनिकही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झाला आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थाकडे रवाना झालेले आहेत तर महाराष्ट्राच्या घराघरात दूरदर्शनच्या माध्यमातून साहेबांचं भाषण ऐकलं जाणार आहे.  

१९ जून १९६६ रोजी स्थापना झालेल्या शिवसेनेचं हे सुवर्णमहोत्सवी पन्नासावं वर्ष आहे.सध्या शिवसेना “प्रादेशिक पक्ष” म्हणून नोंदणीकृत असली तरी हिंदुत्वाचा भगवा देशभरात फडकवण्यासाठी शिवसेना कार्यरत आहे.शिवसेना पक्षप्रमुख नेहमी आपल्या भाषणात म्हणतात “होय,शिवसेना रिजनल आहे, पण ओरिजिनल आहे.दुसरे पक्ष फोडून शिवसेना वाढवली गेली नाहीये.”सध्या शिवसेना केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत आहे.२०१९ साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य शिवसैनिकांनी हाती घेतलं आहे.हे करत असताना शिवसेनेनी आपली ध्येयधोरणे आणि तत्वं कधीही बदलली नाहीत अथवा त्यांच्याशी तडजोड केली नाही.२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून ३ वर्षांचा अवकाश आहे,मात्र शिवसेनेची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची असेल तर यासाठी आत्तापासूनच तयारीला लागायला हवं.आता गाफील राहून चालणार नाही.

आगामी वर्षात महाराष्ट्रातील तब्बल १० महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.२०१९ साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवायचा असेल तर या दहाही महानगरपालिकांवर शिवसेनेचीच सत्ता यायला हवी.हे अवघड असेल,पण अशक्य नाही.शिवसेनाप्रमुखांच्या वाघांनी ठरवल तर काय अवघड आहे? हे झालं महाराष्ट्राच.आगामी वर्षात गोवा,उत्तर प्रदेश आणि इतर महत्वाच्या राज्यांतही विधानसभा निवडणुका आहेत.गोवा विधानसभेची निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार आहे.त्याचबरोबर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे.गोव्यात सुभाष वेलिंगकर यांच्या पक्षाशी युती करून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.तसेच ईतर आगामी निवडणुकांत समविचारी पक्षांशी युती करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील.त्याचबरोबर युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे स्वतः सर्व महापालिका तसेच गोवा आणि उत्तरप्रदेश निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.हे शिवसेनेचं सीमोल्लंघन ठरणार आहे.

सध्या मुंबई,ठाणे आणि संभाजीनगर अशा महत्वाच्या आणि मोठ्या महापालिकांवर शिवसेनेची सत्ता आहे.तसेच केंद्रात आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी आहे.आगामी काळात शिवसेनेचा अश्वमेध हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात भगवा फडकवण्यासाठी सुटणार आहे.सध्या केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानला शिवसेनेची गरज आहे.पेशवाईच्या काळात अटकेपार भगवा फडकावून महाराष्ट्राने हिंदुस्थानवर दबदबा निर्माण केला होता.या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. चला उठा,अटकेपार भगवा फडकवूया..!

जय महाराष्ट्र..! 

Saturday, 8 October 2016



"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)


सीमोल्लंघन म्हणजे काय?


विजयाचं सोनं लुटा..!


दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव आता जवळ येऊन ठेपलेला आहे.याच दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवलेला होता.त्याचं प्रतिक म्हणून नवरात्रोत्सव पर्वात ठिकठिकाणी रामलीला सादर केली जाते.तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करून रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो.आज लंकापती रावण नसला तरी भ्रष्टाचार,अत्याचार,दहशतवाद, गुन्हेगारी,महागाई,दुष्काळ,दारिद्य्र,रोगराई,कुपोषण आणि अंधश्रद्धा ही दहा तोंडे असलेला समस्यारूपी रावण आजही जिवंत आहे.हा रावण आजही कित्येकांचे बळी घेत आहे.लंकानरेश रावणाला श्रीरामांनी यमसदनी धाडून त्यावर विजय मिळवलेला होता.आजच्या काळात प्रभू रामचंद्रांची भूमिका कोणी एकटा बजावू शकणार नाही.त्यासाठी एकजूटच हवी.

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे.सर्वत्र गावाची वेस ओलांडून आई भवानीचा उदो उदो करत विजयादशमी साजरी केली जाते.याच दिवशी भवानीमातेने महिषासुराचा वध केला होता.याच दिवशी पांडवांनी त्यांची शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली होती.त्यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनही करतात.इतकच नव्हे तर इतर साहित्याच,वाहनांच अथवा वास्तुंच पूजन केल जात.दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे.आपट्याच्या पानांनाही दसऱ्याच्या दिवशी सोन्याइतक महत्व असतं.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दसऱ्याला सर्वत्र विजयोत्सव साजरा केला जातो.

दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा खूप प्राचीन आहे.ती आजही टिकून आहे आणि सदैव राहील,पण सीमोल्लंघन म्हणजे काय? कधी केलाय विचार? सीमांच उल्लंघन म्हणजे सीमोल्लंघन.संस्कृती आणि प्रथा-परंपरा म्हणून या दिवशी गावाची सीमा ओलांडली जाते.ही परंपरा जपणं आपलं काम आहे,पण दसऱ्याच्या दिवशी खरच आपल्या एखाद्या सीमेच उल्लंघन केलं तर? ज्याप्रमाणे रामाने रावणावर विजय मिळवला त्याप्रमाणे आपण आपल्यातील एका दुर्गुणावर विजय मिळवला तर? पांडवांनी जशी दसऱ्याला आपली शस्त्रे शमीच्या झाडावरून उतरवली तसेच आपण आपले एखादे कला अथवा सद्गुणरुपी शस्त्र जे व्यापामुळे बाजूला पडले आहे ते पुन्हा उपयोगात आणले तर? किंवा ते उपयोगात असल्यास त्याला अधिक धार लावली तर? सीमोल्लंघनाचा खरा अर्थ असा आहे.

प्रत्येकाला आपल्या सीमा-मर्यादा माहिती असतात.उदाहरण घ्यायचे झाल्यास साधारणतः सर्वचजण उजव्या हाताने लिखाण करतात.अगदी कमी लोक डाव्या हाताचा वापर लिखाणासाठी करतात.दोन्ही हातांनी लिखाण करू शकणारे या जगात किती लोक असतील? लाखात एक? किंवा कोटीत एक म्हणा.आपण हे का आत्मसात नाही करू शकत? काही कारणाने जर उजवा हात निकामी झाला तर डाव्या हाताचा वापर करून लिखाण किंवा कामे करता येतील.आता असे दुर्दैव प्रत्येकाच्या वात्यालायेत नाहीच हेही सत्य आहे.तरीही आपली एक मजबूत बाजू म्हणून त्याचा आपल्याला नक्कीच आयुष्यभर फायदा होईल. त्याचप्रमाणे एखाद्याला लागलेले व्यसन सुटत नसेल तर त्या मर्यादेच उल्लंघन त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर करायला हरकत नाही.एखाद्याला स्टेजवर जाऊन बोलता येत नसेल तर या भीतीवर मात करता येईल.एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय अवघड वाटत असेल तर त्याचा अभ्यास करून तो सोपा करता येईल.इतर एखादा अवगुण असल्यास तो या मुहूर्तावर दूर करता येईल.असे सीमोल्लंघन करण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास प्रत्येकाचाच उत्कर्ष होईल आणि प्रत्येकाला यश,विजय मिळेल.आमच्याबद्दल सांगायचे झाल्यास आम्ही डाव्या हाताने लिखाण करण्याची कला आत्मसात करण्याचा संकल्प केला आहे.

नुसतं गावाची सीमा ओलांडून किंवा रावणाचे पुतळे जाळून परिस्थिती बदलणार नाही.सगळ सुजलाम्-सुफलाम व्हावं, आपल जीवन भयमुक्त,सुखी,आनंदी आणि समाधानी व्हावं अस सगळ्यानांच वाटत.हे व्हायचं असेल तर देशातलं सरकार बदलून उपयोगाच नाही.सरकार फक्त सुविधा पुरवत असत. भ्रष्टाचार,अत्याचार,दहशतवाद, गुन्हेगारी,महागाई,दुष्काळ,दारिद्य्र,रोगराई,कुपोषण आणि अंधश्रद्धा हे सगळ जर समाजातून मुळासकट नष्ट करायचं असेल तर प्रत्येकाने सुपंथावर चालण्याचा संकल्प करावा.सगळच बरोबर आणि उत्तम करायला आपण देव नाहीत,संतही नाहीत,पण वाईट वागायला आपण राक्षसही नाहीत.प्रत्येकाने दुसऱ्यांना सुधरवत बसण्यापेक्षा स्वतःमध्येबदल करावा.एक एक सद्गुण आत्मसात करण्याचा प्रतिवर्षी दसऱ्याला संकल्प करावा.एक दुर्गुण किंवा कमतरता दूर करून एक सद्गुण आचरणात आणला तर आयुष्यात आपल्याला खूप मोठी मजल मारता येईल.आयुष्य हे असच जगायचं आहे.त्यामुळे यंदाच्या दसऱ्यापासून असं सीमोल्लंघन करा आणि दुर्गुणांवर,मर्यादांवर मिळवलेल्या विजयाच सोन सुख-समाधानाने लुटा.विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!



जय महाराष्ट्र..!

Saturday, 1 October 2016


"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

जय जवान..! जय हिंदुस्थान..!!
दहशतवाद संपवावा लागतो तो असाच..!
हिंदुस्थानी लष्कराने पठाणकोट आणि उरी हल्ल्याचा बदला पाकव्याप्त काश्मिरात घुसून पाकड्या दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत आणि तब्बल ४० पाकड्या दहशतवाद्यांना जहन्नुममध्ये पाठवत घेतला.हिंदुस्थानच्या शूर जवानांच्या धडाकेबाज, महापराक्रमी कामगिरीला आमचा सलाम.हिंदुस्थानी वीरांच्या या कामगिरीमुळे हिंदुस्थानची लष्करी जगाला समजली आहे.विशेषतः पठाणकोट आणि उरी हल्ले करून घडल्यासारखे दाखवत गालातल्या गालात हसणाऱ्या पाकड्यांना हिंदुस्थानच्या या "सर्जिकल स्ट्राईक" मुळे सणसणीत कानाखाली बसली आहे.पाकला बसलेल्या या चपराकेमुळे आलेल्या झिणझिण्या लपवत नवाज शरीफांनी "आम्ही शांत असलो तरी कमजोर नाही" असं सांगत आपली हतबलता आणि दुर्बलता लपवण्याचा प्रयत्न केला.हिंदुस्थानच्या एका "सर्जिकल स्ट्राईक" मुळे पाकमधील वातावरण टाईट झाले आहे.पाकने हिंदुस्थानवर नापाक हल्ले करणे ही काही नवीन गोष्ट नाही.पठाणकोट,उरी अशा हल्ल्यांच्या टपल्या पाकने मारल्या मात्र हिंदुस्थानच्या एकाच प्रतिउत्तराने पाकडे पार हतबल झालेत.

पठाणकोट हल्ल्यापाठोपाठ पाकड्या दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानच्या तब्ब्ल १८ वीरांना वीरमरण आले.या हल्ल्यानंतर हिंदुस्थानात पाकड्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली होती.वारंवार कुरघोड्या आणि कुरापती करणाऱ्या पाकड्यांवर हल्ला करून हिंदुस्थानने बदला घ्यावा अशी तमाम हिंदुस्थानवासीयांची इच्छा होती."किती काळ आपल्या जवानांनी वीरमरण पत्करायच? किती काळ हिंदुस्थान हे पाकडे चाळे सहन करणार? आता बस.खूप झालं.बदला घ्या." असा सूर हिंदुस्थानात उमटत होता.तमाम हिंदुस्थानी जनतेच्या पंतप्रधान मोदींकडून खूप अपेक्षा होत्या.पंतप्रधानांनी देशाचा सूर ओळखत लष्कराला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करण्याचे आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्याचे स्वातंत्र्य दिले.युद्धासाठी सदैव तयार असलेल्या हिंदुस्थानी सैन्याला फक्त आदेशाचीच गरज असते.यावेळी तो मिळाला.आदेश मिळताच हिंदुस्थानी लष्कराने मध्यरात्री थरारक मोहीम राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला.यात ४० दहशतवादी,पाकचे ९ जवान ठार झाले .त्याचबरोबर पाकड्या दहाहशतवाद्यांचे तब्ब्ल ७ अड्डे हिंदुस्थानी लष्कराने उध्वस्त केले.

हिंदुस्थानी लष्कराच्या या सडेतोड प्रतिउत्तरामुळे पाकमध्ये एकच खळबळ उडाली आणि हिंदुस्थानात विजयोत्सव,साजरा झाला.हिंदुस्थानी सीमेवर पाकड्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांचे बलिदान लागले,त्यांना श्रद्धांजली मिळाली अशी भावना सर्वत्र व्यक्त झाली.हल्ल्याची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना तात्काळ फोन करून हिंदुस्थानी लष्कराचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन केले.तसेच पाकड्यांनी पुन्हा कुरापत त्यांना कायमचा धडा शिकवा असे खणखणीत केले.शिवसेनेने नेहमीच पाकड्यांना जशास तसे उत्तर शिकवण्याची मागणी केलेली होती. अखेर हिंदुस्थानी लष्कराने घेतलाच.पंतप्रधान मोदींनी लष्कराला आदेश देताच लष्कराने पाकड्यांच्या चिंधड्या उडवल्या.

शिवसेनेने सातत्याने मोदींकडे पाकला धडा शिकवण्याची मागणी केलेली होती.पाकड्यांशी चर्चा करू नये,तसेच कसलेच नयेत आणि पाकड्यांना प्रतिउत्तर द्यावे ही शिवसेनेची भूमिका होती,आहे आणि राहील.दहशतवाद्यांना आणि पाकला धडा शिकवण्याची मागणी काय आहे? "बदला घ्या" हा संपूर्ण देशाचा सूर होता.पंतप्रधानांनी त्याला साद दाद देत हिंदुस्थानी लष्कराला "सर्जिकल स्ट्राईक" करण्याचे आदेश आणि स्वातंत्र्य दिले आणि हिंदुस्थानी जवानांनी पाकड्यांना सीमा ओलांडून,पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून चारली.दहशतवाद संपवावा लागतो तो असाच..! हिंदुस्थानी लष्कर आणि पंतप्रधानांचे "सर्जिकल स्ट्राईक" यशस्वी अभिनंदन.दहशतवाद संपवण्यास हिंदुस्थानी लष्कर समर्थ आहे.त्यामुळे पाकने पुन्हा खोडी युद्धाची भाषा वापरल्यास हिंदुस्थानी जवान काय करू शकतात याचा ट्रेलर सर्वांनीच पाहिला आहे.पाकला खुमखुमी असल्यास संपूर्ण चित्रपट दाखवण्यास हिंदुस्थानी जवान सज्ज आहेत.जय जवान..! जय हिंदुस्थान..!!
जय महाराष्ट्र..!