Saturday, 11 June 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

काय ही अवस्था?

एकनाथाचा झाला अनाथ..!

मागील आठवड्यात महाराष्ट्र भाजपचे जेष्ठ नेते,राज्य सरकारमधील महसूल,कृषी आणि अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री असलेल्या,विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्याचे स्वघोषित शिल्पकार असलेल्या आणि शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा देऊन घरी जावे लागले.विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनाद्वेषाचा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेल्या खडसेंना राजीनामा द्यावा लागल्याने शिवसेनेच्या वाटेत आडवे येणाऱ्यांचे काय होते याचे दर्शन सर्वांना घडले.राणे,भुजबळ,राज अशा अनेक गद्दारांनंतर शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न पाहून स्वतःच संपलेल्यांच्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव समाविष्ट झाले.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेली युती मीच तोडली अशी टिमकी मिरवणाऱ्या खडसेंनी गेल्या दीड वर्षात शिवसेनाद्वेषाचा कळस गाठला होता.त्याचबरोबर “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजनच हवा” अशी वक्तव्ये करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अनेकदा अडचणीत आणले होते.ज्युनिअर फडणवीस यांच्यामुळे मुख्यमंत्रीपद हुकल्यामुळे सिनिअर खडसेंनी अनेकदा त्यांच्यावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे आणि शिवसेना संपवण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या एकनाथ खडसेंवर भोसरी येथील जमिनीच्या गैरव्यवहाराचे,अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी फोनवरून संभाषण केल्याचे आरोप झाले.तसेच त्यांच्या पीएने “गंमत म्हणून” मागितलेल्या तब्बल ३० कोटी रुपयांच्या लाचेचे प्रकरणही महाराष्ट्रभर गाजले.खडसेंच्या दुष्कृत्यांची अपकीर्ती वेगाने पसरली.परिणामी भाजपच्या स्वच्छ कारभाराच्या प्रतिमेवर शिंतोडे उडू लागले.जनतेच्या मनात भाजपविषयी शंका निर्माण होत असल्याचे पाहून खडसेंचा राजीनामा घेण्यात आला.

या सर्व प्रकरणात एकनाथ खडसे एकाकी पडले असल्याचे चित्र दिसले.मुंडेंच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून खडसेंनी भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्नही केला,मात्र शेवपार्यंत खडसेंना वाचवण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही.शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार “ज्युनिअर” फडणविसांकडे खडसेंना राजीनामा द्यावा लागला.जळगावचे काही नगरसेवक वगळता याचा कोणीच निषेध केला नाहीत किंवा खडसेंच्या समर्थनार्थ राजीनामेही दिले नाहीत.खडसेंच्या राजीनाम्याचे वृत्त समजताच जळगावात शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.जळगावातील भाजप कार्यालय आणि भाजप कार्यकर्त्यांत मात्र सन्नाटा पसरला होता.भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने खडसेंचा चिखलात रुतलेला पाय दिवसेंदिवस खोलात गेला आणि शेवटी खडसेंना राजीनामा द्यावाच लागला.राजीनामा दिल्यानंतरही खडसेंनी “अजूनही सांगतो पुरावे द्या” अशी आरडाओरड केली,मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.

खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा विषयच बाजूला पडला.मंत्रीपद असताना मागेमागे धावणारे खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर मात्र त्यांची साथ सोडून गेले.अगदी स्वतःची बाजू दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यासाठी गेलेल्या खडसेंना दिल्लीत नितीन गडकरी वगळता कोणीच भेटले नाही.पंतप्रधान मोदींनी खडसेंसाठी अर्धा तास राखीव ठेवल्याचे वृत्त आले होते,मात्र पंतप्रधानांनी खडसेंना अर्धा क्षणही वेळ न दिल्यामुळे हि बातमी अफवाच ठरली.आता खडसेंकडे ना मंत्रीपद आहे ना मानसन्मान.पक्षातही कोणी विचारत नाही आणि समाजातही मान नाही.काय ही अवस्था? त्यामुळे खडसे राजकीयदृष्ट्या अनाथ झालेत असच म्हणाव लागेल.एकनाथाचा झाला अनाथ..!

शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करण्यासाठी मुंबईचा सैन्यातळ केला होता.आज ते भुजबळ तुरुंगात खितपत पडलेले आहेत.शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हाकलून दिल्यानंतर राणेंनी दहशतीच्या बळावर शिवसेनेशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांना शिवसेनेने सहा महिन्यात दोनवेळा धूळ चारली.अगदी घराचा मतदारसंघ असलेल्या कोकणातही राणेंना पराभून व्हाव लागलं.शिवसेनेची औकात काढणाऱ्या मनसे अध्यक्षांचे दुकान आता जवळपास बंद झाले आहे.त्याचप्रमाणे शिवसेना संपवून टाकण्याची भाषा वापरणाऱ्या खडसेंना राजीनामा देऊन घरी परतावं लागलं.शिवसेना संपली म्हणणारे संपले,शिवसेना अजून जिवंत आहे आणि ज्वलंत आहे हेच खरे.शिवसेना संपवायला खडसेंच्या सातशे पिढ्या जरी खाली उतरल्या तरी ते शक्य नाही.खडसेंनी आता राजकीय संन्यास घेऊन शिवसेनेशी युती तोडल्याचे पोवाडे गात भटकायला हरकत नाही.



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment