Saturday, 30 July 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

भविष्यकाळ शिवसेनेचाच..!

राजकारणातून समाजकारण..!

मागील आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा झाला.त्यापूर्वी ३ दिवस “सामना” मध्ये प्रकाशित झालेल्या दणदणीत आणि खणखणीत मुलाखतीतून शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुस्थान आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भाष्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.या मुलाखतीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुखांनी “उद्या शिवसेनेची एकहाती सत्ता येणारच आहे.भविष्यकाळ शिवसेनेचाच आहे.” असा ठाम विश्वास व्यक्त केला.मागील महिन्यात शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वर्धापनदिन सोहळ्यात मार्गदर्शन करतानाही शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता.शिवसेनेची ५० वर्षात एकदाही एकहाती सत्ता का आली नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर देताना उद्धवसाहेबांनी “शिवसेनेची एकहाती सत्ता आली नसेल,पण आणून दाखवतो” असा ठाम निर्धार व्यक्त केला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जनमानसात सुसंस्कृत,सृजनशील,संयमी,मितभाषी अशी प्रतिमा आहे.तसेच ते जे बोलतात ते करून दाखवतात.त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनेचा भगवा अभिमानान,स्वाभिमानान,डौलान आणि जबरदस्त तेजान फडकल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रात आगामी काळात शिवसेनेची एकहाती सत्ता येणार म्हणजे येणारच.शिवसेना गेली ५० वर्षे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अविरत झटत आहे.गेली ५० वर्षे समाजकारणाचा मंत्र घेऊन शिवसेनेने महायज्ञ उभारला आहे.शिवसेना ही सत्तेसाठी कार्यरत नसून ती जनहितासाठी झटणारी संघटना आहे.शिवसेनेला मंत्रिपद महत्वाची नाहीत तर जनतेचे हित महत्वाचे आहे.

शिवसेनेने दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून उभारलेल्या मदतयागाची फारशी वाच्यता केलेली नाही.तसेच सत्तेत असूनही जनतेचे प्रश्न मांडत असताना शिवसेना एक पाऊलही मागे हटली नाही.शिवसेनेची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येण्यासाठी शिवसेनेने केलेले समाजकार्य आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे.अनेकदा फसव्या जाहिराती देऊन अथवा खोटा प्रचार करून निवडणूक अनेक पक्षांचे अनेक नेते निवडणूक जिंकताना दिसतात.लोक खोट बोलून जर मते मिळवत असतील आणि आणि निवडणुका जिंकत असतील तर आपण खर बोलून निवडणुका का नाही जिंकू शकणार? शिवसेनेचं समाजकार्य मदारांपर्यंत पोहोचवण आणि केलेलं कार्य अभिमानानं सांगून मतं मागण यात गैर ते काय आहे? यावरही शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या मुलाखतीत सुयोग्य भाष्य केलेले आहे.
मुलाखतीदरम्यान बोलताना उद्धवसाहेब म्हणाले “शिवसेना,शिवसैनिक जेवढी समाजोपयोगी कामं करतात तेवढी इतर कोणताही पक्ष करत नसेल.परंतु आमचा शिवसैनिक भोळाभाबडा आहे.तो काम करतो आणि कर्तव्य मानून तो पुढे निघतो.तो त्या कामाचा कधीही नगारा पिटत नाही.मी नेहमी त्यांना सांगतो,काम केल्यानंतर अओन केलेलं काम जनतेला सांगण हेसुद्धा एक कामच आहे.आपण काय करतोय याच्यावर्ती आपली एक प्रतिमा बनत असते”.शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुखांचा हा विचार अंमलात आणणे ही काळाची गरज आहे.शिवसेनेची स्थापनाच मुळात समाजकार्यासाठी झालेली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेनेला ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाचा मंत्र दिलेला होता, मात्र समाजकारण करायचे असेल तर सत्ता हातात असायला हवी असे शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आले.त्यानंतर शिवसेना राजकीय आखाड्यात उतरली.

शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नाही.शिवसेनेसाठी समाजकारण महत्वाचे आहे.असे असले तरी मुळात प्रभावीपणे समाजकारण करता यावे म्हणूनच शिवसेना राजकारणात उतरली.या सर्व गोष्टींचा विचार करूनच युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंनी १००% राजकारण आणि १००% समाजकारण असा नवा मंत्र शिवसेनेला दिला.यामागील मुख्य हेतू लक्षात घेऊन शिवसैनिकांनी कार्य करणे गरजेचे आहे.शिवसेनेने निवडणूक नसताना १००% समाजकारणावर लक्ष केंद्रित करावे आणि निवडणुकांच्या वेळी ती कामे जनतेसमोर निःसंकोचपणे मांडून निवडणूक जिंकून एकहाती सत्ता घेण्यासाठी १००% प्रयत्न करावेत.तसे केल्यास शिवसेनेची एकहाती सत्ता येण सहज शक्य आहे आणि आलेल्या एकहाती सत्तेचा वापर करून १००% समाजकारण करणे शक्य आहे.सत्ता हातात असताना जितक्या प्रभावीपणे समाजकारण करता येते तितके सत्ता नसताना करता येईलच असे नाही.

महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता येण सहज शक्य आहे.तितका जनाधारही शिवसेनेकडे आहे.शिवसनेचे कार्यही तितके मोठे आहे.गरज आहे ती फक्त केलेलं कार्य सर्वत्र पोहोचवण्याची. राजकारणातून समाजकारण हा भविष्यातील मंत्र आहे.सत्तेचे धनुष्य हाती आले कि मग प्रगतीचा बाण सुसाट वेगाने भविष्याचा वेध घेईल.

जय महाराष्ट्र..!



Saturday, 23 July 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

जनतेची एकजूट व्हायलाच हवी..!

तरच स्वराज्याचे सुराज्य होईल..!

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती.याच लोकमान्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक उत्सव केले.केसरी व मराठा वृत्तपत्रे काढून स्वराज्य मिळवण्यासाठी रान पेटवले.“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी गर्जना करत टिळकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि हिंदुस्थानातून हाकलून दिले.सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून देशासाठी लढणाऱ्या आणि बलिदान देण्यासाठी तयार असलेल्या देशभक्त तरुणांची फौज उभी करत स्वराज्यनिर्मितीत सिंहाचा वाटा उचलला.टिळक हे जहाल मताचे नेते होते.त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांतून जळजळीत लेख लिहित झोपलेल्या जनतेला जागे केले.इंग्रजाच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले.त्यामुळेच इतिहास घडला.आज या सर्वच गोष्टींचे स्वरूप पाहता टिळकांना काय वाटेल याची कल्पनाही न केलेलीच बरी.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा टिळकांनीच सुरु केली.आज हाच सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो.या उत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत जात असून आज महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीबोळात हा उत्सव साजरा केला जातो.स्वराज्यनिर्मितीत महत्वाचे योगदान देणाऱ्या या उत्सवाचे आजचे स्वरूप मात्र वेगळेच आहे.आजही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक कार्याचा महायज्ञ करतात.विविध सामाजिक उपक्रम राबवतात.तस पाहिलं तर आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टिळकांनाही अभिमान वाटावा असा आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.असे असले तरी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली अनेक ठिकाणी अक्षरशः धांगडधिंगा केला जातो हेही तितकेच सत्य आहे.शिवजयंतीची स्थितीही फारशी वेगळी नाही.स्वराज्यानिर्मात्या शिवरायांच्या जन्मादिनाचा वाद मिटलेला नाही.त्याउलट तो वाढतच चालला आहे.आज राज्यात ३ वेळा शिवजयंती साजरी केली जाते.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यामागे टिळकांचा असलेला हेतू लक्षात घेण फार महत्वाच आहे.विविध कारणांमुळे एरवी घराबाहेर न पडणारे विविध क्षेत्रांतील लोक या उत्सवांच्या निमित्ताने एकत्र यावेत,लोकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी,त्यातून विचारांची देवाणघेवाण व्हावी,संस्कृती वाढीस लागावी,अन्यायाला वाचा फुटावी आणि त्या अन्यायावर सर्वांनी एकजुटीने वार करावा या उद्देशांनी टिळकांनी हे उत्सव सुरु केले.आज या उत्सवांच्या नावाखाली काय चालू आहे? ज्या उत्सवामुळे देशभक्त जनता इंग्रजांच्या विरोधास लढा देण्यास एकत्र आली तोच उत्सव साजरा करणारी दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आज हे आमचे - ते तुमचे अस वागत भांडतात.एकमेकांचा तिरस्कार करतात.एकमेकांवर कुरघोड्या करून आपण किती श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करता.हे पाहता आज सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा मुळ उद्देश बाजूला सारला गेल्याच दुर्दैवी चित्र उभं राहत असल्याच लक्षात येईल.

