Saturday, 24 November 2018

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर होणारी टीका खोडून काढणारे हे मुद्दे नक्की वाचा



आजघडीला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात असलेलं एकमेव परिपक्व व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे.


उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार म्हटलं की विरोधक कोणत्या मुद्द्यावरून टीका करतील ते आधीच ओळखून त्यांनी विरोधकांचे सगळे मुद्दे संपवले आणि म्हणूनच विरोधकांचा तिळपापड सुरू आहे. 

महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना अयोध्या दौरा कशाला? हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी दिवाळीतच सोडवला. शिवसेना व युवासेना यांच्यामार्फत हजारो शेतकरी कुटुंबांना तब्बल दोन महिने पुरेल इतकं अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू शिवसेनेने मोफत दिल्या.

बाळासाहेबांचं स्मारक बांधता नाही आलं अयोध्येत जाऊन काय करणार? असाही एक प्रश्न सध्या विरोधक शिवसेनेला विचारत आहेत. मुळात बाळासाहेबांचं स्मारक आणि राम मंदिर मुद्दा पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ती एकदा पूर्ण झाली की बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारलं जाईल. त्याला इतका वेळ लागत आहे याचं कारण सरकारी प्रक्रिया व इतर बाबी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वाभिमानी नेते होते.त्यांच्या स्मारकासाठी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख कोणाकडेही काहीही मागणार नाहीत. अगदीच गरज पडल्यास २०१९ मध्ये शिवसेनेचं सरकार येताच शिवसेना स्वतः स्मारकाची प्रक्रिया व बांधकाम पूर्ण करेल. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्वाभिमान गहाण ठेवलेल्या अथवा भ्रष्टाचारी नेत्यांच्या मदतीची शिवसेनेला गरज नाही.


अयोध्येला जाणार पण शिवरायांना विसरले अशी टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्या दैवत आहे. शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवरायांचं दर्शन घेतलं व तिथल्या पवित्र मातीचा कलश घेऊन ते अयोध्येला जाणार आहेत.


हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मग मराठीच काय झालं? हा एक प्रश्न शिवसेनेला विचारलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात मराठी व हिंदुस्थानात हिंदू ही बाळासाहेबांची भूमिका कायम ठेवली आहे. 

राम मंदिर मुद्दा निवडणूक व मतांसाठी घेतला ही टीका शिवसेनेवर होत आहे. प्रत्यक्षात शिवसेनेने भाजप, संघ व विहिंप यांचा राजकारणासाठी व २०१९ ला मतांसाठी वापरला जाऊ शकेल असा मुद्दा निवडणुकीआधीच निकालात काढायचं ठरवलं आणि त्यामुळेच या बेगडी हिंदुत्ववादी संघटना व भाजपची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. राहिला प्रश्न इतर विरोधकांचा. शिवसेना या मुद्द्याच राजकारण कायमच संपवण्यासाठी "मिशन अयोध्या" राबवत आहे.

यापुढेही जर शिवसेनेवर टीका केली जात असेल तर अशा सर्व विरोधकांच्या बुध्दीची कुवत आम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी खुशाल टीका करावी. त्यांच्या त्रस्त व अतृप्त आत्म्यांना शांती लाभो. जय महाराष्ट्र...! जय श्रीराम..!

Friday, 23 November 2018

उद्या सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील घराघरात श्रीरामाची आरती करूया


गाडून टाकू जातिभेद, आता फक्त  हिंदुत्वाचे वेध..

उद्धव ठाकरे अयोध्येत करतील रामनामाचा जागर, महाराष्ट्रात घुमेल महारतीचा गजर..


शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरयू नदी घाटावर श्रीरामाची आरती करतील. त्याच वेळी आपण सगळे आपल्या घरात, जवळील राम मंदिरात अथवा शक्य असेल तिथे श्रीरामाची महाआरती करूया.

हिंदूंनो, पुढील ३ दिवस श्रीरामाचा फोटो डीपी आणि प्रोफाईल फोटो ठेवा



शिवसेनेने राम मंदिराचा नारा देताना "हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार" असा नारा दिलेला आहे. 24 व 25 नोव्हेंबरला शिवसेना अयोध्येत राम मंदिराचा नारा बुलंद करेल. हा केवळ शिवसेनेचा विषय नाही, तर तमाम हिंदूंचा विषय आहे. शिवसेनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस बाकीचे सर्व मतभेद, पक्षभेद, राजकारण बाजूला ठेवून आपण शिवसेनेच्या या मागणीला बुलंद करण्यासाठी श्रीरामाचा फोटो डीपी अथवा प्रोफाइल फोटो म्हणून सेट करावा.

आजपासून 3 दिवस संपूर्ण सोशल मीडिया वर श्रीरामाची लाट दिसली पाहिजे. हिंदुनो, जागे व्हा. फक्त शिवसेना पुढाकार घेतीये म्हणून राममंदिर प्रश्नावर सुद्धा हिंदूंची एकजूट होणार नसेल तर मग काय फायदा ?


Tuesday, 20 November 2018

उद्धव ठाकरे अयोध्येत करतील रामनामाचा जागर, महाराष्ट्रात घुमेल महाआरतीचा गजर..




गाडून टाकू जातिभेद, आता फक्त  हिंदुत्वाचे वेध..

उद्धव ठाकरे अयोध्येत करतील रामनामाचा जागर, महाराष्ट्रात घुमेल महाआरतीचा गजर..


शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरयू नदी घाटावर श्रीरामाची आरती करतील. त्याच वेळी आपण सगळे आपल्या घरात, जवळील राम मंदिरात अथवा शक्य असेल तिथे श्रीरामाची महाआरती करूया.

हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार..!

Monday, 19 November 2018

पहा साहेबांच्या महायात्रेचं वर्तमानपत्रांनी केलेलं वर्णन

हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख, सरसेनापती, महानेता बाळासाहेबांच्या महायात्रेचं महाकव्हरेज करताना वर्तमानपत्रांना अक्षरशः पानं कमी पडली. पहा साहेबांच्या महायात्रेचं वर्तमानपत्रांनी केलेलं वर्णन.
































Sunday, 18 November 2018

साहेब गेले अन् वर्तमानपत्रे सुद्धा साहेबांच्या आठवणीत हरवून गेली..

१८ नोव्हेंबर २०१२ रोजी मराठी/इंग्रजी वर्तमानपत्रे बाळासाहेबांच्या आठवणीत हरवून गेली होती. त्यातील काही निवडक वर्तमानपत्रांचा या पोस्टमध्ये समावेश केला आहे.













Saturday, 17 November 2018

"वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला" या लेखमालेच्या ई बुक आवृत्ती संकेतस्थळाचा प्रकाशन सोहळा संपन्न

हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवा:

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझ्या "वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला" या लेखमालेच्या ई बुक आवृत्ती संकेतस्थळाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला..


२०१९ लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. शिवसेना स्वबळावर लढेल असं शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. सदर लढाईत आपण शिवसैनिक म्हणून योगदान देत आहातच. शिवसेनेचा प्रचार करत असताना विचारले जाणारे प्रश्न, विरोधकांचे आरोप व शिवसेनेवर ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने टीका होते ते मुद्दे मी या लेखमालेतील लेखांत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून खोडून काढले आहेत.

आता ही लेखमाला सर्वांना वाचता यावी व विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना प्रत्येक शिवसैनिकाची बाजू मजबूत व्हावी यासाठी सर्वत्र पोहोचणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी मला  शिवसैनिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

लेखमाला लिहिली तेंव्हा आपण अक्षरशः लाखोंच्या संख्येने प्रतिसाद दिला. आता ही लेखमाला आपल्या शिवसेनेच्या प्रचारासाठी सर्वत्र पोहोचवून सहकार्य करावे हि विनंती.

प्रत्येक शिवसैनिकाने ही पोस्ट लिंक सहित जास्तीत जास्त फेसबुक, व्हॉट्स ऍप ग्रुप्स, मेसेजेस, फेसबुक पेजेस, ट्विटर, व इतर सोशल मीडिया माध्यमातून शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवावेत.


सदर लेख सामान्य जनतेपर्यंत पोहचवले असता सामान्य जनतेच्या मनातील शिवसेना विषयक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील व त्याचा फायदा शिवसेनेला होईल.


शिवसेना - युवासेना पदाधिकाऱ्यांनी लेखमाला अवश्य वाचून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य केल्यास उत्तम.

