Saturday, 27 August 2016





"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)


कायद्याच राज्य म्हणजे काय हो?


सर्वत्र बंधन आणि सक्ती..!


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा आपल्या भाषणात ठाकरी शैलीत न्यायालयाच्या निर्णयाची पिसं काढलेली होती.शिवसेनाप्रमुख म्हणायचे न्यायालयांनी कोणते विषय घ्यावेत,कोणते द्यावेत आणि कोणते देऊ नयेत हे ठरवायला हवं.आजकाल राज्यात आणि देशातली निर्णय प्रक्रिया पाहिली असता सगळे निर्णय न्यायालयेच घेत आहेत की काय? असा प्रश्न पडतो.प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट न्यायालयात.एका न्यायालयात निर्णय झाला की तो ज्याच्या विरोधात लागला तो उच्च न्यायालयात दाद मागणार.तिथे उलट निकाल लागला तर पुन्हा प्रतिपक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार.शेवटी निर्णय झाला तरी तो ज्याच्या विरोधात लागेल ते त्या नियमाच्या विरोधात वागून त्याचा अवमानही करणार.हिंदुस्थान लोकशाही देश आहे.देशात कायद्याच राज्य आहे आणि असाव हे अगदी खर आहे,मात्र कायद्याचं राज्य म्हणजे काय हो? असा प्रश्न विचारला पाहिजे अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

आजकाल महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील सर्वच महत्वाचे आणि मोठे निर्णय न्यायालायतुनच घेतले जात आहेत.सर्वच ठिकाणी जर कोर्टाचा हस्तक्षेप गरजेचा असेल तर मग देशात आणि राज्यात सरकारची गरज काय? प्रचंड बहुमतासह सत्तेत असलेल्या सरकारला एखादा निर्णय घेता आला नाही किंवा एखाद्या निर्णयाला विरोध झाला तर तो न्यायालयातर्फे मंजूर करून घेतला जातो अस चित्र सध्या आहे.घरगुती वाद,सामाजिक प्रश्न,राजकारण,सण-उत्सव,संस्कृती-परंपरा या सर्वच गोष्टीत न्यायालयाचा वाढता हस्तक्षेप आता नकोसा झालाय.आता तर घरगुती कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा जास्त माणसे येणार असले तर त्या कार्यक्रमास पोलीस परवानगी घ्यावी लागेल असा कायदा आणण्याच्या खटपटी सुरु आहेत.दहीहंडी कशी साजरी करायची? गणेशोत्सव कसा असावा? मिरवणुकीत कोणती वाद्ये वाजवावीत? नवरात्रीत दांडिया कसा खेळावा? दिवाळीत कोणते फटाके फोडावेत? असे निर्णय आजकाल न्यायालयात होत असल्याने आणि न्यायालये निर्णय देताना सण-उत्सवांवर निर्बंध लादू लागल्याने सणांच्या आणि उत्सवाच्या आनंदावर विरजण पडत आहे.

इतकच नव्हे तर पती-पत्नीतील किरकोळ भांडणं आजकाल न्यायालयात सोडवली जात आहेत.मंदिर प्रवेशाचा प्रश्न न्यायालयात सुटतो आहे.हे सगळ कमी म्हणून की काय,पण मध्यंतरी काही सिहांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची घटना ऐकायला आणि पाहायला मिळाली.काही ठिकाणी माकडांनी वस्तू पळवल्या म्हणून माकडांवर चोरीचा गुन्हा दाखल केल्याचं ऐकून तर हसून हसून पोटदुखी व्हायचीच बाकी राहिली होती.हा सगळा कारभार म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे.न्यायव्यवस्थेची टिंगल आहे.सगळेच निर्णय न्यायालय देणार असेल आणि साध्या साध्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जर कठोर कायदे बनवले जाणार असतील तर देशात लोकशाही नसून अप्रत्यक्ष हुकुमशाहीच आहे अस म्हणावं लागेल.सर्वत्र बंधन आणि सक्ती.

देशातील न्यायालये सामान्य जनतेला कायदे शिकवायला,सण-उत्सवांवर निर्बंध लादायला जेवढी सक्षम आहेत तेवढी ती गुन्हेगारांना शासन करायला का नाहीत? ज्याने जगासमोर गुन्हा केलाय त्याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका होते.सलमान खान आधी हिट अँड रन मधून सुटला.त्यानंतर काळवीट शिकार प्रकरणातूनही सुटला.याचा नेमका अर्थ काय? सलमानच्या हातातली बंदूक घेऊन काळवीटाने स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली अस समजायचं का? भ्रष्टाचारी नेत्यांचही तसच आहे.चौकश्या होतात आणि शेवटी निर्दोष सुटका होते.तो विजय मल्या कोट्यावधी रुपयांचं कर्ज बुडवून देशातून पळून गेला.पळाला कसा? विमानतळावर असलेले पोलीस झोपेलेले होते काय? महिलांवरील अत्याचार वाढतच आहेत.चोऱ्या,खून,दरोडे,गुंडगिरी वाढत आहे.त्यांना कायद्याचा धाक कधी दाखवला जात नाही.याकुबसाठी दयेचा अर्ज म्हणून न्यायालय रात्रभर चालवलं गेलं.हेच न्यायालय सामान्यांना न्याय देण्यासाठी का खटाटोप करत नाही?

आज जो कायद्याचा धाक सण-उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना,सामान्य जनतेला दाखवला जातोय तो गुन्हेगारांना का नाही दाखवला जात? गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष कठोर कायदे आणून वाढती गुन्हेगारी ठेचण्याचे काम ही न्यायालये का करत नाहीत? असे कायदे बनवले जातील आणि अंमलात आणले जातील तेंव्हाच गुन्हेगारीला आळा बसेल.देशात कायद्याचे राज्य असावे हे आम्हालाही वाटते,पण कोणते कायदे असावेत? ते कोणासाठी असावेत? त्यांचा उद्देश काय? त्यांची गरज काय याचा विचार कधी केला जाणार? सण-उत्सवावर निर्बंधाचे निर्णय देण्यापेक्षा देशातील कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल?,देशातली गुन्हेगारी कशी कमी होईल?,भ्रष्टाचार कसा थांबवता येईल? आणि देशातील सर्वच स्तरांतील लोकांना भयमुक्त जीवन कसे जगता येईल? यासाठी नियम व कायदे बनवणे अत्यंत गरजेचे आहे.तसे होईल तेंव्हाच देशात खरच कायद्याच राज्य आहे आणि आपली न्यायव्यवस्था मजबूत आहे असा विश्वास जनतेला वाटेल.

सध्या अनेक कायदे मोठ्या लोकांसाठी आणि श्रीमंतांसाठी मोडून-तोडून लावले जातात आणि वाकवले जातात.सामन्यांवर मात्र विनाकारण कायदे लादले जातात.सण-उत्सव साजरा करताना बंधने घालून नियम मोडल्यास दंड आणि कठोर कारवाईची भाषा वापरली जाते.यातून सध्या देशात असलेले कायदे हे सर्वांसाठी सारखे नसून वेगवेगळे आहेत अस दिसत.ही परिस्थिती बदलायलाच हवी.तरच हिंदुस्थानी जनता यापुढे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवेल.अन्यथा लादला गेलेला प्रत्येक कायदा जाळून टाकून जनता आपला रोष दाखवेल.तो दिवस येण्यापुर्वीच जनतेवर जाचक कायदे लादण थांबवायला हवं.नंतर न्यायालयाचा अपमान झाला म्हणून ओरडण्यात काहीच अर्थ नाही.

जय महाराष्ट्र..!




Saturday, 20 August 2016



"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)


सण-उत्सव आणि कायदे..! बोल बजरंगबली की जय..!