लोकमान्य टिळकांनी या उत्सवांचा योग्य उद्देश साधत इंग्रजांच्या विरोधात लढा दिला.इंग्रजांना हिंदुस्थानातून घालवले.आज हिंदुस्थानात इंग्रज नाहीत पण “इसिस” सारख्या दहशतवादी संघटना थैमान घालत आहेत.देशातील मुस्लीम तरुणांची माथी भडकावून “जिहाद” च्या नावाखाली अशा विषारी संघटना देशातील मुस्लीम तरुणांचा वापर करून हिंदुस्थानवर वार करत आहेत.या संघटना धर्माच्या नावाखाली हे सगळ करू शकतात तर मग सार्वजनिक गणेशोत्सवात आपण एकत्र येऊन देशासाठी एकजुटीने लढण्याची शपथ का नाही घेऊ शकत? ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले त्यांच्या जयंती उत्सवात आपण देव,देश आणि धर्मावर वार करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याची शपथ का नाही घेतली जाऊ शकत? तसे घडल्यास कोणत्याही अतिरेक्यांची हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. त्यासाठी जनतेची एकजूट व्हायलाच हवी.

लोकमान्यांनी केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रातुन आपला जहाल लेखणीने स्वराज्य मिळवण्याचा लढा उभा केला,देशासाठी लढणाऱ्या लोकांची एकजूट केली त्याच वृत्तपत्र किंवा पत्रकारिता क्षेत्रात आज नेमके काय चालू आहे? आजची पत्रकारिता ही दोन नेत्यांत आग लाऊन मजा पाहण्यात धन्यता मानते.पत्रकारिता क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली आहे.पैसे घेऊन बातम्या छापणे,नको त्या गोष्टीला अनावश्यक प्रसिद्धी देणे,नेत्यांची वक्तव्ये काटछाट करून त्यांच्या वक्तव्याचा अर्थच बदलेल अशी खबरदारी घेऊन ते प्रसिद्ध करणे ही कसली पत्रकारिता? खरतर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.आजची पत्रकारिता पाहता हे खरे वाटत नाही.अनेकदा तर आजच्या पत्रकारितेचा आणि त्यातील असत्याचा वीट येतो.हे पाहून लोकमान्यांना काय वाटत असेल? पत्रकारांनी जर विवेकबुद्धीने आणि सत्याची कास धरून पत्रकारिता केली तर आजही मोठी क्रांती होऊ शकेल.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव,शिवजयंती आणि केसरी व मराठा ही वृत्तपतत्रे माध्यम म्हणून वापरत स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला.आज त्याच स्वराज्यात टिळकांच्या या उद्देशाला हरताळ फासला जातोय.जनतेची एकजूट करायची सोडून जनतेत फुट पडण्याचे कार्य आज जोमाने सुरु आहे.हे सगळ वेळीच थांबवण्याची गरज आहे.लोकमान्यांचा आदर्श घेऊन त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालण्याची गरज आहे.जनतेची एकजूट व्हायला हवी.तरच स्वराज्याचे सुराज्य होईल..!

जय महाराष्ट्र..!