आपल्या सर्वांच्या  सहकार्यानेच हे शक्य आहे. ही लेखमाला महाराष्ट्रभर पोहोचावी एवढीच अपेक्षा. आपणा सर्वांचे हार्दिक आभार.

ही लेखमाला शिवसेना प्रमुखांच्या चरणी अर्पण..!


"वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला" ई बुक आवृत्ती शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवसेनाप्रमुखांच्या चरणी अर्पण


"वाघगर्जना"
दिवाळी विशेष लेखमाला संकेतस्थळाचा प्रकाशन सोहळा संपन्न

http://waghgarjanaebook.blogspot.com/2018/11/ebookindex.html?m=1

Friday, 16 November 2018

"वाघगर्जना" संकेतस्थळावर आपलं सहर्ष स्वागत..!



वाघगर्जना दिवाळी विशेष लेखमाला ई - बुक लेखक - शशांक देशपांडे 
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो..!
हिंदुप्रजापती शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो..!
युवाहृदयसम्राट युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांचा विजय असो..!
||वंदनीय शिवसेनाप्रमुखाय नम:||

Sunday, 11 November 2018

दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेकडून 27 ट्रक अन्नधान्य रवाना; उद्धव ठाकरे यांनी दाखवला भगवा झेंडा



महाराष्ट्रात दुष्काळ अक्राळविक्राळ रूप धारण करतोय. या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या घरात शिवसेना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आहे. जरी शिवसेनेने अयोध्येचा मुद्दा घेतला असला तरी मंदिरातला दिवा पेटण्याआधीशेतकऱ्यांच्या घरातली चूल पेटवणं हेसुद्धा कर्तव्य आहेअसे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. अन्नधान्यांनी भरलेल्या 27 ट्रकना उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा दाखवला आणि हे ट्रक दुष्काळग्रस्त गावांच्या दिशेने रवाना झाले.


वांद्रे येथील लीलावती रुग्णालयासमोरील मैदानात अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले 27 ट्रक सज्ज झाले. दुष्काळग्रस्त भागात निघालेले हे ट्रक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रवाना झाले. दुष्काळाची परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. या मदतीच्या माध्यमातून त्यांच्या घरातली चूल पेटती राहीलअसे उद्धव ठाकरे म्हणाले.
सौजन्य : सामना  

Friday, 9 November 2018

युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी?



लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला”

दिवस सातवा – लेख चौदावा

युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी?

शिवसेनाप्रणीत युवासेनेच्या स्थापनेला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली. १७ ऑक्टोबर २०१० रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेची स्थापना झाली. युवासेनाप्रमुखपदी आदित्य ठाकरे यांची निवड झाली. शिवसेनाप्रमुखांनी आदित्य ठाकरेंना तलवार सुपूर्द करून आशीर्वाद दिले. ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेच्या राजकरणात आली. साहजिकच त्यामुळे शिवसेनेवर घराणेशाहीची टीका सुरू झाली. तसेच अनेकांनी “उद्धव ठाकरेंच्या तुलनेने उशिरा झालेल्या राजकीय प्रवेशाची चूक आदित्य ठाकरेंच्या बाबतीत टाळण्यासाठी शिवसेनेने युवासेनेची स्थापना केली” अशीही टीका केली.  मुळात युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी झाली नाही, तर ती युवावर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली. हिंदुस्थानात युवावर्गाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. युवावर्ग दिशाहीन झाला तर आगामी काळात देशाच वाटोळं होईल. त्यामुळे युवावर्गाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगार हे मुद्दे घेऊन “लेट्स टॉक डेव्हलपमेंट, नॉट पॉलिटिक्स” हे ब्रीद घेऊन युवासेनेची स्थापना झाली.