ऐन गोकुळाष्टमीच्या तोंडावर दहीहंडी उत्सव कसा साजरा करायचा यावरून न्यायालय आणि गोविंदा पथके व मंडळांत चांगलीच जुंपली आहे.अर्थात हे नेहमीचच आहे.हिंदूचा कोणताही सण आला की तो कसा साजरा करायचा हे न्यायालयेच ठरवतात.यंदाही दहीहंडी साजरी करण्याबाबत काही अटी घालून देत न्यायालयाने दहीहंडी कायद्याच्या कचाट्यात अडकवली आहे.दहीहंडी २० फुटावरच बांधली जावी आणि ती फोडण्यासाठी चारच थर लावावे अशा न्यायालयीन नियमावलीमुळे दहीहंडीच्या उत्साहाची हंडी मात्र फुटली आहे.त्यावर या न्यायालयातून त्या न्यायालयात धाव घेऊन दाद मागण चालू आहे.दहीहंडी उत्सवावर न्यायालयाने घातलेली बंदी ही फक्त सुरुवात आहे.त्यानंतर गणेशोत्सव येईल.त्यावेळी गणपतीची मूर्ती किती फुटांची असळी पाहिजे?,मंडप कसा आणि कुठे हवा,डेकोरेशन करताना काय मर्यादा पाळाव्यात? निसर्गाची काळजी कशी घ्यावी? लाउडस्पीकरचा आवाज किती ठेवावा अशी नियमावली न्यायालय तयार करेल आणि सरकार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर कायदे करेल.नियम मोडल्यास दंड केला जाईल आणि गुन्हेही दाखल केले जातील.

दहीहंडी उत्सवात आधी दहा थरांचा मनोरा रचून हंडी फोडण्याची स्पर्धा असायची.त्यात एक वेगळाच जोश आणि जल्लोष असायचा.थरार असायचा.दहा थर लावण्याच्या नादात झालेले अपघात आणि दुर्दैवाने त्या अपघातामुले अपंग झालेल्या आणि मृत्यु ओढवेल्या गोविंदांचा विचार करून सुरुवातीला न्यायालयाने गोविंदा पथकांना आणि आयोजकांना गोविंदांच्या सुरक्षेबद्दल नियमावली घालून दिली.त्यानंतर गेल्या काही वर्षात ६ ते ७ थरांचा मनोरा रचून हंडी फोडण्याची अट घातली.आता २० फुटांची दहीहंडी बांधून केवळ ४ थर रचून ती फोडण्याचा “कायदा” न्यायालयाने आणला आहे.हे म्हणजे कमाल झाली.पुढील एक-दोन वर्षात न्यायालय गोविंदांनी आपापल्या घरातील पंख्याला दहीहंडी बांधावी आणि उडी मारून ती फोडावी असा कायदा आणेल.त्यानंतर त्यापुढील एक-दोन वर्षात दहीहंडी बांधायची आणि फोडायची काय गरज आहे? असा सवाल उपस्थित करून न्यायालय प्रत्येकांनी हंडीत काला भरावा आणि तो हंडी न फोडता त्यातून काढून खावा असाही कायदा आणेल.

त्याचबरोबर गणेशोत्सवावरही बंधने लादली जातील.नवरात्रीवर कायदे लादले जातील.दसऱ्याला सोने वाटल्याने निसर्गाची हानी होते असे सांगत कदाचित त्यावरही बंदी घातली जाईल.शिवसेनेच्या ऐतिहासिक आणि पारंपारिक दसरा मेळाव्यावरही बंधने लादली जातातच.शिवतीर्थ “शांतता क्षेत्र” असल्याचा हवाला देऊन मेळाव्यातील लाउडस्पीकरच्या आवाजावर ५० डेसिबलची मर्यादा घातली जाते.आगामी काळात कदाचित दसरा मेळाव्यात माईकचा वापर करण्यावरही बंदी घातली जाईल.शिवसेना पक्षप्रमुखांना जे बोलायचे आहे ते त्यांनी युवासेनाप्रमुखांच्या कानात सांगावे.युवासेनाप्रमुखांनी तेच शेजारील खुर्चीत बसलेल्या मनोहर जोशींना,मनोहर जोशींनी त्यांच्याशेजारील खुर्चीत बसेलेल्या दुसऱ्या नेत्याच्या कानात सांगावे.शिवसेना पक्षप्रमुखांचे बोलणे लाखो शिवसैनिकांनी कानोकानीच पसरवावे असा अजब-गजब निकालही न्यायालय देऊ शकते.त्यानंतर दिवाळीत प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यांवर बंदी.लग्नाची वरात काढायची तरी वाद्ये वाजवायची नाहीत.सगळीकडे बंदी,बंदी,बंदी.या देशात सगळ्याच गोष्टींना बंदी आहे.हे सगळ का आणि किती काळ सहन करायचं?