Saturday, 16 July 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

धर्मांधांचे थैमान..!

ही विषवल्ली ठेचायलाच हवी..!

काल फ्रान्समध्ये मानवतेला आणि माणुसकीला काळिमा लावेल असा अत्यंत निर्दयी आणि क्रूर दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यात बॉम्ब किंवा बंदूक न वापरता दहशतवाद्यांनी चक्क ट्रक अंगावर घालत तब्बल ८४ निष्पापांचा बळी घेतला.त्याचबरोबर जवळपास ११५ लोक या दुर्दैवी प्राणघातक हल्ल्यात जखमी झाले.फ्रान्समधील नीस या शहरात फ्रान्समधील राष्ट्रीय सण “बास्तील डे” साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने जमलेल्या निरपराध नागरिकांना या हल्ल्यात लक्ष केले गेले.बेसावध असताना झालेल्या क्रूर हल्ल्यात फ्रान्सचे ८४ नागरिक मारले गेले.हल्ल्याच्या वेळी अतिरेक्याने कार्यक्रमस्थळी जमेल्ल्या गर्दीत सुसाट वेगाने ट्रक घालत हल्ला केला.यात बळी पडलेल्यांना वेगाने ट्रक चालवत २ किमी अंतरापर्यंत फरपटत नेले.या क्रूर हल्ल्याचे वृत्त पसरताच हल्ल्याची सर्वत्र निंदा झाली.

फ्रान्सवर झालेला हा हल्ला गेल्या दीड वर्षांतील तेरावा हल्ला आहे.फ्रान्सने अमेरिकेच्या इसिस विरोधी मोहिमेस खुले समर्थन दिलेले आहे.तसेच फ्रान्सने धर्मांधांचा नायनाट करण्यासाठी १० हजार सैनिकांची फौज तैनात केलेली आहे.याचा बदला घेण्यासाठी म्हणून इसिसने फ्रान्सला प्रमुख लक्ष केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर अल कायदाच्या जूनमध्ये प्रकाशित झालेल्या “इन्स्पायर” मासिकात फ्रान्स हल्ल्याची धमकी देण्यात आलेली होती.गर्दीत ट्रक घुसवा आणि गवत कापल्यासारखी माणसे कापा असा संदेश या मासिकातून अल कायदाने दिलेला होता.नेमका तसाच हल्ला काल फ्रान्सवर झाला आहे. या मासिकात प्रत्येक अंकात हल्ल्याच्या तीन नवीन योजना सांगितल्या जातात.मे महिन्याच्या अंकात पार्सल-पॅकेज बॉम्ब, मॅग्नेट कारबॉम्ब आणि डोअर ट्रॅप बॉम्ब यांचा उल्लेख होता.याच चिथावणीखोर मासिकातील मार्ग अवलंबून आज नराधम निष्पापांचा जीव घेत आहेत.

इस्लामी धर्मांधांचे हे वाढते हल्ले केवळ फ्रान्सच नव्हे तर जगासाठी चिंतेचा विषय बनले आहेत.मुस्लीम लोकसंख्या नगण्य असलेले देश हे या जिहाद्यांचे लक्ष बनत आहेत.धर्माच्या नावाखाली ही विषवल्ली जगभर फोफावते आहे.असा हल्ला झाला कि अवघी दुनिया हादरते आणि हळहळते.सर्वत्र हल्ल्याचा निषेध केला जातो.दहशतवादी संघटनांना तीव्र शब्दात इशारे दिले जातात.हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि मदतही केली जाते.या सगळ्या गोष्टी हल्ला झाल्यावर सुरु होतात आणि हल्ल्यानंतर काही दिवसात संपतात.हल्ल्याचा निषेध करून किंवा इशारे देऊन हे हल्ले थांबणार नाहीत.त्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे.हे करण कदाचित अवघड असेल पण अशक्य नक्कीच नाही.या धर्मांध जिहाद्यांना आवर घालणे विश्वशांतीसाठी अत्यावश्यक आहे.हा लढा सर्वच देशांनी एकजुटीने लढायला हवा.या धर्मांध जिहाद्यांना जहन्नुममध्ये पाठवायला हवं.अन्यथा जगाचा विनाश अटळ आहे.या धर्मांधांना दुसरी भाषा समजणार नाही,किंबहुना त्यांना ती समजूनच घ्यायची नाही.तेंव्हा त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही.जिहादच्या नावाखाली वाढणारी ही विषवल्ली ठेचायलाच हवी.