अनेक पक्षांच्या युवा संघटना आणि विद्यार्थी संघटना आहेत. या संघटनांचे बहुतांश पदाधिकारी मात्र अगदी ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात. हे वय तरुण वर्गाच्या वयोमर्यादेपलीकडील असल्याने अशा पदाधिकार्‍यांना युवावर्गाचे प्रश्न सहजतेने समजत नाहीत. युवकांना दिशा देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याच वयोगटातील आणि त्यांच्याच भाषेत बोलू शकणारा नेता हवा हे लक्षात घेऊन केवळ २० वर्षे वयाच्या आदित्य ठाकरेंना “युवासेनाप्रमुख” पद देण्यात आलं. असं देशातील इतर कोणत्याही संघटनेत घडत नाही. युवासेनेच्या स्थापनेनंतर आदित्य ठाकरेंनी युवकांसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले. विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण, महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण, एसएससी आणि एचएससी सारख्या शैक्षणिक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण, “बेस्ट ऑफ फाइव्ह” सारख्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणं, एचएससी परीक्षेच्या काठीण्यपातळीवर भाष्य करून विद्यार्थ्यांची बाजू मांडण इत्यादि अनेक कामे युवासेना विद्यार्थ्यांसाठी करत असते. २०१६ मध्ये युवासेनेने “केजी”पासून “पीजी” पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्न व मागण्यांना वाचा फोडण्यासाठी विराट “केजी टू पीजी महामोर्चा” काढून सरकारला जाग आणली होती.

विद्यार्थ्यांना खेळाची मैदाने, क्रीडासाहित्य, उपहारगृह, वसतिगृह, स्वच्छतागृह,पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज वाचनालय इत्यादि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी युवासेना सातत्याने झटत असते. प्राध्यापक संपासारख्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांची फरपट होऊ नये यासाठी युवासेना सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करते. या सर्व कामांच्या बळावर युवासेनेला विद्यापीठ सिनेट निवडणुकीत प्रचंड यश मिळालं. युवसेनेने आजपर्यंत २ वेळा मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक लढवली. पहिल्या वेळेस युवसेनेला १० पैकी ८ जागांवर विजय मिळाला होता, तर याच वर्षी झालेल्या दुसर्‍या निवडणुकीत शिवसेनेने भाजपप्रणीत अभाविप आणि मनविसे यांना अस्मान दाखवत १० पैकी १० जागांवर भगवा फडकावला. यासह इतर अनेक सिनेट निवडणुकांत युवासेनेला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा प्रचंड यश मिळालं. युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने केलेल्या भरीव कार्याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल.



हिंदुस्थानात फुटबॉलचा खेळ रुजवण्यासाठी आदित्य ठाकरे विशेष प्रयत्न करत आहेत. मुंबईत फुटबॉलसाठी आवश्यक अशी मैदाने उपलब्ध करून त्यावर विविध स्तरांवरील प्रतिष्ठित संघांचे सामने आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार आहे. “मुंबई नाईटलाइफ” संकल्पना राबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील जिजामाता उद्यानात “हंबोल्ट पेंग्विन” आणण्याची त्यांची संकल्पना अत्यंत यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे महापालिकेचा महसूल सुद्धा कित्येक पटींनी वाढला आहे. विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं वहावं लागू नये यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत “टॅब” वाटपाच्या उपक्रमात त्यांचा पुढाकार आहे. प्रतिवर्षी बारावी विज्ञान शाखेचे लाखो विद्यार्थी “एमएच सीईटी” या महत्वाच्या आणि भविष्याची दिशा ठरवणार्‍या परीक्षेला सामोरे जात असतात.  त्यांना सरावासाठी युवासेनेमार्फत “वायएस सीईटी” या मोफत सराव परीक्षेचे आयोजन आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं. या परीक्षेचा “सोल्युशन सेट” परीक्षेनंतर तत्काळ उपलब्ध करून दिला जातो तसेच त्यातील उत्तरांच विस्तृत स्पष्टीकरण देणारे आणि संकल्पना समजाऊन सांगणारे व्हिडिओ संच सुद्धा पुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जातात.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात युवावर्गाला व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी आरोग्यविषयक तक्रारी उद्भवतात. हा मुद्दा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी मोफत “ओपन जीम” ठिकठिकाणी उभारल्या आहेत. मुली व महिलांची सुरक्षा हा आजचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. यावर भरीव उपाय म्हणून युवासेनेच्या पुढाकाराने महिला व मुलींना आत्मरक्षणाचे धडे मोफत कार्यशाळा आयोजित करून दिले जात आहेत. मुंबईत ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात युवासेनेचा पुढाकार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक हानिकारक आहे व ते नष्टही होत नाही हे आपण जाणतोच. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आदित्य ठाकरेंची प्रमुख भूमिका आहे.

युवानेता म्हणून नुसती चमकोगिरी आणि दादागिरी न करता विद्यार्थी व युवकांसाठी युवाहृदयसम्राट, युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवसेना भरीव काम करत आली आहे व यापुढेही करेल. युवासेनेची स्थापना फक्त आदित्य ठाकरेंच्या राजकारण प्रवेशासाठी झाली” अशी टीका करणार्‍यांना आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कृती व कार्यातून चोख उत्तर दिलेलं आहे, हेच युवासेनेच्या आणि आदित्य ठाकरेंच्या आजपर्यंतच्या वाटचालीवरुन स्पष्ट होतं.              


             लेखक : शशांक देशपांडे 
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )

ठाकरेंची संपत्ती किती आहे?



लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )

“वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला”

दिवस सातवा – लेख तेरावा

ठाकरेंची संपत्ती किती आहे?

काही दिवसांपूर्वीच जयदेव ठाकरेंनी त्यांची याचिका मागे घेताच ठाकरेंच्या संपत्तीचा कोर्टात सुरू असलेला वाद मिटला. सध्या “मातोश्री-२” चं बांधकाम सुरू आहे. यावरून अनेकवेळा “ठाकरेंची संपत्ती किती आहे?” हा विषय दबक्या आवाजात चर्चेला येतो.  निवडणुकीच्या धुळवडीत विरोधक अनेकदा आरोप करत ठाकरेंनी त्यांची संपत्ती जाहीर करावी अशी मागणी करतात. अशाच आरोपांना उत्तर म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या जाहीर सभेत शरद पवारांना “कोरा कागद आणा, माझी संपत्ती तुम्हाला मी देतो आणि तुमची जेवढी संपत्ती आहे तेवढी तुम्ही माझ्या नावावर करा” असं आव्हान दिलं होतं. शरद पवारचं काय ईतर कोणत्याही विरोधकाला हे आव्हान पेलवलं नाही.  हे झालं आर्थिक संपत्तीबद्दल, पण ठाकरेंची संपत्ती केवळ पैसा आणि प्रॉपर्टी एवढचं नव्हे. ठाकरेंवर असलेला कोट्यवधी हिंदूंचा, मराठी माणसांचा आणि शिवसैनिकांचा विश्वास, आणि  निष्ठा, शिवसेनेच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी आणि ठाकरेंच्या आदेशावर काहीही करायला तयार असलेले शिवसैनिक हीच ठाकरेंची संपत्ती आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना लहानपणीच त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंनी घराच्या दारासमोर असणारे चपलांचे जोड दाखवत “ही आपली संपत्ती आहे आणि तू ती आयुष्यभर जप” असं सांगितलं होतं. तेंव्हा शिवसेना नव्हती पण ठाकरे कुटुंबाकडे असलेली जनसंपत्ती मात्र प्रचंड होती. बाळासाहेबांनी ती संपत्ती आयुष्यभर जपली व वाढवली आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ती जपत व वाढवत आहेत. “मातोश्री”वर मदत मागण्यासाठी शत्रू जरी गेला तरी तो रिकाम्या हाताने परतत नाही, मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असो. “मातोश्री”चा पाहुणचार जगभर प्रसिद्ध आहे. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकला आपलं हक्काचं वाटणारं “शिवसेना भवन” सुद्धा जनसामान्यांच्या मदतीसाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी सदैव खुलं आहे. त्यामुळेच कोट्यवधी हिंदू, मराठी जनतेचा ठाकरे घरण्यावर विश्वास आहे. सत्ता असताना अथवा नसताना शिवसेनेने केलेली जनहिताची कामं, जनहिताच्या आड येणार्‍या निर्णयांना केलेला विरोध, जनतेच्या न्याय व हक्कांसाठी दिलेले लढे व केलेली आंदोलनं यामुळे शिवसेना जनतेला आधार वाटते आणि जनतेच्या मनात शिवसेनेविषयी सदैव प्रेम आहे.



