Friday, 25 March 2016



“वाघगर्जना”


(माझा आजचा लेख-:)


काहीही हं श्री..!


महाराष्ट्र अखंडच ठेवू..!


महाराष्ट्राच्या दुर्दैवाने इतके दिवस महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर असलेले महाराष्ट्रद्रोही,स्वतंत्र विदर्भछाप श्रीहरी अणे मागील आठवड्यात पुन्हा बरळले.विदर्भाप्रमाणेच महाराष्ट्रापासून मराठवाडाही वेगळा करा अशी बिनडोक मागणी त्यांनी केली.तसेच विदर्भापेक्षा मराठवाड्यावर जास्त अन्याय झालेला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा अशी भाषा वापरत अणेंनी अखंड महाराष्ट्रद्रोहाची सीमा ओलांडली.महाराष्ट्राला मुंबई मिळण्यासाठी लढा द्यावा लागला.या लढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिल्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्र उभा आहे आणि मुंबई महाराष्टाची राजधानी आहे.शिवाय बेळगाव महाराष्टाला जोडण्यासाठीही लढा चालूच आहे.हे सगळ विसरून वेगळा विदर्भ,वेगळा मराठवाडा अशा मागण्यांद्वारे महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणे हा हुतात्म्यांचा अपमान आहे.


शिवसेना नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या विरोधात होती,आहे आणि राहील.मराठवाडा वेगळा करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.भारतीय जनता पक्ष जरी छोट्या राज्यांच्या भूमिकेचे समर्थन करत असला तरी शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे कदापि होऊ देणार नाही.शिवसेना सदैव बेळगावसह अखंड संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत राहील.भारतीय जनता पक्षाला जर खरोखरच विदर्भाची काळजी वाटत असेल तर आज भाजपचे अनेक प्रमुख मंत्री आणि नेते विदर्भातील आहेत,त्यांच्या माध्यमातून भाजपने विदर्भाचा विकास करून दाखवावा.ते जमणार नसेल तर भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर घेतलेली सत्ता सोडावी.सत्ता घेण्याआधी स्वतंत्र विदर्भ असे आश्वासन देणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी आम्ही स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते असे वक्तव्य केलेले होते.आता भाजप पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा नारा देत आहे,मात्र हे त्याचे दिवास्वप्न आहे.शिवसेना ते कदापि पूर्ण होऊ देणार नाही.

श्रीहरी अणेंनी हे महाराष्ट्रद्रोही वक्तव्य करताच शिवसेनेने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला.तसेच अणेंची हकालपट्टी होईपर्यंत शिवसेना विधिमंडळ कामकाज चालू देणार नाही,शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकांमध्ये सहभागी होणार नाहीत अशी आक्रमक भूमिका घेतली.विधान परिषदेतही तुफान रणकंदन झाले.शिवसेनेसोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही अणेंच्या वक्तव्याचा निषेध केला.अणेंची महाधिवक्ता पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेनेसह सर्व विरोधकांनी केली.अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी श्रीहरी अणेंना राजीनामा द्यायला लावत त्यांची पदावरून हकालपट्टी केली.शिवसेनेच्या अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेचा विजय झाला.ज्या महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी शेकडो हुतात्म्यांनी बलिदान दिल,त्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे या अणेंनी केली होती.उद्या सगळेच उठून प्रत्येक जिल्हा स्वतंत्र करा अशी मागणी करतील.एखाद्या भागाचा विकास झाला नसेल तर त्या भागाचा विकास करणे सरकारचे काम आहे.श्रीहरी अणेंनी “भाजपने विदर्भाचा विकास करावा.जमत नसेल तर सत्ता सोडावी” अशी भूमिका का नाही घेतली? राज्याच्या एखाद्या भागाचा विकास झाला नसेल म्हणून तो भागच राज्यापासून वेगळा करा अशी मागणी अणेंनी का करावी.महाराष्ट्राचे तीन तुकडे पडण्याची मागणी म्हणजे काहीही हं श्री..!

अणेंचे प्रकरण संपते न संपते तोवर भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांनी नाशिकमध्ये स्वतंत्र मराठवाडा ही लोकभावना आहे अस वक्तव्य केल.यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यक्रमस्थळ गाठले.शिवसैनिक निषेद करत असतानाच कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून भाजप कार्यकर्त्यांनी चिथावणीखोर भाषा वापरली.यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी अखंड महाराष्टाच्या घोषणा देत कार्यक्रमच उधळून लावला.हे सगळं कमी होत म्हणून की काय संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो.वैद्यही बरळले.त्यांनी महाराष्ट्राचे तीन नव्हे तर चार भाग करा असे वक्तव्य केले.अरे महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला कलिंगड वाटतोय का? दोन भाग करा,नाही दोन नको तीन भाग करा आणि आता चार भाग करा.हा सगळं संघ परिवार आणि महाराष्ट्राचा अजेंडा आहे.समोरून करता येत नाही म्हणून आडून करायचं,पण करायचं असा त्यांचा डाव आहे.

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे मूळ हे संघ विचारधारेत आणि संघ कार्यपद्धतीत आहे.संघाच्या अजेंड्याद्वारे हे विष पसरवले जात आहे.संघाच्या कार्यपद्धतीत महाराष्ट्राचे चार भाग आधीच केले गेलेले आहेत.अभाविपनेही महाराष्ट्राचे तुकडे करून तीन राज्यात विभागणी असलेली कार्यरचना केली आहे.आता भाजपची सत्ता केंद्र व राज्यात असल्याने महाराष्ट्राच्या विभाजनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा डाव आहे.महाराष्ट्र विभाजनाचा मुद्दा मुळासकट उखडायचा असेल तर आपल्या कार्यपद्धतीत महाराष्ट्राची शकले करणाऱ्या संघ आणि संघ परिवारातील अभाविप यांसारख्या महाराष्ट्रद्रोही विभाजनवाद्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.शिवरायांचे नाव घ्यायचे आणी त्यांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायचे ही कोणती पद्धत?

संघ आणि संघ परिवाराला “अखंड हिंदुस्थान” करायचा आहे.ही उत्तम गोष्ट आहे,पण हिंदुस्थानचा विस्तारानी महाराष्ट्राचे तुकडे हा विरोधाभास कसा काय? शिवसेना नेहमीच अखंड महाराष्ट्रासाठी लढा देत आली आहे.वेळप्रसंगी महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू पण महाराष्ट्र अखंडच ठेवू..!

 जय महाराष्ट्र..!



Sunday, 13 March 2016


“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

बॉलीवूडच्या खिलाडीचे सामाजिक भान..!

विशाल मनाचा श्रीमंत..!

कालच एका मराठी चित्रवाहिनीवर बॉलीवूडचा “खिलाडी” म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षयकुमारला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते.यावेळी अक्षयकुमारने समाजातील विविध समस्या आणि घटनांबद्दल त्याची मते मांडली.या सर्व मतांवरून अक्षयकुमारचे सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली आस्था दिसून येते.

सध्या महाराष्ट्राला दुष्काळाने ग्रासलेले आहे.त्यामुळे शेतकरी बांधव आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग नाईलाजाने स्वीकारत आहेत.शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे अधिकाधिक वाढतच आहे.त्या ओझ्याखाली दबून बळीराजा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याने त्याचे घरदार उघड्यावर येत आहे.अशा परिस्थितीत शिवसेनेने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मदतयाग सुरु केला आहे.तसेच शेतकरी बांधवांच्या कन्यांचे कन्यादानही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत शिवसेना करत आहे.नुकताच परभणी येथे ३३० हून अधिक जोडप्यांचा सामुदायिक विवाह शिवसेनेने थाटामाटात लावून दिला.शिवसेनेसोबत “नाम” सारख्या संघटनाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी झटत आहेत.काही अभिनेते आणि क्रिकेटपटू,खेळाडूंनी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलेला आहे.यात अक्षयकुमारही अग्रेसर आहे.

काल एका मराठी चित्रवाहिनीशी बोलताना अक्षयकुमारने शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाहीर केले.तसेच स्वच्छ भारतसाठी टॅक्स लावला,तसा शेतकऱ्यांसाठीही देशवासियांवर टॅक्स लावा असाही विचार त्याने मांडला.सध्या देशातील शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकरी व्हावंसं वाटत नाही,अशी परिस्थिती आहे अस म्हणत अक्षयकुमारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण्या असल्याचे मत मांडले. माझे वडीलही शेती करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दु:ख मी जाणतो अस म्हणत बॉलीवूडच्या खिलाडीने शेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे देणं गरजेचं नाही,त्यांना उभं करणं आवश्यक असल्याच मत मांडल.याविषयी पुढे बोलताना “जवानांप्रमाणेच शेतकरीही महत्त्वाचा,तो आपल्याला अन्न पुरवतो“ अस म्हणत त्याने “सैनिकांसाठी जेवढा निधी खर्च केला जातो, तेवढा शेतकऱ्यांसाठी होतो का?” असा सवालही उभा केला.”शेतकरी दत्तक योजनांसारखे प्रकल्प हाती घ्यायला हवेत” अस मत मांडतानाच अक्षयकुमारने “शेतकऱ्यांसाठी माझ्या उत्पन्नातील अर्धा वाटा द्यायची वेळ आली,तरीही मी मागे हटणार नाही” असही स्पष्ट केल.
अक्षयकुमारने एका चित्रवाहिनीवरील कार्यक्रमात चर्चा करताना मांडलेली मते पाहून त्याच्या सामाजिक जाणिवेची कल्पना येते.बॉलीवूडचा सुपरस्टार असला तरी तो महाराष्टारील आणि देशातील समस्यांचा किती गांभीर्याने विचार करतो किंबहुना त्यावर काही उपाय सुचवतो,शक्य तितकी मदत करतो हे अक्षयकुमारच्या बोलण्यावरून स्पष्ट होते.बॉलीवूडच्या खिलाडीचे सामाजिक भान पाहून इतरांनीही त्यातून प्रेरणा घ्यायला हरकत नाही.अक्षयकुमार पडद्यावरचा हिरो तर आहेच,मात्र तो “रिअल लाईफ हिरो” सुद्धा आहे हेच त्याने त्याच्या वागण्यातून दाखवून दिल.

आजच्या युगात श्रीमंत आणि गरीब अशा दोन गटात विभागल्या गेलेल्या जनतेला जोडण्यासाठी अक्षयकुमारसारख्या लोकांची गरज आहे.अन्यथा समाजातील या दोन वर्गांतील दरी वाढतच जाईल.अनेकदा शहरी श्रीमंत शहाण्यांना सामाजिक समस्यांचे भान आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल नसल्याचे पाहायला मिळते.परिणामी नैराश्य आलेले गरीब शेतकरी श्रीमंत प्रवार्गावर टीका करतात.यामुळे या दोन वर्गातील दरी आणखीनच रुंदावते.शिवसेनाप्रमुख एकदा म्हणाले होते की “तुम्ही श्रीमंतांना गरीब करू नका,पण गरिबांना श्रीमंत करून ते पुण्य पदरी घ्या”.या वाक्याप्रमाणे जर गरिबांना उभारण्यासाठी प्रयत्न केले,त्यांना मदतीचा हात दिला तर तेही आपोआपच श्रीमंत होतील.

जगातील अनेक श्रीमंत व्यक्ती या आधी अत्यंत गरीब होत्या.त्यांनी गरिबीशी संघर्ष केल्याने त्या व्यक्ती श्रीमंत झाल्या.देशात योग्य मार्गाने,कष्ट करून श्रीमंत झालेल्या व्यक्तींना गरिबांनी दोष देण्याचे कारण नाही,कारण ते त्यांच्या मेहनतीने आणि हिंमतीने श्रीमंत झाले आहेत,मात्र अस असाल तरीही कष्ट करून श्रीमंत झालेल्या व्यक्तींनी नंतर श्रीमंतीचा माज न दाखवता सामाजिक भान राखायला हवे आणि शेतकऱ्यांना आणि गरजूंना मदतीचा हात पुढे करायला हवा.या दोन्ही गोष्टी जर सम प्रमाणात झाल्या तरच देशातील श्रीमंत आणि गरीब या दोन प्रवर्गांतील दरी कमी होईल.त्यामुळे ज्याप्रमाणे अक्षयकुमारने कृतीतून दाखवून दिले की तो केवळ पैशामुळे श्रीमंत नाही तर सामाजिक भान राखणारा “विशाल मनाचा श्रीमंत” आहे त्याचप्रमाणे इतरांनीही त्याचे अनुकरण करून मनाची श्रीमंती दाखवायला हवी.शेतकरी जगला तरच आपण जगू हे सत्य स्वीकारायला हवे,आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालायला हवी..!



जय महाराष्ट्र..!

Saturday, 12 March 2016





“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

शिवसेनेचे शिवतेज..!

पुण्यावर भगवाच फडकवा..!

मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेचे “शिवतेज” शिबीर दणक्यात पार पडले.पुणे शहर शिवसेनेतर्फे आयोजित सातारा जिल्ह्यातील सोळशी येथे शिवसेना पदाधिकार्यांदच्या तीनदिवसीय “शिवतेज विचारमंथन” शिबिराचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही, कोणाशी होणार या चर्चा सुरू आहेत.चर्चा होऊ द्यात,पण शिवसेना या निवडणुका लढणार आणि जिंकणारच.जे येतील त्यांच्याशी युती करू,अन्यथा आमची युती जनतेशी आहे अशी रोखठोक आणि कणखर भूमिका मांडली.

यावेळी पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुखांनी जे करू तोच शब्द जनतेला द्या,आपल्याला खर्या ची मते हवी आहेत,असे आवाहन करताना कल्याण-डोंबिवली निवडणुकीतील उदाहरण पदाधिकार्यांीपुढे ठेवले.या निवडणुकीत २७ गावांचा प्रश्न आला तेव्हा गावकर्यांकना पाहिजे तसा आणि त्यांच्या मागणीनुसार विकास करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली,परंतु सत्ताधार्यांलनी त्यांना थेट आश्वाासन दिले.त्याचा फटका शिवसेनेला बसला.मी जर या निवडणुकीत खोटं बोललो असतो तर या गावांची मतं मिळवून एकहाती सत्ता शिवसेनेला मिळाली असती, परंतु खोटं बोलून मतं घेतली हा ‘शिक्का’ शिवसेनेला नकोय.आपल्याला मतं कमी मिळाली तरी चालतील,पण खर्या ची मतं हवी.जे बोलू ते खरं करू ही आपली भूमिका हवी अशी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी यावेळी मांडली.

या शिबिरात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख पुढे म्हणाले की “शिवसेनाप्रमुख म्हणायचे, माझी जीभ माझी तलवार आहे.विचारांचे अंगार त्यातून त्यांनी फुलविले.त्या विचारांचे आपण शिवसैनिक आहोत.विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती.तरी ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले.राष्ट्रीय पक्षांना जे जमलं नाही ते फक्त शिवसैनिकांनी करून दाखविले.थोडासा आणखी वेळ मिळाला असता तर शिवसेना नंबर १ वर पोहचली असती.गोरगरीब जनतेचा विश्वाचस जपला तर त्यांचे आशीर्वाद नक्कीच मिळतात”.पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की “देशात शंभर शहरे स्मार्ट सिटी करणार, मुंबई-पुण्याप्रमाणे इतर शहरे उभी राहणार अशी अपेक्षा त्यामागे होती. म्हणून या घोषणेला आपण पाठिंबा दिला. पुणे हे अगोदरच स्मार्ट आहे. त्याला आणखी काय स्मार्ट करणार? थोडाफार पैसा टाकणार असे वाटते, परंतु पुणे स्वतःच्या ताकदीवरच पुढे जात आहे.”

यावेळी सातारा जिल्हा पालकमंत्री विजय शिवतरे यांनी “उत्तर प्रदेशात मायावती,पश्चि म बंगालमध्ये ममता बॅनर्जी,तामीळनाडूमध्ये जयललितांचा पक्ष सत्तेवर येऊ शकत असेल तर ५० वर्षे लोकांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणारी,डोकी फोडून घेणारी शिवसेना का सत्तेवर येऊ शकत नाही? असा सवाल शिवसैनिकांना केला.मोदी लाटेत पुण्यातील सर्व आमदार भाजपचे आले,मात्र आपण ही चूक केली काय अशी भावना आता पुण्यातील सामान्यातील सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांमध्ये निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले.तसेच “शिवसेनाच जिंकली पाहिजे” हे ध्येय ठेवा असेही आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

पुण्यात झालेल्या या तीनदिवसीय निवासी शिबिरामुळे पुण्यातील शिवसैनिकांत नवचैतन्य पसरले असून पुण्यावर भगवा फडकवणारच असा निर्धाय यावेळी शिवसैनिकांनी केलेला आहे.मुंबई-ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत.ठाणे हे शिवसेनाप्रमुखांचे आवडते शहर आहे,मात्र पुणे हे शिवसेनाप्रमुखांचे जन्मस्थान आहे.त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.त्यामुळे पुणेकरांनो शिवसेनेला साथ द्या,यंदाच्या वेळी पुण्यावर भगवाच फडकवा.शिवसेना पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवेल आणि पुण्याचा विकास अधिक गतिमान होईल.

जय महाराष्ट्र..!