जगभर पसरत असलेले धर्मांधांचे हे थैमान आज फ्रान्समध्ये विध्वंस करत असून तीच वेळ उद्या बाकीच्या देशांवरही येणार आहे.हिंदुस्थानची स्थितीही काही फारशी वेगळी नाही.इथेही हिरवा दहशतवाद फोफावत आहे.मतांच्या लाचारीसाठी दहशतवाद्यांच्या दाढ्या कुरवाळत बसण बंद केल नाही तर एके दिवशी हिंदुस्थानात हिंदूंनाच जगण मुश्कील होईल.आजही हिंदुस्थानात असे जिहादी पकडले गेल्याच्या घटना घडत आहेतच.त्यांना पकडून चौकशी न करता थेट गोळ्या घातल्या पाहिजेत.देशाच्या मुळावर येणारी औलाद एक क्षणही जिवंत राहता कामा नये.जग काय करेल ते करेल,पण आपल्या हिंदुस्थानात शांतता नांदवायची असेल तर हा दहशतवाद मुळासकट उखडून फेकायला हवा.

दहशतवादाचा मुकाबला करायचा झाल्यास तो शांततेने करता येणार नाही.त्यासाठी साम,दाम,दंड आणि भेद अशा सर्वच शक्तींचा आणि ताकदीचा वापर करावा लागेल.ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायला हवं.जगाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी या धर्मांध औलादींचे रक्त सांडावे लागले तर त्यात गैर काय आहे? त्यांचे रक्त वाचवण्याच्या नादात रोज निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहताना शांत बसून पाहत राहणे हा अक्षम्य गुन्हा आहे.फ्रान्सच काय तर आजवर जगभरात झालेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्या निरपराधांना आणि शहिदांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर हा धर्मांध हिरवा दहशतवाद ठेचायालाच हवा.तर,तर आणि तरच त्या निरपराध जीवांच्या आत्म्यांना शांती लाभेल.

जय महाराष्ट्र..!

Friday, 8 July 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

मिशन २२८..!

मुंबई शिवसेनेचीच..!

मुंबई महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे भाजपचे दिवास्वप्नात रममाण झालेले नेते शिवसेनेवर टीका करून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.लोकसभा निवडणूक स्वबळावर जिंकल्याने आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तेवढ प्रचंड यश मिळाल्याने भाजप नेते आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून मते मागण्याऐवजी ते शिवसेनेवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.मोदी लाटेत मिळालेल्या विजयाने हुरळून गेलेल्या भाजप नेत्यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्याच्या विचारानेच गुदगुल्या होत आहेत.त्यामुळे अतिउत्साहाच्या भरात ते शिवसेनेवर तोंडसुख घेऊन प्रसिद्धी मिळवत आहेत

यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आघाडीवर आहेत.त्यांनी मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेला उद्देशून राक्षसावर वार करून त्याला मोठा करू नका,त्याला बाटलीत बंद करा आणि दुर्लक्ष करून संपवा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.त्याच मेळाव्यात महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठींब्यावर मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या देवेंद्र फडणविसांनी शिवसेनेवर “प्रायव्हेट लिमिटेड” पक्ष असल्याची टीका करत महानगरपालिका निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकत नाही असे वक्तव्य करून कार्यकर्त्यांत हवा भरली.त्या हवेत तरंगत कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या मिशन - ११४ ची घोषणा केली.आगामी निवडणुकीत भाजपचाच महापौर बसवण्यासाठी सुरु असलेला भाजपचा हा आटापिटा पाहता त्यांची स्थिती “उतावळा नवरा,गुढग्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे झाली आहे असे दिसते.

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून शिवसेनेचा भगवा सदैव फडकत आहे.मुंबईला मुंबई हे नाव देण्यापासून ते आजपर्यंत शिवसेनेने मुंबईसाठी अनेक विकासकाम केलेली आहेत.शिवसेनेचं हे कार्य विसरून भाजपच्या भूलथापांना बळी पडून भाजपला मतदान करायला मुंबईकर जनता खुळी नाही.त्यामुळे शिवसैनिकांनी भाजपप्रमाणे “मिशन ११४” न ठेवता मुंबईतील सर्वच्या सर्व २२८ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागावे.छत्रपती शिवराय मावळ्यांच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतात तर शिवसेना शिवसैनिकांच्या बळावर मुंबईत शिवराज्य का नाही आणू शकणार? मुंबई शिवसेनेचीच होती,आहे आणि राहील ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवेल हे सुनिश्चित आहे.शिवसेनेचा हा विजय महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातील बदलाची नांदी ठरेल.तसेच २०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या भगव्या वादळाची चाहूल ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लागेल.मुंबईत शिवसेनेने विकासकामे केलेली असून जनहितासाठी झटणाऱ्या शिवसेनेला विजयाची खात्री आहे.त्यामुळे शिवसेनेने केवळ ११४ जागांचे लक्ष न ठेवता “मिशन – २२८” चे लक्ष ठेऊन संपूर्ण मुंबई भगवी करावी.

मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने नेहमीप्रमाणे विरोधकांच्या तोंडाची गटारे वाहू लागली आहेत.त्यात इतकी वर्षे शिवसेनेच्या कृपेने मुंबईचे उपमहापौरपद भूषवलेल्या भाजपच्या नालेवाल्यांची भर पडलेली आहे.तमाम मुंबईकर जनतेने या सांडपाण्यामुळे आपल मन दुषित होऊ न देता शिवसेनवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा आणि शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी कराव.अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा लुंगीवाल्यांचे,भैय्यांचे आणि गुजरातींचे वर्चस्व निर्माण होईल.मराठी माणूस हक्काच्या मुंबईत उपरा होईल.प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाला डावलल जाईल आणि सर्वात महत्वाच म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी टपलेले कोल्हे आणि लांडगे पुन्हा आपलं डोकं वर काढतील.शिवसेनेला मुंबईची सत्ता आजवर जनतेच्या कृपा-आशीर्वादाने मिळाली आहे.तो विश्वास शिवसेनेने नेहमीच सार्थ ठरवला आहे.त्यामुळे शिवसेनेला जनतेकडे मत मागण्याचा अधिकार आहे.शिवसैनिकांनी अभिमानानं केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवून शिवसेनेच्या प्रचाराची धुरा यशस्वीपणे पेलावी.जनता नक्कीच शिवसेनेला विजयी करेल.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे.मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कपट-कारस्थान अनेक वर्षांपासून चालू आहे.शिवसेना असेपर्यंत ते कदापि शक्य नाही,मात्र मुंबईत विरोधकांची सत्ता आल्यास मुंबई महाराष्ट्रात असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाच जगण मुश्कील होईल.कोल्हे-लांडगे माजतील आणि मुंबई लुटतील.हे होऊ द्यायचं नसेल तर मुंबईत शिवसेना,शिवसेना आणि शिवसेनाच विजयी झाली पाहिजे आणि बाकीच्या कोल्हया-लांडग्यांना मुंबईकरांनी धूळ चारली पाहिजे.जवळपास प्रत्येक वेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीस शिवसेनेची अग्निपरीक्षा म्हणून पहिले जाते.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेची अग्निपरीक्षा नसून मुंबईतील मराठी जनतेची अग्निपरीक्षा आहे.विरोधक आमिष दाखवतील,खोटा प्रचार करतील मात्र मुंबईकर नक्कीच दाखवून देतील - मुंबई शिवसेनेचीच..!



जय महाराष्ट्र..!