नुकाताच हिंदुस्थानचा स्वातंत्रदिन साजरा झाला.त्या दिवशी नेहमीप्रमाणे स्वतंत्र,समता,विविधतेतून एकात्मता आणि ऐक्याच्या पुंग्या सर्वत्र वाजल्या.हिंदुच्या सगळ्याच गोष्टींवर बंधन लादण हे कसलं स्वतंत्र्य? मुसलमानांनी दिवसातून ५ वेळा बेसूर भोंगे वाजवलेले चालतात.ख्रिश्चनांचे धर्म बाटवणे चालते.हिंदूंनी सण साजरा करायला मात्र कायद्याच्या चौकटी.अनधिकृत प्रार्थनास्थळे किंवा धार्मिक स्थळांचा प्रश्न आला की हिंदू धर्माच्या स्थानांची यादीच भलीमोठी केली जाते.त्यात चर्च आणि मशिदी चुकूनच समाविष्ट असतात.कारवाई करताना फक्त मंदिरांवर होते.ही कसली समता? अशाने विविधतेत एकात्मता नाही तर विषमता फोफावत आहे.प्रत्येक धर्माला वेगळे कायदे.त्यात हिंदू धर्माला दुजाभाव.अशाने ऐक्य कसे साधले जाणार? सण-उत्सव आणि कायदे यात समन्वय साधायला हवा.

आम्हाला न्यायव्यवस्था आणि लोकशाहीबद्दल पूर्ण आदर आहे.आम्ही त्यांचा सन्मान करतो,पण आमची गळचेपी किती काळ सहन करायची? कायदे फक्त हिंदूंसाठी आहेत काय? हिंदुंवर जसे निर्बंध लादले जातात आणि कायद्याचा बडगा दाखवला जातो तसा बडगा न्यायालये किंवा सरकार इतर धर्मियांच्या बाबतीत दाखवू शकेल का? सार्वजनिक उत्सवांचे मूळ हे समाजात एकी साधण्याचेच आहे हे विसरून कसं चालेल.अहो,लोकमान्यांनी त्याचसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.हा इतिहास आहे.तो कसा विसरता येईल? राहिला प्रश्न तो निर्बंधाचा.कसले नियम? कसले कायदे? जोपर्यंत सर्वांना समान कायदा लागू होत नाही आणि हिंदूंना कायदा शिकवला जाईल तोपर्यंत हे कायदे आम्ही पाळणार नाही.आमचा प्रत्येक सण आम्ही उत्साहात आणि जल्लोषात साजरा करणारच.बोल बजरंगबली की जय..!

 जय महाराष्ट्र..! 

Saturday, 13 August 2016



"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)


हा हिंदुस्थान आहे की पाकिस्तान?


स्वातंत्र्याचा अर्थ काय?


हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन जवळ येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.तिरंग्याला वंदन करण्यासाठी आणि हिंदुस्थानचा स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील सर्वच स्तरांवरील देशभक्तांची लगबग सुरु आहे.१५ ऑगस्ट २०१६ रोजी हिंदुस्थानचा ६९ वा स्वातंत्र्यदिन अवघ्या हिंदुस्थानात दिमाखात,उत्साहात,जल्लोषात साजरा होईल.ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाईल,हिंदुस्थानचे राष्ट्रगीत,वंदेमातरम् म्हणून हिंदुस्थानला नमन केले जाईल.हे सगळ तर गेली ६८ वर्षेही असच होत होत आणि यापुढेही होतच राहील.हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होईल.हे सगळ होत असतानाच ऐन स्वातंत्र्यदिन सोहळ्यापुढे एक धक्कादायक बाब समोर आली आहे.त्याकडे खूप गांभीर्याने पाहण अत्यावश्यक आहे.

स्वतंत्र आणि प्रजासत्ताक राष्ट्र असलेल्या हिंदुस्थानात अलाहाबाद येथील एका शाळेत हिंदुस्थानच्या स्वतंत्र्यदिनी राष्ट्रगीत म्हणण्यास बंदी घातल्याची बाब समोर आली आहे.एवढेच नव्हे तर त्या शाळेत गेली १२ वर्षे राष्ट्रगीताला बंदी असल्याचेही सत्य समोर आले आहे.येत्या स्वतंत्र्यदिनी राष्ट्रगीताला परवानगी नाकारल्याने शाळेतील ८ शिक्षकांनी राजीनामे दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील नर्सरीपासून आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाची तयारी चालू होती.शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रगीतास परवानगी देण्याची मागणी केलेली होती,मात्र देशद्रोही शाळा व्यवस्थापक जिया उल हक याने त्यावर आक्षेप घेतला.राष्ट्रागीतामधील “भारत भाग्यविधाता” या शब्दांवर जिया उल हक याने आक्षेप घेत राष्ट्रागीतावर बंदी घातली आहे.इस्लाममध्ये अल्लाशिवाय दुसरा कोणीही भाग्यविधाता नाही.त्यामुळे “भारत भाग्यविधाता” म्हणणे चुकीचे असल्याच सांगत जिया उल हकने गेली १२ वर्षे एकदाही शाळेत राष्ट्रगीत म्हटले गेलेले नसून यावेळीही राष्ट्रागीतावर बंदी असल्याचे म्हटले आहे.

हिंदुस्थानात हिंदुस्थानचे राष्ट्रगीत गायचे नाही तर मग अमेरिकन सिनेटमध्ये गायचे काय? की पाकिस्तानी संसदेत गायचे? कसली बंदी? कोण घालणार? राष्ट्रागीतावर बंदी घालणारे हे कोण? यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून यांना तोफेच्या तोडी द्या.तर,तर आणि तरच या हिरव्या अळ्यांची वळवळ थांबेल.१२ वर्षे हिंदुस्थानातील एका शाळेत हिंदुस्थानच्याच राष्ट्रागीतावर बंदी घातली गेली आणि कोणाला पत्ताच नाही? या प्रकारची १२ वर्षे वाच्यता होऊ शकली नाही? आस कस घडल? तेही आजच्या जमान्यात? आजकाल एखाद्या ठीकाणी काही घडलं आहे की नाही हे नेमक माहिती नसताना सर्वात आधी मिडीयावाले दाखल होतात.एखाद्या ठिकाणी चित्रीकरण करण्यास वाव नसला तरी दिसेल त्या फटीतून कॅमेरा घुसवून चित्रीकरण करतात.सर्वात आधी वृत्त देण्यासाठी वाटेल ती धडपड करतात.“सबसे तेज” अशी बिरुदावली मिरवत अनेकदा जे घडलच नाही ते घडलं अस भासवतात.कुठे होते हे सगळे १२ वर्ष? सदर शाळेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचा थांगपत्ता नव्हताच का? १२ वर्षात शाळेला एकही अधिकाऱ्याने भेट दिली नाही काय? हिंदुस्थानात १२ वर्षे हिंदुस्थानी राष्ट्रगीताला बंदी होती आणि हे सत्य झाकल? कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्योदय थांबला? की सूर्योदय झाला नसल्याच भासवल गेलं? हा हिंदुस्थान आहे की पाकिस्तान?

हिंदुस्थान हा स्वतंत्र देश आहे.हिंदुस्थानातील प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे,पण स्वातंत्र्याचा अर्थ काय?ज्या देशात जन्माला आलो,जी आपली कर्मभूमी आहे तिला वंदन न करण्याचं स्वातंत्र्य कसलं ? हा देशद्रोह आहे देशद्रोह.राष्ट्रागीतावर बंदी घालणारी अवलाद चेचून ठेचून टाकली पाहिजे.हिंदुस्थानात लोकशाही आहे,प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे मात्र देशापेक्षा मोठे कोणीही नाही.धर्मांध मुस्लीम लोकांपैकी ज्यांना हिंदुस्थानात राहायचं आहे त्यांनी राष्ट्रदेवो भव हे मान्य असेल आणि राष्ट्रगीत,वंदेमातरम् म्हणायचे असेल तरच हिंदुस्थानात राहावं.अन्यथा अशांनी थेट पाकमध्ये चालत व्हावं.हिंदुस्थानात अशा वृत्तीला थारा नाही.अशा देशद्रोही अवलादी देशाबाहेर गेल्याने हिंदुस्थानला काडीमात्र फरक पडणार नाही.

हिंदुस्थानी जनतेच्या याबाबत मोदी सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत.पंतप्रधानांनी त्यांच्या ५६ इंच छातीतील दम या देशातील देशद्रोह्यांना दाखवून द्यावा.मोदींनी या अशा धर्मांध प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी.जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही.सरकार जर अशा प्रवृत्ती ठेचणार नसेल आणि कठोर पावल उचलणार नसेल तर तमाम देशभक्त अशा प्रवृत्ती ठेचातील आणि हसतमुखाने तुरुंगातच काय फासावरही जातील.अशा देशद्रोह्यांना मृत्युदंडच द्यायला हवा.दोन-चार जणांवर जुजबी कारवाई करून प्रकरण निकाली काढण योग्य नाही.अशा प्रवृत्ती फोफावण्याच्या आधी मुळासकट उखडून टाकायला हव्यात.तरच अभिमानाने राष्ट्रगीत आणि वंदेमातरम् म्हणता येईल.



जय महाराष्ट्र..!

Saturday, 6 August 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

“फ्रेंडशिप डे” : आधुनिक अंधश्रद्धा..!

हास्यास्पद कटुसत्य..!

उद्या ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार.हा दिवस म्हणे फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. पाश्चिमात्य देशातून हिंदुस्थानात आलेला हा “फ्रेंडशिप डे” अनेकजण नको तितक्या उत्साहाने साजरा करतात.हिंदुस्थानी संस्कृतीला,प्रथांना,सण,उत्सवांना नावे ठेवणारे प्रामुख्याने पाश्चात्य संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेतात.विशेष म्हणजे यातील एक टक्का लोकांनाही “फ्रेंडशिप डे” का साजरा केला जातो? हेच माहिती नाही.“फ्रेंडशिप डे” पाश्चिमात्य देशातून आलेला असल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटना त्याला विरोध करतात.हिंदुस्थानी संस्कृतीचे जतन करा,पाश्चात्य संस्कृतीमधून आलेला “फ्रेंडशिप डे” साजरा करू नका असे म्हणणे ते मांडत असतात.त्यावरून नेहमीच फ्रेंडशिप डे समर्थक आणि विरोधकांत खटके उडत असतात.अशा या “फ्रेंडशिप डे” मागील इतिहास जाणून घेतले असता एक हास्यास्पद कटुसत्य जगासमोर येईल.

आजची युवा पिढी ही एखाद्या गोष्टीमागे लागली कि ती पार वेडी होऊन त्यामागे धावायला लागते.तसेच आजच्या पिढीला त्यांच्या मनाविरुद्ध एखादी चांगली आणि हितावह गोष्ट सांगितली तरी ती रुचत नाही.त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन तर होत नाहीच उलट त्यांना बदलायला सांगणे म्हणजे साखळदंडांनी जखडून ठेवल्यासारखे वाटते.त्यामुळे “फ्रेंडशिप डे” करू नका असे सांगायचे असेल तर त्यामागील इतिहास समजावून सांगणे अत्यंत जरुरीचे आहे.

“फ्रेंडशिप डे”चा इतिहास समजल्यास त्यामागे धावणाऱ्या लोकांपैकी किमान ५०% लोकांना तरी स्वतःवर हसू येईल.“फ्रेंडशिप डे” साजरा करण्याची परंपरा नेमकी कशी सुरु झाली हे जाणून घेतल्यास “फ्रेंडशिप डे” साजरा करणाऱ्यांची अवस्था झापड लावलेल्या घोड्यासारखी किंवा कळपातील पहिली मेंढी जिकडे जाईल तिकडे वळणाऱ्या हजारो मेंढरांसारखी होईल.“हॉलमार्क कार्ड” नावाच्या ग्रीटिंग कार्ड बनवून विकणाऱ्या कंपनीचा मालक असलेल्या जॉयस हॉल नावाच्या व्यक्तीने १९३० साली आपल्या दुकानातील ग्रीटिंग्ज खपवण्यासाठी “फ्रेंडशिप डे” ची संकल्पना वापरली.त्यावेळी सुट्टीचा दिवस म्हणून रविवारची निवड करून २ ऑगस्ट हा दिवस “फ्रेंडशिप डे” ,म्हणून निश्चित केला गेला.त्यामागे दुसर काही एक कारण नाही.त्यानंतर काही दशकांचा कालावधी गेल्यानंतर “फ्रेंडशिप डे” चं प्रस्थ वाढायला लागल.अस असलं तरीही फ्रेंडशिप डे हा काही जागतिक पातळीवर एकदाच साजरा केला जातो अस अजिबात नाही.

जागतिक “फ्रेंडशिप डे” ची संकल्पना प्रथम २० जुलै १९५८ रोजी मांडण्यात आली.काही देशांत ३० जून, काही देशांत २० जुलै तर काही देशांत ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी “फ्रेंडशिप डे” साजरा केला जातो.“फ्रेंडशिप डे” हा काही “युनिव्हर्सल” दिवस नाही.तो विविध ठिकाणी विविध दिवशी साजरा केला जातो.हातात “फ्रेंडशिप बँड” बांधून मैत्री जपण्याचा,मित्रांबद्दल सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून अनेकजण “फ्रेंडशिप डे” साजरा करतात.हा दिवस साजरा करण्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही.कोणतीही धार्मिक परंपरा नाही.कोणताही इतिहास नाही आणि कोणताही वारसा नाही.त्यामुळे “फ्रेंडशिप डे” साजरा केल्याने कोणताही सामाजिक अथवा सांस्कृतिक फायदा नाही. “फ्रेंडशिप डे” साजरा केल्याने हिंदुस्थानी संस्कृतीचा ऱ्हास होईल असे अनेकांचे म्हणणे.ते खरेही आहे,मात्र आपली संस्कृतीही एवढ्या छोट्या कारणामुळे ऱ्हास पावेल इतकी कमकुवत नाही,अजिबात नाही.हिंदू धर्मातील प्रथांना शास्त्रीय कारणे असतानाही आणी ते सिद्ध झालेलं असतानाही त्याला अंधश्रद्धा ठरवणे आणि कोणतेही शास्त्रीय अथवा सांस्कृतिक कारण नसलेल्या “फ्रेंडशिप डे” चा मात्र उदोउदो करणे ही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही.

“फ्रेंडशिप डे” साजरा करण्याचा फायदा अजिबात नाही हे जितके सत्य आहे,तितकेच तो साजरा करण्याचे तोटेही नाहीत हेही सत्य आहे.आपली संस्कृती न विसरता “फ्रेंडशिप डे” साजरा केला तर त्यामुळे फायदा आणि तोटा दोन्हीही होणार नाही.आधी आपली संस्कृती जपायला हवी.मगच दुसरीकडच्या चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात.त्याला काहीतरी अर्थही असण गरजेच आहे. “फ्रेंडशिप डे” हे खरतर अंधश्रद्धेच प्रतिक मानायला हव.जी गोष्ट काहीच आधार नसताना अवलंबली जाते ती अंधश्रद्धा. “फ्रेंडशिप डे” चे सुद्धा असेच आहे.कोणी एकाने स्वार्थासाठी “फ्रेंडशिप डे” सुरु केला म्हणून आपण त्यामागे धावण याला मूर्खपणाच म्हणावं लागेल.असा मूर्खपणा तर आजच्या युगातील गाढवं आणि मेंढरही करत नसतील.त्यामुळे “फ्रेंडशिप डे” ही आधुनिक अंधश्रद्धाच आहे.त्याबद्दल कमीतकमी जागरूकता तरी व्हायलाच हवी.



जय महाराष्ट्र..!