(माझा आजचा लेख:)
भाजपचे गोंधळी..!
पराभवाची जाणीव..!
सध्या भाजपच्या विविध स्तरांतील नेत्यांमध्ये शिवसेनेवर टीका करण्याची स्पर्धाच सुरू आहे.स्वतःची काम जनतेसमोर मांडायची सोडून भाजप सरकारमधील मंत्री,नेते,पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते शिवसेनेवर टीका करण्यात मग्न आहेत.शिवसेनेने सरकारच्या कोणत्याही निर्णयावर प्रतिक्रिया दिली की ती टीका समजून भाजपवाले शिवसेनेच्या त्या प्रतिक्रियेवर आणि प्रतिक्रिया देणाऱ्यावर अधाशासारखं तुटून पडतात.घशाला कोरड पडेपर्यंत बोंब मारून भारतीय जनता पक्ष कसा योग्य आहे आणि शिवसेना कशी चुकीची आहे हे पटवून देण्यासाठी ते जीवाचे रान करतात.शिवसेनेवर टीका करण,शिवसेनेची बदनामी करण असा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेली भाजपमधील नेतेमंडळी आणि नमोभक्त कार्यकर्ते या प्रकारात अग्रेसर आहेत.
जनतेची दिशाभूल करू पाहणाऱ्या भाजपवाल्यांच्या या कोल्हेकुईला मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत चालल्याने वेग आला आहे.मुंबईतील मराठी जनतेची दिशाभूल करून,त्यांना शिवसेनेविरुद्ध वळवून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्वबळावर विजयी करण्याच दिवास्वप्न मनात बाळगून असलेले आंधळे नमोभक्त कोल्हे शिवसेनेवर तुटून पडत आहेत.अलीकडेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्ते प्रकरणावर बोलताना “करून दाखवलं” वाल्यांवरही कारवाई होईल अस वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधण्याचा बालिश प्रयत्न केला.हे करत असताना त्यांना मागील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विसर पडल्याच दिसत.मागील मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येताच हेच आशिष शेलार आणि भाजपवाले विरोधकांच्या टीकेला घाबरून बिळात लपून बसलेले होते.तेंव्हा शिवसेना “करून दाखवलं” अस म्हणत केलेली काम घेऊन अभिमानाने आणि ताठ मानेने जनतेला सामोरी गेली आणि जनतेचा विश्वास संपादित करून शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकून दाखवली.
त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी “मनोगत” मधून बरळले.त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करत शिवसेनेला भाजपसोबत तलाक घेण्याची म्हणजेच काडीमोड घेऊन सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला देत आपल्या नसलेल्या अकलेचे प्रदर्शन मांडले.शिवसेनेने सरकारच्या काही निर्णयांवर मांडलेली मते ही टीका समजून उद्विग्न झालेल्या भंडारी यांनी आजवर आमदारकी न मिळाल्याचा रोष शिवसेनेवर काढला.शिवसेनेला सरकारवर टीका करायची असेल तर शिवसेनेन सरकारमधून बाहेर पडाव अस भंडारी याचं म्हणण आहे.भाजपला जर शिवसेनेन केलेली टीका किंवा मांडलेली मते पटत नसतील,सहन होत नसतील तर भाजपवाले शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेत का बसलेले आहेत तेही त्यांनी स्पष्ट करावे.अनेकदा भाजप नेते मस्तवालपणे म्हणतात की शिवसेनेने सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आमच्याकडे दुसरे पर्याय आहेत.याचा नेमका अर्थ काय? शिवसेनेन सरकारचा पाठींबा काढून घेतल्यास भाजपवाले पवार,भुजबळ आणि तटकरेंच्या भ्रष्ट्वादीसोबत सत्तेत बसण्याच्या तयारीत आहेत का? की अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोबत सरकार चालवणार आहेत? भाजपवाल्यांना शिवसेना सोबत नको आहे आणि हे भ्रष्टाचारी बोके सोबत हवे आहेत काय?
शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्तेत बसायचं आणि हे सरकार फक्त भाजपच आहे अशी टिमकी वाजवायची. सत्तेत बसून मनमानी करायची.विरोधी पक्षात असताना सरकारच्या ज्या निर्णयांना विरोध करून मते मिळवलेली आहेत आणि सत्ता मिळवलेली आहे तेच निर्णय सत्तेचा वापर करून जनतेवर लादायचे हे सध्या भाजपच धोरण आहे,हे पाप शिवसेना करणार नाही.ते भाजपवाल्यांनी करायचा प्रयत्न केल्यास शिवसेना ते करू देणार नाही.शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी अजिबात नसून ती केवळ जनतेशी आहे.जनतेला टोप्या घालण्याच काम शिवसेना कदापि करणार नाही.मुळात भाजपवाल्यांच दुखण हेच आहे.त्यांना खरतर शिवसेनेचा पाठींबा घेऊन सत्तेत बसण्याशिवाय अजिबात पर्याय नाही.शिवसेना भाजपच्या मनमानीला विरोध करून जनतेसोबत राहते हे भाजपला सहन होत नाही.त्यामुळे गोंधळलेले भाजपचे गोंधळी आज शिवसेनेच्या विरोधात कोल्हेकुई करत आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवण्याच दिवास्वप्न मनात बाळगणारे भाजपवाले हे खरतर मनातून हरलेले आहेत.मुंबई मनपा निवडणूकत पराभव समोर दिसत असल्याने खचलेले नमोभक्त उसन अवसान आणून शिवसेनेवर टीका करत आहेत.शिवसेना वाईट म्हणजे भाजप चांगला अस कस होऊ शकत? आम्ही कसे आहोत ते जनताच ठरवेल,पण तुम्ही आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमची कामे जनतेसमोर मांडा.जनता काय खर काय खोट ठरवेल.लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा न्यायनिवाडा मतदानाद्वारे जनताच करत असते.ते भाजपच काम नव्हे.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला तर आपली पीछेहाट होईल आणि परिणामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपला मागे सारून शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल अस लक्षात आल्यानं भाजपची ही तडफड सुरु आहे.पराभवाची जाणीव हे यामागच मुख्य कारण आहे.त्यामुळेच भाजपची फडफड सुरु आहे.त्यांच्या मनातील भय नाहीसे होऊन त्यांना शांती लाभावी हीच सदिच्छा..! आगामी काळात मुंबई,ठाणे आणि महाराष्ट्रावर भगवा फडकण तर अटळ आहे.
जय महाराष्ट्र..!