Sunday, 19 June 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

आजि सोनियाचा दिनू..!

शिवसेना चिरंजीव आहे..!

आज १९ जून २०१६.आजचा दिवस आपल्या शिवसेनेचा वर्धापनदिन. आजि सोनियाचा दिनू..!१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली.तेंव्हापासून आजतागायत मराठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा आणि भगवा झेंडा घेऊन शिवसेनेचा अश्वमेध पुढे जात आहे.शिवसेनेची ही वाटचाल ऐतिहासिक आहे.महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होत असताना आणि हिंदुस्थानात हिंदुत्वाबद्दल बोलण गुन्हा असताना मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कोणत्याही तडजोडीशिवाय अविरतपणे मांडत राहाण हे सोपं काम नाही.शिवसेनेन हे शिवधनुष्य गेली ५० वर्षे यशस्वीरीत्या पेलवल आहे.सुरवातीला शिवसेना मराठी माणसाच्या न्याय,हक्क व सेवेसाठी झटणारी सामाजिक संघटना म्हणून कार्यरत होती,मात्र समाजकारण करायचे असेल तर राजकारणात उतरण अत्यावश्यक आहे हे लक्षात येताच शिवसेना राजकारणात उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र दिला.तोच मंत्र घेऊन शिवसेना आजही कार्यरत आहे.

समाजकारणातून राजकारणात उतरलेल्या शिवसेनेला सर्वप्रथम ठाण्याची सत्ता मिळाली.त्यानंतर लगोलग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईवर शिवसेनचा भगवा फडकला.शिवसेना महाराष्ट्रभर पसरू लागली.पुढे अयोध्येत राममंदिरासाठी छेडलेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी बाबरी मशीद उध्वस्त केली.बाबरी पडताच बाकीच्यांनी हात झटकले.बाबरी पाडण हे शिवसैनिकांच काम आहे अस वक्तव्य आंदोलनात सहभागी नेत्याने करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी “बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे” अशी गर्जना केली.त्यामुळे बाळासाहेब हिंदुस्थानातील हिंदूंच्या गळ्यातील ताईत बनले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट झाले.शिवसेना हिंदुस्थानभर पसरू लागली.महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू असा अजेंडा घेऊन वाटचाल करत असलेल्या शिवसेनेची पुढे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपशी युती झाली.

१९९५ साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली.हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला.शिवसेनेचा भगवा झंझावात महाराष्ट्रभर पसरला आणि १९९५ साली शिवसेनेचा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर मोठ्या डौलान,अभिमानानं,स्वाभिमानान आणि जबरदस्त तेजाने फडकला.महाराष्ट्रात शिवशाही अवतरली.शिवसेनेचे मनोहरपंत जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.राज्याचा कारभार शिवसेनेच्या हाती आला.त्यानंतर केंद्रात अटलजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेवर आलं.दोन्ही सरकारचा रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे होता.देशाचा आणि राज्याचा कारभार “मातोश्री” च्या आदेशानुसार चालत होता.अत्यल्प दरात झुणका-भाकर देण्यापासून ते चकचकीत फ्ल्यायओव्हरपर्यंत अनेक लोकप्रिय विकासकामे या शिवशाही सरकारच्या काळात झाली.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे,वांद्रे-वरळी सी-लिंक अशा अनेक प्रकल्पांमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची दूरदृष्टी महाराष्ट्राने पाहिली.

शिवसेनेचा हा प्रवास सुरु असतानाच छगन भुजबळांनी शिवसेना सोडली,पण शिवसेना डगमगली नाही.२००३ साली महाबळेश्वर येथील शिबिरात शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी उध्दवसाहेब ठाकरेंची निवड झाली.शिवसेनेचा कारभार हळूहळू उध्दवसाहेब ठाकरेंकडे यायला सुरुवात झाली.त्यानंतरच्या काळात नारायण राणेला शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हाकलून दिल.राणेन दहशतीच्या बळावर कोकणात काहीकाळ दादागिरी चालवली खरी मात्र शिवसेनेन राणेला शेवटी कोकणच्या मातीत गाडून राणेची दहशत संपवली.पुढे २००५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरेंनी उध्दवसाहेब ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्याच कारण पुढे करत शिवसेना सोडली.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत शिवसेनेचाच मराठीचा अजेंडा घेऊन बाळासाहेबांच्याच शैलीत शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दवसाहेबांनी मात्र आपल्या शांत,संयमी आक्रमक शैलीत मनसेच दुकान बंद केल.

शिवसेनाप्रमुखांचे वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे शिवसेनेची सूत्र शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार कार्यप्रमुख उध्दवसाहेब सांभाळत होते.२००७ आणि २००९ साली त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेन मुंबई आणि ठाण्याच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकल्या.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दवसाहेब ठाकरेंनी आपल्या कृतीतून नेतृत्व सिद्ध करत टीकाकारांची तोंड बंद केली. दरम्यान २०१० साली युवासेनेची स्थापना झाली.युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून तरुणांचा आवाज बुलंद केला.आज युवसेनेचे कार्य हिंदुस्थानसह विदेशातही चालू आहे.त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंताच्या प्रवासाला निघाले.ही घटना केवळ ठाकरे कुटुंबालाच नव्हे तर जगाला हादरवणारी ठरली.या दुःखाच्या महासागरातून सावरत उध्दवसाहेबांनी शिवसेनेला एक पाउल पुढे नेण्याचा निश्चय केला.याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचा निभाव लागणार नाही,शिवसेना आता संपेल अशी भाकीत वर्तवली गेली.२३ जानेवारी २०१३ साली शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्रे हाती घेत उध्दवसाहेबांनी “रडायचं नाही लढायचं” असा निर्धार केला.२०१३ साली त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेन महाराष्ट्रात २० जागा लढवल्या.त्यापैकी तब्बल १८ जागांवर शिवसेनेचा विजय झाला.पुढे विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकावून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंच्या पाठीत मोदी लाटेमुळे हवेत गेलेल्या भारतीय जनता पक्षाने खंजीर खुपसला.शिवसेनेसोबत २५ वर्षांपासून असलेली युती भाजपने ऐनवेळी तोडली.शिवसेनेला एकट पडण्याचा प्रयत्न केला,मात्र तरीही या सर्व संकटांवर मत करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेबांनी मोदी लाटेला आव्हान दिल आणि मोदींच्या विरोधात लढत शिवसेना स्वबळावर ६३ जागी विजयी झाली.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांतही शिवसेनेन बाजी मारली.

आज शिवसेनचा ५० वा वर्धापनदिन मोठ्या जल्लोषात,उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतोय.या ५० वर्षात शिवसेनेन आडवं येणाऱ्या प्रत्येकाला गाडून आणि आलेल प्रत्येक वादळ थोपवून ऐतिहासिक वाटचाल केली आहे.अगदी सुरुवातीपासून ते आजपर्यंत शिवसेनेवर टीका होत राहिली आहे.सुरुवातीला शिवसेनेला “वसंतसेना” आणि “सदाशिवसेना” म्हणून हिणवल गेलं.शिवसेनेवर बंदी घालण्याचे प्रयत्न झाले.अनेकांनी गद्दारी करत शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.काहींनी शिवसेना जनता पक्षात विलीन करावी असा सल्ला शिवसेनाप्रमुखांना दिला.काहींनी शिवसेना संपवण्याचा अट्टाहास करून पाहिला.पुढे शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रचंड टीका झाली.लोकसभेत शिवसेनेला मिळालेलं यश मोदींच आहे अस म्हटलं गेलं,मात्र शिवसेनेने विधानसभेत त्याच मोदींशी दोन हात करत स्वबळावर ६३ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला.२०१५ च्या दुष्काळात शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी शिवसेनेने मदतयाग केला.त्यासाठी अनेक योजना यशस्वीरीत्या राबवल्या.

शिवसेनेवर टीका करणारे,शिवसेनेवर बंदी घालू पाहणारे,शिवसेनेशी गद्दारी करणारे,शिवसेना जनता पक्षात विलीन करा अस सांगणारे,शिवसेना संपवण्याचा विडा उचलणारे,शिवसेना पक्षप्रमुखांवर टीकेची झोड उठवणारे कोणीही असोत ते सगळेच्या सगळे संपलेले आहेत.शिवसेनेच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेन आडवं केल आहे.यापुढेही जे शिवसेनेच्या वाटेत येतील ते संपतील.एवढच नव्हे आज शिवसेनेसमोर आव्हान उभे करू पाहणारे पक्षही संपतील.शिवसेना मात्र सदैव जिवंत आणि ज्वलंत राहील.शिवसेनेबद्दल लिहायला शब्द पुरणार नाहीत.खरोखरच खूप शिवसेनेचं कार्य विशाल आहे.अशा या सुवर्णमहोत्सवी शिवसेनेचे आम्ही शिवसैनिक म्हणून एक भाग आहोत हेच आमचे परमभाग्य.

आज शिवसेना ५० वर्षांची झाली तरी शिवसेनेचे कार्य मात्र २५ वर्षांच्या तरुणाप्रमाणे जोशात सुरु आहे.सध्या शिवसेनेने दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे.शिवसेनेच्या यशस्वी “शिवजलक्रांती” योजनेने दुष्काळग्रस्तांची तहान भागायला सुरुवात झाली आहे.याचे समाधान ते केवढे? त्याची तुलना ना पैशांशी होऊ शकते ना सत्तेशी.सत्ता असो वा नसो शिवसेना लोककल्याणासाठी झटत होती,झटत आहे आणि झटत राहणार.शिवसेनेच्या पाठीशी गोरगरीब आणि गरजुंचे तसेच तमाम मराठी बांधवांचे आणि हिंदू जनतेचे आशीर्वाद आहेत.शिवराय आणि बाळासाहेबांचा विचार शिवसेनेकडे आहे.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरेंचे कुशल नेतृत्वही शिवसेनेकडे आहे आणि युवासेनाप्रमुख आदित्यसाहेबांचे युवा नेतृत्वही शिवसेनेकडे आहे.मराठी आणि हिंदुत्वासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांची फौज शिवसेनेकडे आहे.मराठी आणि हिंदुत्वाचा अमृतसंगम शिवसेनेकडे आहे.अशा शिवसेनेला कोणी संपवू तर शकतच नाही पण साधा धक्काही लावू शकत नाही.शिवसेना चिरंजीव आहे..!

जय महाराष्ट्र..!
  

  

No comments:

Post a Comment