ठाकरे घराण्यावर शिवसैनिकांची असलेली निष्ठा तर काय वर्णावी? नारायण राणे कॉंग्रेसमध्ये गेल्यावर जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही तोपर्यंत मी अनवाणी फिरेन अशी प्रतिज्ञा करणारे अरविंद भोसले हे तब्बल नऊ वर्ष अनवाणी फिरत राहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नीलेश राणेंना धूळ चारली. त्यानंतर स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांनी अरविंद भोसलेंना पादत्राणे परिधान करण्यास सांगितलं, मात्र अरविंद भोसले नारायण राणेंचा पराभव झाल्यावरचं आपण पादत्राणे परिधान करणार असं शिवसेना पक्षप्रमुखांना नम्रपणे सांगते झाले. २०१४ विधानसभेत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंना धूळ चारली. त्यानंतरचं अरविंद भोसले यांनी पादत्राणे परिधान केली. २०१५ च्या वांद्रे पूर्व मतदारसंघात पुन्हा राणेंनी शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली. अरविंद भोसलेंनी पुन्हा प्रतिज्ञा केली. निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि भोसलेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली. केवढी ही निष्ठा? इतर कोणत्याही पक्ष अथवा संघटनेच्या वाट्याला हे भाग्य येणार नाही.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मोदींच्या मंत्रिमंडळतील मंत्रीपदाला लाथडणारे अनिल देसाई हे सुद्धा शिवसैनिकांच्या निष्ठेच अप्रतिम उदाहरण आहे. मोदीलाट येत असल्याचे पाहून अनेक विरोधक सुद्धा एनडीए मध्ये सामील झाले आणि त्यांनी मंत्रिपद मिळवलं. सुरेश प्रभू यांनी तर मिसकॉल द्वारे भाजपमध्ये प्रवेश करत मंत्रिपद मिळवलं. अनिल देसाई यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार मंत्रीपद स्वीकारण्यासाठी दिल्ली मध्ये दाखल झालेले असताना सुद्धा मंत्रीपदाला लाथ मारली आणि ते मुंबईकडे परत फिरले. मुंबईत विमानतळावर दाखल होताच शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गरज, प्रचंड घोषणा आणि भगवे झेंडे फडकवत केलं. “शिवसेना भवन” मध्ये दाखल झाल्यावरसुद्धा त्यांचं अशाच पद्धतीने स्वागत केलं गेलं. मोदींच्या मंत्रीपदाची शपथ घेणार्‍या देशातील कोणत्याच मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यावर सुद्धा मोदीभक्तांनी जेवढा जल्लोष केला नसेल त्याच्या कितीतरी पटीने शिवसैनिकांनी मंत्रिपद लाथाडून आलेल्या अनिल देसाईंच्या स्वागतासाठी जल्लोष केला. आजच्या स्वार्थी युगात स्वार्थापुढे काहीच नाही असं म्हणतात. अनिल देसाई यांनी स्वार्थापेक्षा निष्ठा महत्वाची आहे हे दाखवून दिलं. याच निष्ठेवर शिवसेना उभी आहे. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. ही ठाकरेंची खरी संपत्ती आहे.          

कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेचा प्रचार करणारे शिवसैनिक, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनं करणारे शिवसैनिक, शिवसेनेच्या सभांना लाखोंच्या संख्येनं हजेरी लावणारे शिवसैनिक, शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञ उपक्रमात रक्तदान करून तब्बल २५ हजारांहून अधिक बाटल्या रक्त जमा करून विश्वविक्रम करणारे शिवसैनिक, घरचा दसरा सोडून शिवतीर्थावर विचारांचं सोनं लुटायला जमणारे लाखो शिवसैनिक, अन्यायाला लाथ मारून न्याय मिळवून देणारे शिवसैनिक, गरजेला धावून जाणारे शिवसैनिक, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करून त्यांचे अश्रु पुसणारे शिवसैनिक, आपल्या नेत्याच्या आदेशावर वाट्टेल ते करण्यासाठी तयार असलेले शिवसैनिक ही ठाकरेंची अफाट इस्टेट आहे. ही कोणत्याही पक्षाला अथवा संघटनेला मिळवता येणार नाही आणि कोणत्याही विरोधकाला मोजता येणार नाही. या संपत्तीच्या बळावरचं शिवसेना आचंद्रसूर्य जिवंत आणि ज्वलंत राहील.                  

लेखक : शशांक देशपांडे 
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )