(माझा आजचा लेख:)
अर्धविराम..!
शतशः धन्यवाद..!
माझ्या फेसबुकवरील शिवसैनिक बंधू-भगिनींनो.मी आपल्याशी आज पुन्हा एकदा लेखाच्या माध्यमातून संवाद साधतोय.याच कारण असं की गेल्या दोन आठवड्यात माझा एकही लेख प्रकाशित झालेला नाही.नुकत्याच संपन्न झालेल्या कृतज्ञता दिनाच्या दिवशीही लेखाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधला होता.गेल्या तीन वर्षात आठवड्याला एक लेख आणि काही विशेष लेख असे माझे तब्बल दीडशेहून अधिक लेख प्रकाशित झाले.त्या सर्व लेखांना आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला.लेखाबरोबरच शिवसेनेच्या प्रचारार्थ पेज चालवणे आणि पोस्ट करणे यामार्फत मी शिवसेनेच्या प्रचारातील खारीचा वाटा उचलला.मागील सहा महिन्यांत मात्र वैयक्तिक कारणांमुळे पोस्टच प्रमाण अगदिच कमी झाल.आठवड्यात एक लेख मात्र न चुकता लिहायचो.व्यस्त वेळापत्रक असल्यानं मागील दोन आठवड्यात लेखणी उचलायची संधीच मिळाली नाही.
तीन वर्षे अविरत घुमणारी “वाघगर्जना” आपण वाचत आलात.वाचकांना वाट पाहत ठेवण हे योग्य वाटत नाही.सध्या नियमित लेखनास वेळ मिळत नाही.त्यामुळे मी आज खूप विचारानं एका निर्णयापर्यंत आलो आहे.निर्णय कदाचित अनपेक्षित असेल,न पटणारा किंवा न रुचणारा असेल पण तो अंतिम असेल.सध्या केलेल्या चिंतनात लेख लिहिण्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे लेखनासाठी आवश्यक तितका वेळ देण काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नसल्याचं चित्र दिसतयं.एखादी गोष्ट करावी तर ती शंभर टक्के समर्पणाने करावी,मनापासून करावी हे माझं स्पष्ट मत आहे.त्यामुळे आजपासून या वाघगर्जनेला अर्धविराम देण्याचा निर्णय मी जाहीर करत आहे.हा निर्णय घेण खूप कठीण होत.आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हा निर्णय घेण योग्य वाटत नव्हत.दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेतला तरी लागलेली सवय जाणार नाही हेही तितकच खरं.
मी मध्यंतरी व्यंगचित्र काढलेली आणि लेख तर गेली तीन वर्षे लिहितोय.त्यामुळे जरी व्यंगचित्र काढाल नाही किंवा लेख लिहिला नाही तरी विरोधकांना सोलून काढण्याची इच्छा मात्र कायमच असणार.ती इच्छा मारण्याचा मात्र माझा हेतू नाही.जेंव्हा वेळ मिळेल आणि उत्स्फुर्तपणे डरकाळी फुटेल तेंव्हा विरोधकांचा थरकाप उडेल यात तिळमात्र शंका नाही.बोलण्यासारख खूप काही शिल्लक आहे मात्र बोलायला वेळ पुरणार नाही.आपण गेली तीन वर्षे माझ्यावर जो कौतुकाचा वर्षाव करत राहिलात,माझ्या पाठीशी राहिलात त्याबद्दल शतशः धन्यवाद..! शेवटी एक निक्षून सांगू इच्छितो,लेखनाला अर्धविराम देतोय याचा अर्थ शिवसेना सोडली असा नाही.आम्ही शिवसेना सोडण कदापि शक्य नाही.यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आणि युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार लढत राहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न साकार करण्यासाठी झटत राहीन असं वचन मी आपणास देतो.आज शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन,खरतर निर्धार दिन आहे.त्यांना विनम्र अभिवादन करून आजन्म भगवा सोडणार नाही अशी शपथ घेतो.वाघगर्जनेला हा अर्धविराम आहे पूर्णविराम नाही.त्यामुळे यापुढे कधीच वाघगर्जना घुमणार नाही असंही नाही.तूर्तास मात्र आपणा सर्वाची रजा घेतो.
जय महाराष्ट्र..!