“वाघगर्जना”
(माझा आजचा लेख-:)
मुंबई आपलीच पण..
चला,उठा..भगव्यासाठी लढा..!
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीस अद्याप १ वर्षाचा कालावधी बाकी असला तरी काही उतावळ्या नवऱ्यांनी आत्तापासूनच बाशिंग बांधून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे,मात्र तोंडाच्या वाफा दवडून वातावरण तापवता येत नाही याचा त्यांना विसर पडलेला असल्याचे चित्र आहे.काँग्रेस उपाध्यक्ष राहून गांधी यांचा मुंबई दौराही मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी महत्वाचा मानला गेला.यावेळी राहुल यांनी मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आणण्याबाबत कार्यकर्त्यांना आवाहन केले.त्यानंतर जागतिक दर्जाचा सर्वात मोठा पक्ष (जरी दिल्ली,बिहार आणि कल्याण-डोबिंवलीत तोंडावर आपटला असला तरी) असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची फेरनिवड झाली.त्यांनीही मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची गर्जना (पोकळ का असेना) केली.
या सर्व गोष्टींवरून काय समजते? तर फेब्रुवारी २०१७ मधील आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक आत्तापासूनच तयारीला लागलेत.यात काँग्रेस-राष्ट्रवादी या परक्यांचा,मनसेवाल्या घरच्यांचा आणि मित्रवर्य (स्वार्थी का असेनात) म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा प्रामुख्याने समावेश असेल.स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर केवळ शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेत असलेले,कल्याण-डोंबिवलीत वाघाचे दात मोजण्याच्या नादात वाघाच्या पंज्यात सापडलेले आणि मुंबई,ठाणे यांसारख्या महानगरपालिकांमध्ये आजवर केवळ शिवसेनेच्या कृपेने उपमहापौर पदापर्यंत मजल मारू शकलेले भारतीय जनता पक्षवाले आज स्वबळावर मुंबई जिंकण्याची भाषा करत आहे.याचा अर्थ असाच आहे की मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येताच भाजप पुन्हा दगाबाजी करणार आणि नसलेल्या स्वबळाची ताकद आजमावण्याच्या नादात तोंडावर आपटणार.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसोबत ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,सोलापूर या महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकाही आहेत.यांतील मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांवर गेल्या अनेक वर्षांपासून भगवा फडकत आहे,तसाच तो यंदाही फडकणार यात काहीही शंका नाही.नाशिक मनपावरही यापूर्वी शिवसेनेचीच सत्ता होती.मागील निवडणुकीत शिवसेनेची संधी हुकली असली तरी आता जनतेने आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचे ढोंग ओळखलेले आहे.त्यामुळे नाशिक मनपावरही भगवाच फडकणार आहे.पुण्यात सर्व आठ आमदार भाजपचे असले तरी शिवसेनेचे कार्य जोमात सुरु आहे.त्यामुळे यंदा पुणे महापालिका निवडणुकीत भगवा फडकवण्याची संधी आहे.पुणे हे शिवसेनाप्रमुखांचे जन्मस्थान आहे,त्यावर भगवाच फडकायला हवा.आता राहिला प्रश्न तो नागपूर आणि सोलापूरचा.नागपूर हा संघ आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही नागपूरचेच आहेत.त्यामुळे भाजप ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवणार.सोलापूर मनपातही शिवसेनेला सत्ता काबीज करून परिवर्तन करण्याची संधी आहे.या संधीचे सोने करण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच जीवाचे रान करायला हवे.
२०१७ च्या या महापालिका निवडणुकांनंतर ऑक्टोबर २०१९ चाब विधानसभा निवडणुकीस केवळ अडीच वर्षांचा कालावधी उरतो.त्यामुळे २०१९ साली जर शिवसेनेचे १५० पेक्षा जास्त आमदार महाराष्टातून निवडणून आणून महाराष्ट्रावर शिवसेनेची एकहाती सत्ता आणायची असेल तर या सर्वच्या सर्व महापालिका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करायला हवे.मुंबई-ठाणे निवडणुकीत सत्ता राखत असताना पुणे,नाशिक,नागपूर,सोलापूर या महानगरपालिका निवडणुकांकडे शिवसेनेचे दुर्लक्ष होता कामा नये.सर्व शक्ती पणाला लावून मुंबई महापालिकेत उतरायचे.शिवसेनेला चहूबाजूंनी घेरायचे.शिवसेनेला मुंबईत अडकवून ठेवायचे आणि बाकी शहरांच्या निवडणुका सोप्या करायच्या असा डाव भाजपवाले खेळू शकतात.यासाठीच त्यांनी आत्तापासूनच मुंबई मनपा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आरोप-प्रत्यारोप सुरु केले आहेत.शिवसैनिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेनेनी केलीली कामे मुंबईकरांपर्यंत पोहोचवावीत. मुंबईकर त्याची पोचपावती नक्कीच देतील.मुंबईत शिवसेनेचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे.
मुंबई आपलीच आहे पण ती राखण्याच्या नादात बाकीच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.भाजपचा डाव जर उधळायचा आणि उलटवायचा असेल तर शिवसेनेन नागपूर महापालिका निवडून प्रतिष्ठेची करायला हवी.जिद्दीने नागपूर महापालिकेत भाजपला घेरायला हवे आणि तिथेच रोखायला हवे.शत्रूच्या बलस्थानावर हल्ला करून विजय मिळवल्यास शत्रू आपोआपच लुळा-पांगळा होईल आणि सर्वच महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकेल.हे घडण अवघड असेल पण अशक्य अजिबात नाही.आपण शिवसैनिकांनी एकजुटीने,जिद्दीने ताकद लावली तर नागपूर महापालिकेवरही भगवा फडकू शकतो.तेवढी ताकद नक्कीच बाळासाहेबांनी आपल्याला उभारून दिली आहे.हे प्रत्यक्षात आल्यास २०१९ साली शिवसेनेचे १५० पेक्षा जास्त आमदार निवडणून आणणे जड जाणार नाही.२०१९ साली लोकसभेत सर्व ४८ आणि विधानसभेत दीडशेच नव्हे तर सर्व २८८ जागा जिंकण्याचे ध्येय शिवसैनिकांनी ठेवायला हवे आणि पेटून उठायला हवे.आत्तापर्यंत झाल तेवढ खूप झाले,इथून पुढे महाराष्ट्रावर फक्त भगवा आणि भगवाच फडकायला हवा,इतर कोणतही फडक फडकता कामा नये.हे प्रत्यक्षात आणायचं असेल तर रक्ताचं पाणी करावं लागेल आणि त्याची सुरुवात याच क्षणापासून करायला हवी.तेव्हा चला,उठा..भगव्यासाठी लढा..!
जय महाराष्ट्र..!