(माझा आजचा लेख-:)
कोलकात्याचा काळाकुत्रा..!
बॉम्बे नाही मुंबईच..!
ब्रिटनमधील “द इंडिपेंडंट” या वर्तमानपत्राच्या संपादकास अचानक मुंबईला बॉम्बे म्हणण्याची उचकी लागली.आम्हाला ही बातमी समजली तेंव्हा ब्रिटीश वर्तमानपत्र आहे म्हणजे एखाद्या ब्रिटीश अधिकाऱ्याला मस्ती आली असावी असे आम्हाला वाटले.आमची मुंबई,आम्ही रक्त सांडून मिळवली आणि त्या मुंबापुरीस बॉम्बेच लेबल पुन्हा लावणारा हा कोण मस्तवाल ? या विचाराने आमच्या अंगातील मराठी रक्त सळसळले.पूर्ण बातमी पाहिली तेंव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यास नव्हे तर कोलकात्याच्या काळ्याकुत्र्यास माज आला असल्याचे समजले.आपल्या वर्तमानपत्रात यापुढे मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच केला जाईल हा निर्णय जाहीर करणारा संपादक कोलकात्यात जन्मलेला आणि ब्रिटनमध्ये वाढलेला बाटगा हिंदुस्थानी निघाला.हिंदुस्थानचे दुर्दैव हेच की या पवित्र मातीत हा बाटगा जन्मला ज्याने आपल्याच मातृभूमीच्या आर्थिक राजधानीवर टांग वर करण्याचा प्रयत्न केला.
“द इंडिपेंडंट या इंग्लिश वृत्तपत्राचा संपादक असलेल्या अमोल राजन नामक कोलकात्याच्या काळ्याकुत्र्याने संकुचित विचार करणाऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांच्या विरोधात मुंबईला बॉम्बे म्हणण्याचे पाउल उचलण्याचा निर्णय जाहीर केला.इतकेच नव्हे तर जगासाठी या शहराचे दरवाजे उघडे असल्याच जाहीर केल.अरे तू कोण? तुझी औकात काय? ब्रिटनमध्ये बसून मुंबईचे दरवाजे काय उघडतोस? सगळा अक्कलशून्य लोकांचा कारभार आहे.बॉम्बेची ओळख ही एक खुल शहर आणि हिंदुस्थानच प्रवेशद्वार अशी आहे,ज्याचे दरवाजे संपूर्ण जगासाठी उघडे आहेत.जर तुम्ही त्या शहराचा उल्लेख मुंबई असा केलात तर ते हिंदू राष्ट्रवाद्यांच्या हिताचचं आहे अस म्हणत या बाटग्याने आपली अक्कल पाजळली.
मुंबईला मुंबई नाव देणे आणि हिंदू राष्ट्रवादाचा काय संबंध आहे? मुंबईला मुंबई नाव देणे हा मराठी अस्मितेचा प्रश्न आहे.त्यासाठी शिवसेना लढली आहे.मुंबई नाव हे मुंबादेवीच्या नावावरून ठेवण्यात आल असून कायदेशीर होऊनही आज २० वर्षे झाली आहेत.बर,यात शिवसेनेचा स्वार्थ तो काय होता? ब्रिटिशांनी दिलेले नाव बदलून आपल्या राज्याच्या राजधानीला आणि हिंदुस्थानच्या आर्थिक राजधानीला मुंबई नाव देण्यात गैर ते काय आहे? मुळात महाराष्ट्राला मुंबई आणि मुंबईतील मराठी माणसाला मान मिळवून देण्याच काम शिवसेनेने केल आहे.हा सर्वमान्य इतिहास आहे.अस असताना पुन्हा हा विषय उकरून काढून राजनला काय सध्या करायचे आहे? ब्रिटनमध्ये बसून अशी वक्तव्ये करून हिंदुस्थानात कलह निर्माण करण्यात कोणते देशकार्य आहे?
राजनने पुढे असेही सांगितले की “एका पत्रकार आणि वृत्तपत्राच एडिटिंगकरणारा त्याच्या शब्दावलीबाबत स्पष्ट असावा.मी हिंदुस्थानचा तोच वारसा आत्मसात करेन जो जगासाठी खुला आहे,ना की सत्तेत असलेल्या संकुचित विचारधारा असलेल्या पक्षाचा”.अरे पण मुंबईला मुंबई म्हणण्यात संकुचित विचारधारा कसली आली? मग याच न्यायाने कोलकाता आणि चेन्नई या दोन शहरांच्या नामांतराबद्दल राजनची काय भूमिका आहे? त्याबद्दल तो कधी बोलणार? स्वातंत्र्यानंतर मुघलांनी,इंग्रजांनी दिलेली नावे बदलून शहरांना हिंदुस्थानी संस्कृतीप्रमाणे नावे देण्यात हरकत काय आहे? जर असेल तर मग कसल स्वातंत्र्य? आणि आम्ही कोण ते ठरवणारा हा कोण दीड दमडीचा पत्रकार?
मुंबईला बॉम्बे करण्याचे कपटकारस्थान करू नका.क्खा महाराष्ट्र आणि मराठी माणूस पेटून उठेल.ज्यांना देशात राहायचं नाही त्यांनी बाहेर जाऊन हिंदुस्थानी जनतेला अक्कल शिकवू नये.हिंदुस्थानात काय व्हावे काय होऊ नये ते ठरवण्यास हिंदुस्थानी समर्थ आहेत.मुंबईला बॉम्बे करायची एवढी खुमखुमी आली असेलच महाराष्ट्रात येऊन हे बोलून दाखवा.बॉम्बे नाही मुंबईच हे व्यवस्थित,मायेने समजावून सांगू.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment